Home Blog

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीला सुरुवात – पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही!

0
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीला सुरुवात – पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही!


फलटण (प्रतिनिधी) – फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशीची पाटी कोरीच राहिली आहे.

यावर्षी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. नगरपरिषद कार्यालयात अर्जांची ऑफलाईन विक्री बंद करण्यात आली असून इच्छूक उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज भरावे लागणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निखील जाधव यांनी सांगितले. त्यांनी माहिती दिली की, पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.

राजकीय पक्षांकडून अद्याप अधिकृत उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे इच्छूक उमेदवार पक्षाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. एकदा याद्या जाहीर झाल्या की अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

निवडणूक आयोगाने अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी दिला असला तरी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावेत, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

आगामी काही दिवसांत फलटणमधील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता असून राजकीय हालचालींना वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हाडांमध्ये कट-कट असा आवाज येतोय, कॅल्शियमची कमतरता हे एकच कारण नाही, 5 लक्षणे देखील ठरतात महत्त्वाची

0
हाडांमध्ये कट-कट असा आवाज येतोय, कॅल्शियमची कमतरता हे एकच कारण नाही, 5 लक्षणे देखील ठरतात महत्त्वाची


Symptoms of Calcium Deficiency in Bones:लहानपणापासूनच आपल्याला शिकवले जाते की आपले शरीर हाडांपासून बनलेले आहे. ही हाडे शरीराला आकार, ताकद आणि आधार देतात आणि मेंदूचे रक्षण करणारी कवटी आणि हृदय आणि फुफ्फुसांचे रक्षण करणाऱ्या बरगड्या यासारख्या अनेक महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करतात. म्हणून, मजबूत हाडे आवश्यक आहेत आणि पुरेसे कॅल्शियम असणे आवश्यक आहे. जर शरीरात कॅल्शियमची पातळी कमी झाली तर त्याचे परिणाम प्रथम हाडांवर आणि नंतर तुमच्या जीवनशैलीवर जाणवतात. कमकुवत हाडे तुमच्या संपूर्ण शरीराच्या रचनेवर परिणाम करतात. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला पाच प्रमुख लक्षणांबद्दल सांगत आहोत जे तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता दर्शवितात.

Add Zee News as a Preferred Source

हाडे आणि सांधेदुखी
कॅल्शियमच्या कमतरतेचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे हाडे आणि सांधेदुखी. सुरुवातीला ही वेदना अनेकदा सौम्य असते, परंतु नंतर हळूहळू वाढते. जर कॅल्शियमची कमतरता दीर्घकाळ राहिली तर ऑस्टियोपेनिया किंवा ऑस्टियोपोरोसिससारखे आजार होऊ शकतात. हे देखील वाचा – न्यूमोनिया मुलांवर वेगाने परिणाम करत आहे; ते टाळण्यासाठी या ३ लसी घ्या.

पेटके येणे
कॅल्शियमच्या कमतरतेचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे स्नायू कडक होणे, पेटके येणे किंवा मुंग्या येणे. ही लक्षणे विशेषतः पाय, हात किंवा बोटांमध्ये जाणवतात. रात्रीच्या वेळी हे पेटके कधीकधी अधिक तीव्र होतात, जे दर्शविते की शरीराच्या स्नायूंना पुरेसे कॅल्शियम मिळत नाही.

नखांवर आणि दातांवर परिणाम
जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता असते तेव्हा तुमचे नखे सहजपणे तुटतात आणि तुमच्या दातांच्या ताकदीवर परिणाम होतो. तुम्हाला दात किडणे, संवेदनशीलता आणि हिरड्या दुखणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात. या कमतरतेचा लहान मुलांमध्ये दातांच्या विकासावरही परिणाम होतो.

थकवा आणि अशक्तपणा
कॅल्शियम तुमच्या शरीरात ऊर्जा निर्मितीमध्ये भूमिका बजावते. कमतरतेमुळे सतत थकवा, अशक्तपणा किंवा आळस येऊ शकतो, ज्यामुळे दैनंदिन कामांवर परिणाम होतो. ही स्थिती कॅल्शियमच्या कमतरतेचे एक महत्त्वाचे सूचक देखील आहे.

हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका वाढतो
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, वयानुसार किंवा त्यापूर्वी, हाडांची घनता कमी होते. यामुळे किरकोळ दुखापत किंवा पडूनही हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात. ही समस्या वृद्ध लोकांमध्ये अधिक सामान्य आहे. म्हणून, तुम्हाला ही कमतरता दूर करण्याची आणि स्वतःची खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अस्वीकरण: प्रिय वाचकांनो, हा लेख फक्त सामान्य माहिती आणि सल्ला प्रदान करतो. तो कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. म्हणून, अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञांचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.





Source link

प्रभाग २ मध्ये भाजपाकडून सौ. वैशाली अहिवळे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार

0
प्रभाग २ मध्ये भाजपाकडून सौ. वैशाली अहिवळे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार

फलटण (प्रतिनिधी) : फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये माजी नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे यांना उमेदवारीची मागणी होत आहे. सौ.वैशाली अहिवळे यांच्या घरात दोन पिढ्यांचा राजकीय वारसा आहे. स्थानिक राजकारणात त्यांचा चांगला दबदबा असून भाजपा उमेदवार म्हणून त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

त्यांचे सासरे कालकथित तानाजीराव अहिवळे फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, तर त्यांच्या थोरल्या जाऊबाई श्रीमती स्वाती आशिष अहिवळे यांनी अपक्ष म्हणून राजे गटाविरोधात मोठा विजय मिळवीला होता. तर त्या फलटण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा राहिलेल्या आहेत. म्हणजेच घरात राजकारणाची शिदोरी आणि जनतेच्या विश्वासाचा ठेवा दोन्ही आहे.

भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अशा कार्यक्षम, प्रभावी आणि लोकांमध्ये कार्याचा ठसा उमटवलेल्या व्यक्तींना संधी द्यावी अशी मागणी प्रभाग 2 मधून होत आहे. सौ. वैशाली अहिवळे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

त्यांचे पती सुधीर अहिवळे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. फलटण शहरातील अनेक सामाजिक उपक्रम, गरजूंसाठी मदत, तसेच महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या कार्यामुळेच वैशाली अहिवळे यांना स्थानिक स्तरावर लोकसंपर्काचा फायदा होईल असे जाणकार सांगतात.

महिला मतदारांमध्ये सौ. वैशाली अहिवळे लोकप्रिय असून, त्यांची सामाजिक कार्याची छाप देखील उल्लेखनीय आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आणि महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपकडून लढणाऱ्या संभाव्य उमेदवारांमध्ये वैशाली अहिवळे हे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.

वैशाली अहिवळे यांचे थोरले दिर कालकथित आशिष अहिवळे यांचे सामाजिक कार्य अनेकांना आजही प्रेरणा देते. युवक संघटन हे आशिष यांचे बलस्थान होते. आजही त्यांच्या कार्याने प्रेरित अनेक सहकारी अहिवळे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम आहेत.

राजकीय वर्तुळात प्रभाग २ मधील स्पर्धा रंगणार याबाबत शंका नाही. मात्र राजकीय पार्श्वभूमी, संघटन कौशल्य यामुळेच वैशाली अहिवळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

टी-२० विश्वचषक उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार

0
टी-२० विश्वचषक उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार



भारत आणि श्रीलंका पुढील वर्षी संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणार आहेत. विश्वचषकातील उद्घाटन सामना, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना कुठे होणार याबाबतची माहिती समोर आली आहे. 

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, विश्वचषकाचा पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर एक उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. अशी अपेक्षा आहे की हा टी-20 विश्वचषक ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान पार पडेल.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमने यापूर्वी 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे उद्घाटन आणि अंतिम सामने यजमान म्हणून पार पाडले होते. द इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य सामना झाला, तर तो कोलंबो येथे खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना मुंबईत होईल.

या टी-२० विश्वचषकात श्रीलंका भारताचा सह-यजमान असेल. स्पर्धेतील सामने दोन्ही देशांतील एकूण ७ स्टेडियम्समध्ये खेळले जाणार आहेत.

भारतात सामने चेन्नई, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता येथे खेळले जाण्याची शक्यता आहे. श्रीलंकेत तीन मैदानांवर सामने होण्याची अपेक्षा असून, त्यात आर. प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो), पल्लेकेले आणि दांबुला किंवा हंबनटोटा या ठिकाणांपैकी एकाचा समावेश असू शकतो.

सराव सामन्यांच्या स्थळांविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. काही सराव सामने बंगळुरूमध्ये खेळवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचे सामने दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथे होऊ शकतात. आयसीसी (ICC) पुढील काही दिवसांत टी-20 विश्वचषकाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.

या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली होती. त्या बैठकीत वनडे विश्वचषकात ज्या प्रमाणात स्थळांचा वापर करण्यात आला होता, त्यापेक्षा कमी मैदानांवर टी-20 विश्वचषकातील सामने खेळवावेत, यावर चर्चा झाली. प्रत्येक ठिकाणी 6 सामने आयोजित केले जाऊ शकतात.

जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला, तर अंतिम सामना कोलंबो येथे खेळवला जाईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध तणावपूर्ण आहेत, आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आहे.

पाकिस्तानची टीम 2023 च्या वनडे विश्वचषकासाठी भारतात आली होती. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आयसीसीने ठरवले आहे की, भारत–पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचे आयोजन तटस्थ स्थळी केले जाईल. त्यामुळे टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जातील.


हेही वाचा



Source link

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘विकास’ गवसत चालला विचार!

0
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘विकास’ गवसत चालला विचार!

फलटण : नगरपरिषदेच्या निवडणुकीची जाहीरात होताच शहरात राजकीय तापमान उंचावले आहे. राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, मतदान २ डिसेंबर रोजी आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. एकूण १३ प्रभागांतून २७ नगरसेवकांची निवड होणार आहे.

या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्णपणे बदलली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रभागांवर गट किंवा कुटुंबांची पकड होती, परंतु आता सीमारेषा बदलल्यामुळे कोणालाही विजयाची खात्री नाही. त्यामुळे प्रत्येक गल्लीमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली असून, काही उमेदवार गटप्रमुखांकडे धाव घेत आहेत, तर काही नगराध्यक्षपदासाठी प्रयत्न करत आहेत.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत नागरिकांचा दृष्टिकोन मात्र ठाम आहे.  स्थानिक नागरिकाने सांगितले, “निवडणुकीत सगळेजण घरी येतात, विचारपूस करतात. पण निवडून आल्यानंतर एखादं काम झालं तरी नवलं मानावं लागतं.” तर काही तरुण म्हणाले, “आम्हाला राजकारण नको, काम दाखवा. फलटण वाढतंय, पण नियोजनाशिवाय.”

157 वर्षांच्या नगरपरिषदेची जुनी समस्या अजूनही कायम

फलटण नगरपरिषदेचा इतिहास सुमारे १५७ वर्षांचा आहे. स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला तरी, गेल्या ७८ वर्षांतही शहरातील मूलभूत सुविधा अद्याप नागरिकांच्या तक्रारींच्या यादीत आहेत.

  • शहरात २४ तास पाणी पुरवठा नाही.
  • मुख्य रस्ते आणि उपरस्त्यांची दुरवस्था आहे.
  • रात्री पथदिवे अपुरी, काही भागात संध्याकाळीच काळोख पसरतो.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहाचा अभाव आहे.
  • स्वच्छता आणि कचरा संकलन अनियमित आहेत.
  • भाजी विक्रेते आणि लहान व्यापाऱ्यांना ठराविक जागा आणि सुविधा नाहीत.

सध्याच्या राजकीय गटांसाठी प्रचाराची तयारी जोरात आहे – राजे गट असो किंवा खासदार गट, रंगतदार प्रचार शहरात दिसून येत आहे. मात्र सामान्य फलटणकर फक्त एवढेच म्हणत आहेत – “इच्छुकांची गर्दी भरपूर आहे, पण विकासावर कोणी बोलत नाही.”

प्रभाग १२ मध्ये विकास काकडे यांची उमेदवारी चर्चेत; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

0
प्रभाग १२ मध्ये विकास काकडे यांची उमेदवारी चर्चेत; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

फलटण :-  फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या उमेदवारांच्या मुलाखतींना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १२ (अनुसूचित जाती राखीव) या जागेसाठी विकास वसंतराव काकडे यांच्या उमेदवारीबाबत नागरिकांमध्ये अपार उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मुलाखतीदरम्यान प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि युवतींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती जाणवली. विशेष म्हणजे, महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

आपल्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट करताना विकास काकडे म्हणाले,
“सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कार्यातून मी प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे.”

त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि जनसंपर्काचा उल्लेख आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वासमोर करण्यात आला.

साहस क्रीडा मंडळाचे अध्यक्ष असलेले विकास काकडे हे सामाजिक, सांस्कृतिक आणि युवकवर्गातील विविध उपक्रमांत नेहमीच आघाडीवर असतात. त्यांच्या आयोजन कौशल्यामुळे आणि तळागाळातील कार्यामुळे ते युवकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहेत.

राजे गटाच्या मुलाखतीनंतर प्रभाग क्रमांक १२ मध्ये उमेदवारीबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये विकास काकडे यांच्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून,
“राजे गटाने विकास काकडे यांना उमेदवारी दिल्यास प्रभागासाठी सक्षम नेतृत्व आणि विजयाची ताकद मिळेल,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रभागातील नागरिकांचा उत्साह आणि काकडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार पाहता, आगामी निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार हे निश्चित आहे. आता सर्वांचे लक्ष राजे गटाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

मंगळवार पेठेचा लोकसेवक सनी अहिवळे — समाजहितासाठी झटणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

0
मंगळवार पेठेचा लोकसेवक सनी अहिवळे — समाजहितासाठी झटणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मंगळवार पेठेचा लोकसेवक सनी अहिवळे — समाजहितासाठी झटणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

फलटण प्रतिनिधी :- फलटण शहरातील मंगळवार पेठ म्हटले की समाजहितासाठी सतत झटणारे, लोकांच्या अडचणी स्वतःच्या समजणारे आणि विकासकामांना प्राधान्य देणारे नाव म्हणजे माजी नगरसेवक सनी अहिवळे.
त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीमुळे मंगळवार पेठेतील नागरिकांच्या मनात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोमवार, दिनांक 10 नोव्हेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अष्टपैलू कार्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

राजकारण आणि समाजसेवेचा संगम
सनी अहिवळे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विचार व आचारांवर श्रद्धा ठेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले आहे.
नगरसेवकपद भूषवताना त्यांनी “सेवा हीच साधना” हे तत्व प्रत्यक्षात आणले. राजकारणाबरोबरच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्यात पत्नी सौ. सुपर्णा वहिनी अहिवळे यांचे मोलाचे सहकार्य असते.

कोरोनाकाळातील आशेचा किरण
करोना काळात जेव्हा सर्वत्र भीतीचे वातावरण होते, तेव्हा सनी अहिवळे यांनी नागरिकांसाठी रोज उत्तम दर्जाचे जेवण पुरवले. दोन वेळा किराणा किट वाटप करून अनेक कुटुंबांना दिलासा दिला. मोफत कोरोना टेस्ट व लसीकरण मोहिमा राबवून आरोग्य जनजागृती केली.
मोफत डोळे तपासणी, रक्तदान शिबिरे, महिलांसाठी आरोग्य मेळावे अशा अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी लोकांच्या आरोग्याचे भान ठेवले.

विकासकामांमध्ये पुढाकार
मंगळवार पेठेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी स्वच्छता, समाजविकास व सुविधा पुरवण्यात सनीदादा नेहमीच आग्रही राहिले आहेत.
रस्ते, वीज, गटार, व्यायामशाळा, वाचनालय, समाजमंदिर, शौचालय व प्राथमिक शाळा बांधणीसारख्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांमुळे मंगळवार पेठ आज आदर्श विभाग म्हणून ओळखली जाते.

दुर्बल घटकांसाठी आधार
अनाथाश्रमात वस्तू वाटप, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना साडी-शाल व फळांचे वाटप, पूरग्रस्तांसाठी मदत अशा कार्यांत सनी अहिवळे नेहमीच पुढे असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील अन्नदान हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.

महिलांसाठी प्रेरणादायी कार्य
दरवर्षी 8 मार्च महिला दिनानिमित्त ते “आदर्श महिला पुरस्कार” देऊन अनेक महिलांना समाजकार्यासाठी प्रेरणा देतात.

त्यांचे ब्रीदवाक्य — “राजकारण हे केवळ पदासाठी नाही, तर लोकांच्या हितासाठी असावे.”
शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.

अशा या लोकसेवकाला — समाजहितासाठी झटणाऱ्या, जनतेच्या मनात घर करणाऱ्या माजी नगरसेवक सनी अहिवळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
त्यांचे कार्य असेच प्रेरणादायी राहो, आणि त्यांचे नेतृत्व लोकांसाठी आशेचा दीप ठरो हीच शुभेच्छा.

रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, फॅटी लिव्हरची समस्या 100 पटीने वाढेल

0
रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, फॅटी लिव्हरची समस्या 100 पटीने वाढेल


Night Foods That Damage Liver: आजकाल लोक दिवसभर कामात व्यस्त असतात आणि रात्री आरामात जेवतात. पण हीच चूक महागात पडत आहे. या रात्रीच्या जेवणाचा आपल्या आरोग्यावर अनेकदा परिणाम होऊ शकतो. विशेषतः जेव्हा आपण रात्री तळलेले पदार्थ, जड जेवण किंवा गोड पदार्थ खातो आणि नंतर लगेच झोपतो तेव्हा ते यकृतावर अतिरिक्त दबाव आणते. या सवयींमुळे हळूहळू फॅटी लिव्हरसारखे आजार होतात. फॅटी लिव्हर ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये यकृताच्या पेशींमध्ये चरबी जमा होते. जेव्हा ही चरबी यकृताच्या एकूण वजनाच्या 5-10 टक्क्यांपेक्षा जास्त असते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. दोन प्रकार आहेत: अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (मद्यपींमध्ये) आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (खराब खाण्याच्या सवयी, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे). चांगली बातमी अशी आहे की योग्य दिनचर्या आणि आहाराने ते टाळता येते.

Add Zee News as a Preferred Source

रात्री कोणते पदार्थ खाणे टाळावेत?

तळलेले पदार्थ: रात्री समोसे, पुरी, पकोडे किंवा तळलेले भात यासारखे जड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने यकृतात चरबी जमा होऊ शकते.

जास्त गोड पदार्थ किंवा मिष्टान्न: रात्री गोड पदार्थ, केक किंवा साखरेचे प्रमाण जास्त असणे: इन्सुलिनची पातळी वाढते आणि चरबी साठवण्याचे प्रमाण वाढते.

अल्कोहोल किंवा सोडा पेये: हे थेट यकृताला हानी पोहोचवतात आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढवतात.

जास्त मांसाहारी पदार्थ: रात्री जास्त मसालेदार किंवा तळलेले मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते आणि यकृतावर दबाव येतो.

जेवणानंतर लगेच झोपणे: ही सवय चयापचय मंदावते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि यकृतामध्ये चरबी जमा होते.

असे केल्यास कोणती लक्षणे उद्भवू शकतात?

पोटाच्या उजव्या बाजूला सौम्य वेदना किंवा जडपणा
थकवा आणि अशक्तपणा
भूक न लागणे
अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे
त्वचा आणि डोळ्यांचा पिवळापणा (गंभीर प्रकरणांमध्ये)
जर ही लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय करावे?

रात्रीचे जेवण हलके आणि लवकर करा (सायंकाळी ७-८ वाजेपर्यंत).

तुमच्या आहारात पालक, ब्रोकोली, लिंबू, ताक आणि ग्रीन टी सारखे पदार्थ समाविष्ट करा.

अल्कोहोल, तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थांचे सेवन मर्यादित करा.

दररोज ३० मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करा.

त्रिफळा पावडर किंवा अभयरिष्ट सारखे आयुर्वेदिक उपाय स्वीकारा.

रात्रीचे जेवण हे फक्त पोट भरण्यासाठी नाही तर आरोग्य राखण्यासाठी आहे. चुकीचे अन्न खाणे किंवा जेवल्यानंतर लगेच झोपणे यकृताला हानी पोहोचवू शकते. फॅटी लिव्हर हा एक गंभीर परंतु टाळता येणारा आजार आहे; तुम्हाला फक्त योग्य माहिती आणि थोडी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.





Source link

Winter Health : थंडीत पाणी पिण्याची योग्य पद्धत, कमी पाणी प्यायल्यामुळे होणारे नुकसान आणि लक्षणे

0
Winter Health : थंडीत पाणी पिण्याची योग्य पद्धत, कमी पाणी प्यायल्यामुळे होणारे नुकसान आणि लक्षणे


Symptoms of Dehydration in Winter: हिवाळा जवळ येताच आपण कमी पाणी पिण्याची सवय लावतो. पण हिवाळ्यात आपण किती पाणी प्यावे आणि योग्य मार्ग कोणता हे तुम्हाला माहिती आहे का? चला येथे जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

हिवाळा येताच आपली दैनंदिन दिनचर्या बदलते. थंड हवा, उबदार कपडे आणि गरम चहा आणि कॉफी यांच्यात आपण अनेकदा एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो: पाणी पिणे! उन्हाळ्यात आपल्याला वारंवार तहान लागते, परंतु हिवाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची गरज भासत नाही. म्हणूनच लोक हिवाळ्यात कमी पाणी पितात, जे हळूहळू शरीराला हानी पोहोचवू शकते. पाणी फक्त तहान भागवण्यासाठी नाही, तर ते प्रत्येक शारीरिक कार्यासाठी आवश्यक आहे. पचनापासून ते त्वचेच्या तेजापर्यंत, सर्व काही पाण्यावर अवलंबून असते. हिवाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता, थकवा, कोरडी त्वचा आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती होऊ शकते. तर, हिवाळ्यात पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि कमी पाणी पिण्याचे दुष्परिणाम आणि लक्षणे काय असू शकतात ते जाणून घेऊया.

हिवाळ्यात पाणी पिण्याची योग्य पद्धत. 

कोमट पाणी प्या: थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी पिणे चांगले. ते शरीराला आतून उबदार ठेवते आणि पचन सुधारते.

नियमित अंतराने पाणी प्या: तुम्हाला तहान लागली असो वा नसो, दर १-२ तासांनी थोडे थोडे पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील.

उठताच पाणी प्या: तुमचा दिवस एका ग्लास कोमट पाण्याने सुरू करा. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लिंबू किंवा मध घालू शकता.

जेवण करण्यापूर्वी आणि नंतर तुमच्या पाण्याच्या सेवनाकडे लक्ष द्या: जेवणापूर्वी ३० मिनिटे आधी आणि १ तासानंतर पाणी पिणे पचनासाठी फायदेशीर आहे.

तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात पाणी साठवा: आयुर्वेदानुसार, तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात साठवलेले पाणी शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.

कमी पाणी पिण्याचे तोटे

बद्धकोष्ठता आणि पचन समस्या: पाण्याअभावी आतड्यांमध्ये कोरडेपणा येतो, ज्यामुळे आतड्यांच्या हालचालींमध्ये अडचण येते.

त्वचेची कोरडेपणा आणि सुरकुत्या: जर शरीराला हायड्रेटेड ठेवले नाही तर त्वचा कोरडी होते आणि अकाली सुरकुत्या दिसतात.

थकवा आणि डोकेदुखी: पाण्याअभावी रक्तप्रवाह मंदावतो, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखी होऊ शकते.

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे: शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, ज्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते.

लघवीचा रंग गडद: जर लघवी पिवळी किंवा गडद असेल तर ते डिहायड्रेशनचे लक्षण आहे.

हिवाळ्यात पाणी पिण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तहान लागली असो वा नसो, नियमितपणे पाणी पिणे महत्वाचे आहे. कोमट पाणी पिऊन, योग्य वेळी ते सेवन करून आणि आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करून, तुम्ही हिवाळ्यातही स्वतःला पूर्णपणे हायड्रेट ठेवू शकता.





Source link

दर रविवारी – चला बुद्धविहारी, आपले संविधान – आपले अधिकार” अभियानांतर्गत राजाळे येथे सूत्र पठन व संविधान जन जागृती

0
दर रविवारी – चला बुद्धविहारी, आपले संविधान – आपले अधिकार” अभियानांतर्गत राजाळे येथे सूत्र पठन व संविधान जन जागृती

“दर रविवारी – चला बुद्धविहारी, आपले संविधान – आपले अधिकार” अभियानांतर्गत राजाळे येथे सूत्र पठन व संविधान जन जागृती

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने “दर रविवारी – चला बुद्धविहारी” आणि “आपले संविधान, आपले अधिकार” या अंतर्गत सूत्र पठाण व संविधान जनजागृती अभियानांतर्गत राजाळे येथे राबवण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे धम्म विचारांद्वारे समाजात बंधुभाव, समता आणि न्यायाची जाणीव निर्माण करणे तसेच भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची जाणीव जनमानसात पोहोचवणे हा आहे. सुरुवातीला राजाळे परिसरात मंगल मैत्रीची फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, उपासक – उपासिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. फेरी दरम्यान सर्वांविषयी मंगल मैत्रीची भावना व्यक्त केली. त्याचप्रमाणे त्रिसरणाच्या मंगलमय सुरामध्ये ही फेरी पार पडली. “धम्म आणि संविधान” या दोन आधारस्तंभांच्या माध्यमातून समाजात मंगल मैत्री, जागरूक नागरिकत्व आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. यानंतर बुद्धविहारात सूत्र पठण करण्यात आले. उपासक – उपासिकांनी भारतीय संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
या वेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव सर, महासचिव आयु. बाबासाहेब जगताप सर. कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर, ज्येष्ठ मार्गदर्शक सोमीनाथ घोरपडे सर, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे सर, संघटक विजयकुमार जगताप सर, समता सैनिक दलाचे तालुका उपाध्यक्ष संपत भोसले सर, विविध विकास कार्यकारी सोसायटी चे व्हाईस चेअरमन विलास भालेराव, उपासक रोहीदास भंडारे, बौद्धाचार्य प्रशांत भालेराव, संबुद्ध, आदित्य महेश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना सूत्रपठनाची पुस्तक भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा फलटण च्या वतीने देण्यात आली.
                                                                                              “भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्र व राज्यस्तरीय २५ कलमी कार्यक्रमांतर्गत धम्मप्रसार, शिक्षण, महिला सबलीकरण आणि संविधान जनजागृती हे प्रमुख उद्दिष्ट आहे. संपूर्ण तालुक्यात ५६ ग्राम शाखा स्थापन करून हे अभियान सातत्याने राबविण्यात येत आहे.” यावेळी बोलताना तालुका शाखेचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयुष्यमान रामचंद्र मोरे म्हणाले,” डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला धम्माचा मार्ग आणि भारतीय संविधान याचे जर आपल्याला रक्षण करायचं असेल तर सर्वांनी दर रविवारी बुद्ध विहारात येऊन विचार मंथन केलं पाहिजे. तर आणि तरच धम्म आणि संविधान वाचणार आहे. तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या संकल्प करूया.” यावेळी बोलताना फलटण तालुका शाखेचे कार्यालय सचिव चंद्रकांत मोहिते म्हणाले,” आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी मनात मंगल मैत्रीची भावना व्यक्त करून सर्वांनी एकत्र येऊन केंद्राने दिलेल्या पंचवीस कलमी कार्यक्रम प्रभावीपणे राबवूया. फलटण तालुक्यात तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव व त्यांच्या नेतृत्वात काम करणारे आपण सर्व पदाधिकारी जे काम करत आहोत ते काम इतरही तालुक्यात पोहोचत आहे.” यावेळी तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक सोमीनाथ घोरपडे सर यांनी केंद्राने दिलेला 22 कलमी कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे राबवून जिल्हा पुढे आदर्श निर्माण करण्यासाठी सर्वांनी अंग झाडून काम करण्याविषयीची भावना व्यक्त केली. प्रस्थापित व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाप्रती चुकीच्या पद्धतीने मांडणी करत असताना आपण बाबासाहेबांचे वारसदार म्हणून त्याचे सत्य संशोधन करून मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सचिव आयुष्यमान बाबासाहेब जगताप सर यांनी केले.