पाऊस जोरदार होता, पण तात्यांच्या सेवेचा निर्धार त्याहूनही मोठा! वारकरी भिजू नयेत म्हणून तात्यासाहेब गायकवाड यांचा छोटासा पण मोलाचा प्रयत्न

0
9
पाऊस जोरदार होता, पण तात्यांच्या सेवेचा निर्धार त्याहूनही मोठा! वारकरी भिजू नयेत म्हणून तात्यासाहेब गायकवाड यांचा छोटासा पण मोलाचा प्रयत्न

पाऊस जोरदार होता, पण तात्यांच्या सेवेचा निर्धार त्याहूनही मोठा! वारकरी भिजू नयेत म्हणून तात्यासाहेब गायकवाड यांचा छोटासा पण मोलाचा प्रयत्न

फलटण | प्रतिनिधी :-संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान फलटण शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे वारकरी भाविकांची मोठी गैरसोय होत असतानाही सेवाभावाची परंपरा मात्र खंडित झाली नाही. अशाच सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब गायकवाड यांनी केलेली निस्वार्थ सेवा.

पावसाच्या सरींमध्ये अनेक वारकरी भिजत असल्याचे पाहून तात्यासाहेब गायकवाड यांनी तातडीने पुढाकार घेत वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी प्लास्टिक ताडपत्री व इतर आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून दिली. “वारकरी भिजू नयेत, त्यांची वारी सुखकर व्हावी” या एका भावनेतून त्यांनी हा छोटासा प्रयत्न केला.

पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमध्येही त्यांनी स्वतः उपस्थित राहून वारकऱ्यांच्या सोयीची काळजी घेतली. त्यांच्या या सेवेमुळे अनेक वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. वारकऱ्यांनीही त्यांच्या या सेवाभावाचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले.

आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समर्पण आणि मानवतेचे दर्शन घडवणारा सोहळा आहे. तात्यासाहेब गायकवाड यांनी केलेली ही सेवा त्याच परंपरेचे जिवंत उदाहरण ठरली. समाजात आजही निस्वार्थ सेवेला महत्त्व देणारी माणसे आहेत, याची प्रचिती त्यांच्या कृतीतून आली. पालखी सोहळ्यातील हा छोटासा प्रयत्न वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरला आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करून गेला.