Saturday, August 15, 2026
Home Blog

सात दशकांची ज्ञानयात्रा : डॉ. मंजिरी निंबकर यांचे शिक्षणविश्वाला योगदान

0
सात दशकांची ज्ञानयात्रा : डॉ. मंजिरी निंबकर यांचे शिक्षणविश्वाला योगदान

सात दशकांची ज्ञानयात्रा : डॉ. मंजिरी निंबकर यांचे शिक्षणविश्वाला योगदान

साहस Times :- वयाची सत्तरी केवळ आयुष्याच्या सात दशकांचा टप्पा नव्हे, तर अनुभव, विचार, संवेदना आणि कार्यातून समृद्ध झालेल्या जीवनप्रवासाकडे मागे वळून पाहण्याचा एक सुंदर क्षण असतो. काही व्यक्तींच्या आयुष्याची ओळख त्यांनी गाठलेल्या पदांपेक्षा त्यांनी घडवलेल्या माणसांत, रुजवलेल्या विचारांत आणि समाजाला दिलेल्या योगदानात दडलेली असते. वयाच्या ७०व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या डॉ. मंजिरी निंबकर यांचा प्रवास याच अर्थाने विशेष ठरतो. वैद्यकीय सेवेतून सुरू झालेली त्यांची वाटचाल शिक्षण, बालविकास, शिक्षक घडविणे, वाचनसंस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाच्या व्यापक क्षेत्रापर्यंत पोहोचली. सात दशकांच्या या समृद्ध प्रवासाकडे पाहताना त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि त्यामागची संवेदनशीलता मनाला भावून जाते.

काही व्यक्तींचे कार्य त्यांच्या पदांपेक्षा मोठे असते. त्यांच्या कार्यातून निर्माण झालेली मूल्ये, घडलेली माणसे आणि समाजावर उमटलेला ठसा हीच त्यांच्या जीवनाची खरी ओळख असते. फलटणच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात असेच प्रेरणादायी कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. मंजिरी निंबकर. वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी घेऊन त्यांनी शिक्षणाला आपले जीवनकार्य बनवले आणि बालकेंद्री, सर्जनशील व मूल्याधिष्ठित शिक्षणाची वेगळी वाट निर्माण केली.

डॉ. मंजिरी निंबकर यांनी १९८१ मध्ये बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केली. त्यानंतर फलटणमधील आर्थिकदृष्ट्या वंचित भागात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. उत्तम निदानक्षमता आणि माफक शुल्कामुळे त्यांनी रुग्णांचा विश्वास संपादन केला. मात्र, त्यांचे सामाजिक भान केवळ वैद्यकीय सेवेत मर्यादित राहिले नाही. १९८५ मध्ये त्यांनी विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शाळा सुरू केली. पुढे १९८९ मध्ये काही सहकारी डॉक्टरांच्या सहकार्याने निकोप हॉस्पिटल प्रा. लि. सुरू करण्यातही त्यांचा सहभाग राहिला.

१९९५ मध्ये त्यांनी प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवनमध्ये काम सुरू केले. डॉ. मॅक्सिन बर्नसन यांच्या शैक्षणिक विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी मुलांकडे केवळ विद्यार्थी म्हणून नव्हे, तर स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित केली. मुलांची जिज्ञासा, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि भावनिक गरजा यांना शिक्षणाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा त्यांचा दृष्टिकोन विकसित झाला.

सन २००० मध्ये त्या कमला निंबकर बालभवनच्या मुख्याध्यापिका झाल्या. यासोबतच त्यांनी इंग्रजी, विज्ञान व भूगोल या विषयांचे अनेक वर्षे अध्यापन केले. पुढे प्रगत शिक्षण संस्थेच्या खजिनदार, संचालक आणि सचिव अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. सध्या त्या संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ‘शिक्षक आणि मुलांचा विकास एकत्र व्हावा’ हा त्यांच्या शैक्षणिक कार्याचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. मुलांना शिकवताना शिक्षकांनीही सतत शिकत राहावे, प्रयोग करावेत आणि आपल्या अध्यापनाचा सातत्याने विचार करावा, अशी त्यांची भूमिका आहे.

पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान व्यापक आहे. अभ्यासक्रम निर्मिती, शिक्षक प्रशिक्षण, बालशिक्षकांचे मार्गदर्शन आणि विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे परीक्षण यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या क्षेत्रात त्यांना डॉ. नीलिमा गोखले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) मार्फत तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा (बालशिक्षण) निर्मिती प्रक्रियेत त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले असून ‘उदयोन्मुख साक्षरता’ हे प्रकरण त्यांनी लिहिले आहे. ‘बालवाटिका’ या बालशिक्षणावरील चित्रफितीतही त्यांनी सैद्धांतिक मांडणी केली आहे. पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील अभ्यासक्रम मूल्यांकन व निर्मितीच्या कामात त्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेसोबत राज्य पातळीवर काम केले आहे.

डॉ. निंबकर यांचे कार्य फलटणपुरते मर्यादित राहिलेले नाही. युनिसेफ आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांसारख्या संस्थांसाठी त्यांनी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे परीक्षण व परिणाममूल्यांकन केले आहे. विदर्भातील लर्निंग सेंटर्स, यवतमाळ व चंद्रपूरमधील गणित व भाषा कार्यक्रम तसेच शैक्षणिक कार्यक्रम आणि युवक गटांच्या सक्षमीकरणाच्या उपक्रमांचे पुनरावलोकन त्यांनी केले आहे.

शिक्षणातील प्रयोगशीलतेला त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. कमला निंबकर बालभवनमध्ये मुलांना प्रश्न विचारण्याची, शोध घेण्याची आणि स्वतः शिकण्याची संधी देणारे अनेक उपक्रम राबवले गेले. २०१४ मध्ये ‘स्कूल इन द क्लाऊड’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पहिले SOLE प्रयोगशाळा केंद्र सुरू करण्यात आले. स्वयं-संघटित शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना इंटरनेटच्या साहाय्याने समूहात शिकण्याची संधी मिळाली. या उपक्रमामुळे मुलांच्या इंग्रजी संभाषण कौशल्याबरोबरच आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.

प्रगत शिक्षण संस्थेने त्यांच्या नेतृत्वात अनेक मोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. जिल्हा परिषद, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अंतर्गत ‘Nurturing Early Literacy in Primary Schools in Phaltan Block’ हा प्रकल्प राबवण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण फलटण तालुक्यात सुमारे दीडशे गावांमध्ये ग्रंथालयांच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून वाचन संस्कृती रुजवण्याचे काम करण्यात आले. या कार्यासाठी जिल्हा परिषद, सातारा यांच्या वतीने डॉ. निंबकर यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

केंद्र सरकारच्या ‘निपुण भारत’ अभियानांतर्गत प्रगत शिक्षण संस्थेने एच.टी. पारेख फाउंडेशनच्या अर्थसाहाय्यातून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील २०५ अंगणवाड्या आणि २५ जिल्हा परिषद शाळांसोबत काम केले. याचदरम्यान माण तालुक्यातील ५० अंगणवाड्यांसोबत अंगणवाडी सक्षमीकरणासाठीही काम करण्यात आले. या उपक्रमांचा लाभ मुलांसह अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि जिल्हा परिषद शिक्षकांनाही झाला.

बालसाहित्य आणि सर्जनशील लेखन हे त्यांच्या कार्याचे आणखी एक महत्त्वाचे अंग आहे. ‘मुलांचे सृजनात्मक लेखन’ या पुस्तकातून त्यांनी मुलांच्या सर्जनशील अभिव्यक्तीचा अभ्यास मांडला आहे. प्रत्येक मूल सर्जनशील असते; मात्र प्रत्येकाची सर्जनशीलता वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होते, हा त्यांच्या कार्यामागील महत्त्वाचा विचार आहे. त्यांनी ‘मुलांचे ग्रंथालय’ या पुस्तकाचे संपादन केले असून या पुस्तकाला स्व. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा उत्कृष्ट पुस्तक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक महत्त्वाची बाजू आहे. महिलांसाठी बचत गट चालवणे, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी काम करणे तसेच ग्रामीण व वंचित मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. वैद्यकीय शिक्षण, प्रत्यक्ष वैद्यकीय अनुभव, शिक्षणशास्त्राचा सखोल अभ्यास आणि सामाजिक जाणिवा यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो.

त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना बॅरिस्टर पी. जी. पाटील स्मृती आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार (२००६), मातोश्री नानी आडसूळ आदर्श महिला पुरस्कार (२००९) आणि महिला रत्न पुरस्कार (२०१५) अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून प्राथमिक शिक्षणातील एम.ए. पदवी त्यांनी सुवर्णपदकासह प्राप्त केली. विशेष म्हणजे पूर्णवेळ कार्यरत असतानाच त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

सध्या डॉ. निंबकर प्रगत शिक्षण संस्थेच्या ‘पुस्तकमैत्री अभ्यासक्रमात’ सक्रिय सहभागी असून साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन करत आहेत. या अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी त्यांनी या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचा कोअर ग्रुप तयार करून अभ्यासक्रमाला दिशा दिली आहे. पुणे, वर्धा आणि मुंबई येथे महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले पुस्तक मित्र हा अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. पुस्तकांसोबत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती आणि पुस्तकांची मैत्री मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.

यासोबतच विप्रो फाउंडेशन व प्रगत शिक्षण संस्था संचलित ‘मजबूत करे नींव’ या प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या बालशिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात त्या मुख्य साधनव्यक्ती म्हणून कार्यरत आहेत. या प्रशिक्षणात संपूर्ण भारतातील विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. प्रशिक्षणानंतरही त्या सहभागी संस्थांना सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.

डॉ. मंजिरी निंबकर यांचा प्रवास हा केवळ डॉक्टर ते शिक्षिका असा प्रवास नाही; तो सेवेतून शिक्षणाकडे, शिक्षणातून प्रयोगशीलतेकडे आणि प्रयोगशीलतेतून सामाजिक परिवर्तनाकडे जाणारा प्रवास आहे. डॉक्टर म्हणून त्यांनी शरीराच्या आरोग्याचा विचार केला; शिक्षिका म्हणून मुलांच्या मनाचा, विचारांचा आणि सर्जनशीलतेचा विचार केला; तर शैक्षणिक नेतृत्वातून शिक्षक आणि शिक्षणव्यवस्थेच्या विकासासाठी काम केले.

फलटणच्या भूमीत उभ्या राहिलेल्या कमला निंबकर बालभवनच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक, परीक्षा आणि गुण नव्हेत, तर मुलांना विचार करायला, प्रश्न विचारायला, स्वतःचा आवाज शोधायला आणि संवेदनशील माणूस म्हणून विकसित व्हायला मिळणारी प्रक्रिया आहे, हा विचार प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेला.आईकडून महर्षी धोंडो केशव कर्वे – आजी डॉ.इरावती कर्वे ते आई प्रसिद्ध लेखिका जाई निंबकर तर वडिलांकडून आजी कमलाबाई निंबकर (पूर्वाश्रमीच्या एलिझाबेथ लंडी) या ऑक्युपेशनल थेरपी किंवा व्यवसायोपचार या वैद्यकीय शाखेचा पाया भारतात घट्ट रोवणाऱ्या पहिल्या व्यक्ती.असा समृद्ध वारसा लाभलेल्या डॉ.मंजिरी निंबकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

आज त्या संविधानिक मूल्यांच्या प्रचार प्रसारासोबतच सामाजिक सलोखा व समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यातून घडलेले शिक्षक, आत्मविश्वासाने शिकणारी मुले आणि निर्माण झालेली शैक्षणिक संस्कृती हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आणि समाजासाठीची अमूल्य देणगी आहे. त्यांचा प्रवास आजही अखंडपणे सुरु आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा!

आम्हा पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात काम करणाऱ्या शिक्षकांना , विद्यार्थ्यांना आणि शिक्षणात नवनवीन प्रयोग करणाऱ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळत राहील.

अहिल्यादेवी होळकरांच्या २३१व्या पुण्यतिथीनिमित्त १२० वृक्षांचे वाटप; चार जिल्हा परिषद शाळांमध्ये संविधान उद्देशिकेची भेट

0
अहिल्यादेवी होळकरांच्या २३१व्या पुण्यतिथीनिमित्त १२० वृक्षांचे वाटप; चार जिल्हा परिषद शाळांमध्ये संविधान उद्देशिकेची भेट

कापडगाव येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ; कुसूर, डोंबाळवाडी व काळज येथेही उपक्रम

फलटण : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय मानवअधिकार महिला व बाल संरक्षण परिषदेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण व संविधान जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात कापडगाव येथे करण्यात आली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला अभिवादन करण्यासाठी २३१वी पुण्यतिथी आणि २३१ वृक्षांचे प्रतीकात्मक संकल्प करण्यात आला. अभियानाच्या माध्यमातून कापडगाव, कुसूर, डोंबाळवाडी आणि काळज येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येकी ३० याप्रमाणे एकूण १२० वृक्षांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षलागवड केली.

केवळ वृक्षलागवड करून थांबणे पुरेसे नसून लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी वृक्षांची नियमित काळजी घेऊन त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या हातात संविधानाची उद्देशिका

पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधान, लोकशाही, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने चारही जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रती भेट देण्यात आल्या.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी स्वतः संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून तिचे महत्त्व जाणून घेतले. लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात संविधानिक मूल्यांची रुजवण होत असल्याचे पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

अहिल्यादेवींच्या विचारांना कृतीची जोड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून लोककल्याण, समाजसेवा आणि जनहिताचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्या विचारांना कृतीची जोड देण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आला.

“एक झाड – एक कुटुंब आणि संविधानाची उद्देशिका – प्रत्येकाच्या हातात” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धन आणि संविधानिक मूल्यांची जनजागृती या दोन्हींचा सुंदर संगम या अभियानातून साधण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय मानवअधिकार महिला व बाल संरक्षण परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रेम मोरे, लेखक व सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ, पुणे जिल्हा उपाध्यक्ष नानासो गोवेकर, साहित्यिक मार्गदर्शक तानाजी जगताप, मार्गदर्शक अरविंद सुळ, कापडगावचे माजी उपसरपंच राम केसकर, युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते सागर सुळ, युवा उद्योजक वैभवराज नरुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासो सुळ, गोरख सुळ, युवा उद्योजक यश पिसाळ, पिसाळ साहेब, सतीश गाढवे साहेब यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांचा वारसा पुढे नेत पर्यावरण संरक्षण आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

अट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा; पीडितांना सन्मानाची वागणूक द्या

0
अट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा; पीडितांना सन्मानाची वागणूक द्या

फलटण उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत सनी घनश्याम काकडे व आमदार सचिन पाटील यांनी मांडले महत्त्वपूर्ण मुद्दे

फलटण : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत फलटण उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली. अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पीडितांना तातडीने न्याय, पोलीस प्रशासनाकडून सन्मानपूर्वक वागणूक तसेच ग्रामीण भागातील दलित वस्त्यांच्या विकासाला गती देण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस दक्षता समितीच्या अध्यक्षा सौ. आंबेकर मॅडम, उपविभागीय तथा दंडाधिकारी, तहसीलदार जाधव साहेब, गटविकास अधिकारी, आमदार सचिन पाटील, पोलीस विभागाचे प्रतिनिधी तसेच दक्षता समितीचे सदस्य सनी घनश्याम काकडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पीडितांना पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळावी

अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात येणाऱ्या पीडित व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत हीन वागणूक, दमदाटी किंवा मानसिक त्रास होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका दक्षता समितीचे सदस्य सनी घनश्याम काकडे यांनी बैठकीत मांडली.

पीडित व्यक्तीची तक्रार तातडीने नोंदवून एफआयआरची प्रत देण्यात यावी. प्रकरणाच्या स्वरूपानुसार कायद्यातील तरतुदींनुसार तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच तपास पूर्ण करून वेळेत चार्जशीट दाखल करण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रत्येक पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी कायद्याची माहिती देणारे फलक लावण्याची मागणी

फलटण शहर आणि तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत नागरिकांना माहिती मिळावी यासाठी माहिती फलक लावण्यात यावेत, अशी मागणीही काकडे यांनी केली.

कायद्याच्या तरतुदी, पीडितांचे अधिकार, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि संबंधित यंत्रणांची माहिती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध झाल्यास पीडितांना कायदेशीर मदत मिळण्यास अधिक सुलभता निर्माण होईल, असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.

दलित वस्त्यांच्या विकासकामांना गती देण्याची मागणी

ग्रामीण भागातील अनुसूचित जातींच्या वस्त्यांना उपलब्ध होणाऱ्या विकास निधीचा प्रभावी आणि तातडीने वापर करून मूलभूत सुविधांची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी सनी घनश्याम काकडे यांनी केली.

रस्ते, पाणी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि इतर आवश्यक नागरी सुविधांसह दलित वस्त्यांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचा वेळेत वापर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.

अट्रॉसिटी पीडितांना नियमानुसार अर्थसहाय्य मिळावे

अट्रॉसिटी प्रकरणातील पीडितांना समाजकल्याण विभागामार्फत शासनाच्या नियमानुसार मिळणारे अर्थसहाय्य तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देतानाच शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

समाजमंदिरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी समाजमंदिर उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सनी घनश्याम काकडे यांनी केली. समाजमंदिराच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळू शकते, त्यामुळे संबंधित विभागांनी याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

आमदार सचिन पाटील यांनीही मांडले विविध प्रश्न

बैठकीत आमदार सचिन पाटील यांनी अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. अट्रॉसिटी प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

दलित वस्ती विकास निधीचा त्वरित वापर करून प्रलंबित विकासकामे मार्गी लावावीत, दलित वस्त्यांमधील समाजमंदिरांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी तसेच प्रत्येक शाळेत संविधान महोत्सव साजरा करण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी सूचनाही आमदार सचिन पाटील यांनी केली.

अधिकाऱ्यांकडून मागण्यांची नोंद; आवश्यक कार्यवाहीचे निर्देश

बैठकीत सदस्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या विविध प्रश्नांची दक्षता समितीच्या अध्यक्षा सौ. आंबेकर मॅडम तसेच उपविभागीय तथा दंडाधिकारी यांनी नोंद घेतली. संबंधित विभागांनी मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवर आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

पोलीस प्रशासन किंवा इतर संबंधित विभागांकडून यापुढे त्रुटी राहिल्यास त्याबाबत कायदेशीर बाबींच्या आधारे पुढील कार्यवाही करावी लागेल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

दर दोन ते तीन महिन्यांनी बैठक घेण्याचे निर्देश

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठका दर दोन ते तीन महिन्यांनी नियमितपणे घेण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीमुळे अट्रॉसिटी प्रकरणातील पीडितांना तातडीने न्याय मिळवून देणे, पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती अधिक संवेदनशील करणे आणि ग्रामीण भागातील दलित वस्त्यांच्या विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

साहस Times न्यूज पोर्टल | 9850802298

निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका अन् समाजहिताची नाळ; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

0
निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका अन् समाजहिताची नाळ; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका अन् समाजहिताची नाळ; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

निर्भीड नायक : सुधीर तानाजी अहिवळे

फलटण : समाजकारण असो, राजकारण असो किंवा पत्रकारिता क्षेत्र; आपल्या स्पष्टवक्तेपणा, निर्भीड भूमिका आणि समाजहिताच्या जाणिवेतून फलटणच्या सार्वजनिक जीवनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे साप्ताहिक ‘फलटण दर्शन’चे संपादक सुधीर तानाजी अहिवळे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मित्र, सहकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय तानाजी बाबुराव अहिवळे यांचे चिरंजीव असलेल्या सुधीर अहिवळे यांना सामाजिक व राजकीय कार्याचा वारसा घरातूनच मिळाला. आई-वडिलांचे संस्कार, मोठे बंधू आशिष अहिवळे यांचे मार्गदर्शन आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या बळावर त्यांनी सार्वजनिक जीवनात स्वतःचे स्थान निर्माण केले.

‘सुधीर चेअरमन’ या नावाने फलटण तालुक्यात परिचित असलेले सुधीर अहिवळे हे कोणत्याही परिस्थितीत अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी पुढे येतात. रोखठोक बोलण्याची शैली, स्पष्ट भूमिका आणि अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार निर्माण झाला आहे. ‘जिथे अन्याय, तिथे चेअरमन सुधीर अहिवळे’ असे समीकरण त्यांच्या सामाजिक कार्यातून निर्माण झाले आहे.

राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान

फलटणच्या राजे घराण्याशी एकनिष्ठ राहून मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सुधीर अहिवळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेताना त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.

सहकारी, मित्र, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे ही त्यांची विशेष ओळख आहे. स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक भूमिका असली तरी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधण्याचा त्यांचा स्वभाव अनेकांना भावतो.

अहिवळे कुटुंबाचा सामाजिक वारसा

सुधीर अहिवळे यांच्या पत्नी सौ. वैशाली सुधीर अहिवळे यांनीही नगरसेविका म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. अहिवळे कुटुंबाला फलटण नगर परिषदेत उपनगराध्यक्षपदाचा सामाजिक आणि राजकीय वारसा लाभला आहे. या वारशाची जपणूक करत समाजाशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्याचे काम सुधीर अहिवळे यांनी केले आहे.

पत्रकारितेत दोन दशकांहून अधिक काळ योगदान

सामाजिक आणि राजकीय कार्याबरोबरच पत्रकारितेच्या क्षेत्रातही सुधीर अहिवळे यांनी दोन तपांहून अधिक काळ सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. साप्ताहिक **‘फलटण दर्शन’**च्या माध्यमातून त्यांनी फलटण शहर व तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील समस्या मांडतानाच पत्रकारांच्या प्रश्नांवर आणि पत्रकारांच्या हक्कांसाठीही त्यांनी वेळोवेळी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे पत्रकारिता, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांचा व्यापक जनसंपर्क निर्माण झाला आहे.

सुधीर अहिवळे यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद म्हणजे निर्भीडपणा, स्पष्टवक्तेपणा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जपणूक. सार्वजनिक जीवनात अनेक चढ-उतार आले तरी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची त्यांची कार्यपद्धती त्यांच्या समर्थकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव होत असताना, त्यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी, यश, कीर्ती आणि दीर्घायुष्य लाभावे, तसेच समाजहितासाठी त्यांची वाटचाल अधिक जोमाने सुरू राहावी, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

सुधीर अहिवळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂💐

फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद, तिघे फरार

0
फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद, तिघे फरार

फलटण : फलटण ग्रामीण भागातील मांडवखडक, ता. फलटण गावच्या हद्दीत हॉटेल बाणगंगाजवळ रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांच्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून, अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मांडवखडक परिसरात काही इसम नागरिकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन कारवाई केली.

पोलिसांची चाहूल लागताच पाचही संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी सुमारे दोन किलोमीटर पाठलाग करून ऊसाच्या शेतातून तसेच कुरवली तलावाजवळून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लुटमार व चोरीसाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल नाना घुले (रा. इंदिरानगर, मलटण, ता. फलटण) आणि नंदकुमार भागोजी सोनवणे (रा. झिरपवाडी, ता. फलटण) अशी आहेत. अन्य तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र. नं. ४८२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४)(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींकडून फलटण ग्रामीण भागातील आणखी काही चोरी व लुटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस व तुषार नलवडे यांनी सहभाग घेतला.

दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या कुटुंबीयांचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून सांत्वन; ‘दुःखाच्या प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी’

0
दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या कुटुंबीयांचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून सांत्वन; ‘दुःखाच्या प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी’

दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या कुटुंबीयांचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्याकडून सांत्वन; ‘दुःखाच्या प्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी’

फलटण | प्रतिनिधी :- फलटण येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक दिवंगत नंदकुमार संभाजी मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.

यावेळी आमदार पठारे यांनी नंदकुमार मोरे यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी मोरे कुटुंबीयांचे सांत्वन करत, या कठीण प्रसंगी आपण आणि आपल्या कार्यकर्त्यांची साथ कुटुंबास कायम राहील, अशी भावना व्यक्त केली. दुःखाच्या या क्षणी धैर्याने उभे राहण्याचे आवाहन करत त्यांनी दिवंगत मोरे यांच्या सामाजिक कार्याची आठवणही करून दिली.

सांत्वन भेटीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत त्यांच्या समाजाभिमुख कार्याला उजाळा दिला. त्यांनी विविध सामाजिक, सहकार आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये दिलेल्या योगदानाची आठवण काढत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शेवटी सर्व उपस्थितांनी दिवंगत नंदकुमार संभाजी मोरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांच्या कुटुंबीयांची आ. शशिकांत शिंदे यांनी घेतली भेट; दुःखात सहभागी होत व्यक्त केला आधार

0
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांच्या कुटुंबीयांची आ. शशिकांत शिंदे यांनी घेतली भेट; दुःखात सहभागी होत व्यक्त केला आधार

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांच्या कुटुंबीयांची आ. शशिकांत शिंदे यांनी घेतली भेट; दुःखात सहभागी होत व्यक्त केला आधार

फलटण | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे कट्टर समर्थक, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे दिवंगत नंदकुमार संभाजी मोरे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी मोरे यांच्या फलटण येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी मोरे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आणि या कठीण प्रसंगी धीर देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, दिवंगत नंदकुमार मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावान, अभ्यासू आणि समर्पित कार्यकर्ते होते. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात, संघटनात्मक उपक्रमात आणि सामाजिक प्रश्नांवर ते कायम सक्रिय राहिले. त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक प्रामाणिक, निष्ठावान आणि तळागाळातील कार्यकर्ता गमावला असून ही पक्षासाठी मोठी हानी आहे.

सामाजिक, सहकार, पर्यावरण आणि जनहिताच्या विविध विषयांवर सातत्याने आवाज उठवणारे नंदकुमार मोरे हे फलटण परिसरातील अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्य केले. त्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आ. शशिकांत शिंदे यांनी मोरे कुटुंबीयांना भविष्यात कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली. तसेच दिवंगत मोरे यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीने घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत नंदकुमार मोरे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पुढाकारातून माण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध व मंथन स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

0
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पुढाकारातून माण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध व मंथन स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पुढाकारातून माण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध व मंथन स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

दहिवडी | प्रतिनिधी :-  कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने माण तालुक्यातील शिष्यवृत्ती, नवोदय प्रवेश, प्रज्ञाशोध आणि मंथन स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी (दि. १८ जुलै २०२६) दहिवडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी खाडे साहेब होते, तर गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी नवमहाराष्ट्र विद्यामंदिर, बिदाल येथील विद्यार्थिनी आर्या गणेश माईनकर हिने राज्य गुणवत्ता यादीत तिसरा तर जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच राज्य गुणवत्ता यादीत १४ वा व जिल्हा गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक मिळवणारी सिद्धी राजेंद्र ढोक हिचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याशिवाय जिल्हा गुणवत्ता यादीत ४८ वा क्रमांक मिळवणारे श्रीतेज माने (बिदाल हायस्कूल), नील जाधवस्वराज खाडे (महात्मा गांधी हायस्कूल, दहिवडी), तसेच शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत यशस्वी ठरलेले जय काटकर (जि. प. शाळा क्र. १, दहिवडी) यांचा सत्कार करण्यात आला.

प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अनुराग गलंडे (जि. प. शाळा शिंदी बु.), स्वप्नाली राऊत (जि. प. शाळा गोसावीवाडी), शिवम कोकरे, अवनी बोराटेकार्तिकी माने (जि. प. शाळा वाघमोडेवाडी), अद्वैत ढोले (जि. प. शाळा पळशी) आणि यज्ञेश देवकर (गोसावी वस्ती) यांचा समावेश होता. सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचा शिल्ड, पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच संघटनेचे नेते संजय दिनकर खरात, उमेश गायकवाड आणि केशर माने यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष शैलेश बोराटे यांनी केले, तर सूत्रसंचालन केशर माने मॅडम यांनी केले. कास्ट्राईब महिला आघाडीच्या माण तालुका अध्यक्षा सुषमा सावंत मॅडम यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने शैलेश बोराटे आणि तालुका संघटक वैभव झेंडे यांनी वैज्ञानिक, समाजसुधारक आणि संतांच्या विचारांची पुस्तके विद्यार्थ्यांना भेट देण्याचा उपक्रम राबवला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका खजिनदार संतोष पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक विजय खरात यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

यावेळी संघटनेचे संस्थापक नेते संजय दिनकर खरात यांनी २०१२ मध्ये माण तालुक्यात कास्ट्राईब शिक्षक संघटनेची स्थापना करून महाड क्रांतीभूमीच्या समतेच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे नेते उमेश गायकवाड यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारा हा गुणगौरव सोहळा प्रेरणादायी ठरला.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात MAG Finserv व MAG Multistate चा सेवाभाव; ५ हजार वारकऱ्यांना प्रेमाने अल्पोपहार वाटप

0
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात MAG Finserv व MAG Multistate चा सेवाभाव; ५ हजार वारकऱ्यांना प्रेमाने अल्पोपहार वाटप

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात MAG Finserv व MAG Multistate चा सेवाभाव; ५ हजार वारकऱ्यांना प्रेमाने अल्पोपहार वाटप

फलटण | प्रतिनिधी : विशाल पाटील :- आषाढी वारीच्या पावन वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त MAG Finserv Company Ltd. आणि MAG Multistate Co-operative Credit Society Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी बांधवांसाठी भव्य अल्पोपहार वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सुमारे ५,००० वारकरी माऊलींना प्रेमपूर्वक व सन्मानाने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

पालखी सोहळ्यात हजारो वारकरी पायी प्रवास करत असताना त्यांना वेळेवर अल्पोपहार मिळावा आणि त्यांच्या प्रवासातील थकवा काही प्रमाणात दूर व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. सेवाभावाला सर्वोच्च स्थान देत कंपनी आणि संस्थेच्या पदाधिकारी, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप केले. प्रत्येक वारकऱ्याचे हसतमुखाने स्वागत करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही सेवा पार पडली.

अल्पोपहार स्वीकारताना वारकरी बांधवांनी आयोजकांच्या या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पालखी सोहळ्यातील भक्तिमय वातावरण अधिकच मंगलमय झाले.

यावेळी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळणे हे मोठे भाग्य असून, सामाजिक बांधिलकी जपत अशा सेवाभावी उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने केले जाईल. समाजसेवा, मानवता आणि वारकरी परंपरेप्रती असलेली निष्ठा जपण्याचा संस्थेचा कायम प्रयत्न राहील, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या उपक्रमामुळे हजारो वारकऱ्यांना प्रवासादरम्यान दिलासा मिळाला. सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि वारकरी संप्रदायाविषयीची श्रद्धा यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. उपस्थित वारकरी बांधवांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानत अशा उपक्रमांचे स्वागत केले.

पाऊस जोरदार होता, पण तात्यांच्या सेवेचा निर्धार त्याहूनही मोठा! वारकरी भिजू नयेत म्हणून तात्यासाहेब गायकवाड यांचा छोटासा पण मोलाचा प्रयत्न

0
पाऊस जोरदार होता, पण तात्यांच्या सेवेचा निर्धार त्याहूनही मोठा! वारकरी भिजू नयेत म्हणून तात्यासाहेब गायकवाड यांचा छोटासा पण मोलाचा प्रयत्न

पाऊस जोरदार होता, पण तात्यांच्या सेवेचा निर्धार त्याहूनही मोठा! वारकरी भिजू नयेत म्हणून तात्यासाहेब गायकवाड यांचा छोटासा पण मोलाचा प्रयत्न

फलटण | प्रतिनिधी :-संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान फलटण शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे वारकरी भाविकांची मोठी गैरसोय होत असतानाही सेवाभावाची परंपरा मात्र खंडित झाली नाही. अशाच सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब गायकवाड यांनी केलेली निस्वार्थ सेवा.

पावसाच्या सरींमध्ये अनेक वारकरी भिजत असल्याचे पाहून तात्यासाहेब गायकवाड यांनी तातडीने पुढाकार घेत वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी प्लास्टिक ताडपत्री व इतर आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून दिली. “वारकरी भिजू नयेत, त्यांची वारी सुखकर व्हावी” या एका भावनेतून त्यांनी हा छोटासा प्रयत्न केला.

पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमध्येही त्यांनी स्वतः उपस्थित राहून वारकऱ्यांच्या सोयीची काळजी घेतली. त्यांच्या या सेवेमुळे अनेक वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. वारकऱ्यांनीही त्यांच्या या सेवाभावाचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले.

आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समर्पण आणि मानवतेचे दर्शन घडवणारा सोहळा आहे. तात्यासाहेब गायकवाड यांनी केलेली ही सेवा त्याच परंपरेचे जिवंत उदाहरण ठरली. समाजात आजही निस्वार्थ सेवेला महत्त्व देणारी माणसे आहेत, याची प्रचिती त्यांच्या कृतीतून आली. पालखी सोहळ्यातील हा छोटासा प्रयत्न वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरला आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करून गेला.