महाराष्ट्रात यंदा मान्सूनने ओढ दिल्याने गेल्या अनेक दशकांतील कोरडेपणाचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी पुणे शहर आणि परिसरामध्ये पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुण्याच्या शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांत चक्क “शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्ष 1958 नंतर म्हणजेच तब्बल 68 वर्षांनी जूनचा पहिला पंधरवडा पूर्णपणे कोरडा जाण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे शहरावरील पाणीसंकट कमालीचे तीव्र झाले आहे. राज्यभरातच पावसाची कमालीची तूट राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पावसाची तूट कमालीची वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक तूट रायगड उणे 99% आणि मुंबई शहर उणे 98% इतकी नोंदवली गेली आहे. याशिवाय मुंबई उपनगर उणे 96%, सातारा उणे 90%, अहिल्यानगर उणे 88%, संभाजीनगर उणे 87%, रत्नागिरी उणे 84%, पुणे उणे 83%, सिंधुदुर्ग व कोल्हापूर उणे 80%, सांगली उणे 56% आणि सोलापूर जिल्ह्यात उणे 52% पावसाची तूट आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अद्याप मोसमी वारे पोहोचलेले नाहीत. राज्यात अवर्षणाचे सावट; जून महिन्यात मोसमी पावसाची तब्बल 81 टक्के तूट मान्सून आगमन झाले असले, तरी दमदार पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण राज्यात अवर्षणाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्याचा निम्मा कालावधी उलटून गेला तरीही अद्याप समाधानकारक पाऊस न पडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, 1 जून ते 20 जून या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल उणे 81 टक्के इतका अत्यंत कमी पाऊस झाला आहे. मान्सून पोहोचलेल्या जिल्ह्यांत अद्याप कोरडीठाक परिस्थिती कायम आहे. लवकरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता- अनुपम कश्यप आयएमडी पुण्याचे माजी प्रमुख व हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यप यांच्या मते, महाराष्ट्र आणि लगतच्या भागात कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली कार्यरत नसल्यामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे. लवकरच मान्सूनचा प्रवाह पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, शेजारील केरळममध्ये उणे 24%, कर्नाटकात उणे 37% तर गोव्यात उणे 73% पावसाची तूट आहे. येत्या 23 जूनच्या आसपास मान्सून पुन्हा सक्रिय होऊन तेलंगण, बिहार, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांतून पुढे सरकेल. 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनची महाराष्ट्रात झेप : खुळे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की,तब्बल 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने महाराष्ट्रात घेतलेली झेप, विशेषतः अलिबाग, पुणे, सातारा आणि मराठवाड्यापर्यंत झालेली वाटचाल बळीराजासाठी नक्कीच सुखावणारी आहे. अरबी समुद्रातील अनुकूल बदल आणि हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला मिळालेली नवी बळकटी यामुळे मुंबईतही पुढील दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस दाखल होईल, हा आशादायी अंदाज मनाला उभारी देतो. मात्र, दुसरीकडे विदर्भात 26 जूनपर्यंत राहणारा रात्रीचा उकाडा व उष्णतेची तीव्र लाट चिंतेची बाब असून, तेथील नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस पडू शकतो, असेही खुळे यांनी सांगितले. पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा घटल्याने पाणीपुरवठ्याचे संकट महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले की, धरणांमधील उपलब्ध जलसाठ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असून पुण्यातील धरणांमध्ये केवळ चार टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असल्याने एक दिवसाआड पाणी कपात करण्यात आलेली आहे. पाणी टँकरचे प्रमाणदेखील मागील एक आठवड्यापासून वाढलेले असून सध्या एकूण 1665 पाणी टँकर शहरात कार्यरत आहे. पुण्याची तहान भागवणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावत आहे. ऐतिहासिक आकडेवारी आणि भूतकाळातील स्थिती हवामान विभागाच्या नोंदीनुसार, यापूर्वी 1915 आणि 1932 मध्येही 20 जूनपर्यंत पुण्यात अशीच कोरडी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर जूनच्या उत्तरार्धात मान्सून सक्रिय झाला होता आणि चांगला पाऊस पडला होता. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, जून महिन्यात 1915 मध्ये एकूण 362 मिमी, 1932 मध्ये 79 मिमी आणि 1958 मध्ये 65 मिमी पाऊस नोंदवला गेला होता. यंदा मात्र “एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून कमालीचा कमकुवत झाला असून, वातावरणातील बदलांमुळे नागरिकांना भीषण उष्णता आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे वीज आणि पाण्याची मागणी कमालीची वाढली आहे. दुसऱ्या बाजूला पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, मका, कापूस आणि भात यांसारख्या खरीप पिकांची पेरणी पूर्णपणे ठप्प झाली आहे.
Source link
पुण्यामध्ये 1958 नंतर यंदा सर्वात कोरडा जून; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या: शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये चक्क ‘शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद – Pune News
महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड वितरण मेळावा उत्साहात; 262 लाभार्थ्यांना कार्डांचे वाटपश्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वितरण; लवकरच आधार नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड वितरण मेळावा उत्साहात; 262 लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वितरण; लवकरच आधार नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन
फलटण | प्रतिनिधी. फलटण शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून व शिवसेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ४ व ८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) वितरण मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत नोंदणी केलेल्या 262 महिला व ज्येष्ठ नागरिकांची कार्डे ॲक्टिव्ह करून त्यांचे वितरण शिवसेना नेते तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
फलटण येथील प्रमुख बसस्थानकावर जाऊन NCMC कार्डासाठी नोंदणी करताना अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब लक्षात घेऊन हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे लाभार्थ्यांना घराजवळच सहज व सुलभ पद्धतीने ही सुविधा उपलब्ध झाली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना NCMC कार्डाच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. एकाच कार्डच्या माध्यमातून एसटी बस, मेट्रो तसेच विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेता येणार असल्याने नागरिकांमध्ये या सुविधेबाबत विशेष उत्सुकता दिसून आली.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “एसटी प्रवासाबरोबरच भविष्यात विविध सार्वजनिक वाहतूक सेवा आणि डिजिटल व्यवहारांसाठी NCMC कार्ड महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.”
यावेळी नगरसेवक पप्पूभाई शेख, माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे, अमरअप्पा खानविलकर, किशोरतात्या देशपांडे, गाडे साहेब, दळवी साहेब, विजय जाधव, मेघना सहस्रबुद्धे, पत्रकार काकासाहेब खराडे, भाऊसाहेब कापसे, संतोष वेलणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार नोंदणी शिबिराचे आयोजनही लवकरच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले, तर आभार वैभव विष्णूप्रत यांनी मानले. माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना घराजवळच महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले. भविष्यातही अशाच लोकाभिमुख आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आरोग्याचा संदेश; मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण येथे ‘सुहासिनी योग’ उपक्रम उत्साहात संपन्न

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आरोग्याचा संदेश; मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण येथे ‘सुहासिनी योग’ उपक्रम उत्साहात संपन्न
फलटण | प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुधोजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, फलटण येथे विद्यार्थिनी, महिला कर्मचारी व पालकांसाठी विशेष ‘सुहासिनी योग’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला मुंबई येथील अनुभवी योग तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. आरोग्यदायी जीवनशैली, मानसिक संतुलन आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्याचे युवानेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याची कला आहे. आधुनिक धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने योगाचा अंगीकार करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे गरजेचे आहे.”
मुंबईहून आलेल्या योग तज्ज्ञांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि तणावमुक्तीसाठी उपयुक्त तंत्रांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. महिलांनी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाभ्यासाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमादरम्यान नियमित योगाभ्यासाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा आरोग्यवर्धक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुधोजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनी व महिलांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण झाली असून निरोगी जीवनशैलीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे.
महाविकास आघाडीला धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासारख्या फायरब्रँड नेतृत्वाची गरज”

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीतही विचारांची लढाई; विरोधकांना आक्रमक नेतृत्वाची गरज असल्याची चर्चा
सोलापूर | प्रतिनिधी. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी भाजपला थेट आव्हान देणाऱ्या आणि संघर्षाची भूमिका घेणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.
सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था आमदारकीच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठी आणि शरद पवार यांच्या आदेशानुसार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे होते. भाजपने केवळ आपल्या पक्षातीलच नव्हे, तर महाविकास आघाडीतील काही आमदारांनाही आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवल्याचे चित्र निर्माण झाले होते.
जिल्ह्यातील ११ आमदार एका बाजूला आणि धैर्यशील मोहिते-पाटील दुसऱ्या बाजूला, अशी परिस्थिती असतानाही त्यांनी संघर्षाची भूमिका कायम ठेवली. ६१६ मतदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ २९ मते असतानाही उमेदवार वसंत नाना देशमुख यांना ११८ मते मिळाली. हा निकाल विचारांची ताकद आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे प्रतीक मानला जात आहे.
राजकारणात सत्ता, संख्या आणि संसाधनांच्या जोरावर समीकरणे बदलली जात असली, तरी विचारांची लढाई लढण्यासाठी धैर्य, स्पष्ट भूमिका आणि जनतेशी थेट नाळ असलेले नेतृत्व आवश्यक असते. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ही निवडणूक केवळ राजकीय स्पर्धा म्हणून न पाहता विचारांची लढाई म्हणून लढल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणात विरोधकांच्या भूमिकेला धार देणारे, अन्यायाविरोधात आवाज उठवणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे नेतृत्व म्हणून धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव राज्याच्या राजकारणात ठळकपणे पुढे येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील लोकशाही अधिक सक्षम राहण्यासाठी सत्तेला प्रश्न विचारणारे आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत
एन. रघुरामन यांचा कॉलम: ‘इंधन स्थानके’ वाचवल्याने मानवाचे अन्न देखील वाचेल
आपल्यापैकी बहुतेक लोक एका वेळी 5 किमी पेक्षा जास्त चालू शकत नाहीत. तरीही, आपण 42 किमी मॅरेथॉन धावपटूंना आश्चर्याने पाहतो. पण तेही दर 5 किलोमीटरवर असलेल्या फ्यूलिंग स्टेशनशिवाय धावू शकत नाहीत, जरी त्यांना तिथे थांबण्यासाठी कोणताही नियम बंधनकारक नसतो. आयोजक ही केंद्रे यासाठी बनवतात, कारण धावपटूंच्या शरीरातून घामावाटे खूप पाणी आणि सोडियम बाहेर पडते. त्यांना दर तासाला 60-90 ग्रॅम कार्बोहायड्रेट (जेल, स्पोर्ट्स ड्रिंक किंवा फळे) लागते, जेणेकरून त्यांची ऊर्जा पूर्णपणे संपू नये. फ्लूइड स्टेशन हृदय व रक्तवाहिन्यांवरील ताण आणि अतिउष्णतेपासून संरक्षण करतात, तर इलेक्ट्रोलाइट पेये शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास आणि गंभीर पेटके रोखण्यास मदत करतात. आता कोणी दरवर्षी 30 हजार किमी पेक्षा जास्त प्रवासाची कल्पना करू शकतो का? आर्कटिक टर्न असे करतात. तांत्रिकदृष्ट्या ते चालत नाहीत, उडतात. ते ‘स्थलांतराचे विजेते’ या नावाने विख्यात आहेत. या पक्ष्यांचे वजन 100 ग्रॅमपेक्षा थोडे जास्त असते, तरीही ते दरवर्षी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत स्थलांतर करतात. आर्कटिक टर्न वार्षिक 90 हजार किमीचा गोल प्रवास करतात. तरीही ते मासेमारी आणि विश्रांतीसाठी थांबतात. न थांबता सर्वात लांब उड्डाणाचा विक्रम बार-टेल्ड गॉडविट पक्ष्याच्या (लिमोसा लॅपॉनिका) नावावर आहे, ज्याने ऑक्टोबर 2022 मध्ये अलास्का ते टास्मानियापर्यंत 13560 किमी अंतर 11 दिवसांत जमिनीवर न उतरता पार केले होते. ते असे कसे करतात? स्थलांतरित पक्षी माणसांसारखे थकत नाहीत, कारण त्यांनी एक असाधारण इंधन प्रणाली (फ्यूल सिस्टम) विकसित केली आहे. उड्डाणापूर्वी त्यांचे वजन 50-100% पर्यंत वाढते. ते कार्बोहायड्रेट्सऐवजी चरबी (फॅट) जाळतात, जी प्रति ग्रॅम दुप्पटपेक्षा जास्त ऊर्जा देते. वजन कमी ठेवण्यासाठी ते अनावश्यक अवयव लहान करतात आणि सहज उडण्यासाठी वरच्या दिशेने वाहणाऱ्या गरम हवेच्या प्रवाहांचा (थर्मल्सचा) आधार घेतात. तरीही त्यांना इंधन भरण्याच्या ठिकाणांची (फ्यूलिंग स्टेशनची) गरज असते, जी निसर्गाने भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिली आहेत. जेव्हा ते पुन्हा इंधन भरण्यासाठी थांबतात, तेव्हा ते मानवजातीच्या भल्यासाठी मोठे काम करतात. ते शेतीचे रक्षण करणाऱ्या एजंटप्रमाणे काम करतात आणि दररोज लाखो कीटक खाऊन रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करतात. पिके खाणारे भुंगे आणि अळ्या खाऊन ते शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या संभाव्य नुकसानीपासून वाचवतात. गुजरात वन विभाग अहमदाबादपासून सुरेंद्रनगर जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या नलसरोवर पक्षी अभयारण्यात उच्च-शक्तीच्या सौर फ्लडलाइट्स बसवत असल्याचे मी वाचले, तेव्हा मला त्यांची मानवतेची ही सेवा आठवली. शिकारीवर बंदी घालण्याच्या उद्देशाने उचललेल्या या पावलामुळे पर्यावरणवादी आणि पक्षीशास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. त्यांना भीती आहे की कृत्रिम प्रकाशामुळे पक्ष्यांच्या वर्तनावर परिणाम होईल आणि स्थलांतरित प्रजाती तिथून दूर जातील. तज्ञांचा दावा आहे की यामुळे त्यांचे खाण्याचे नमुने बिघडतील, ताण वाढेल, दिशा ओळखण्यात समस्या निर्माण होईल आणि त्यांच्या अधिवासांची गुणवत्ता कमी होईल. पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे की, वन अधिकाऱ्यांना वाटते की ‘प्रकाशाने बेकायदेशीर गतिविधींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, परंतु पाण्यावरील प्रकाशाची चमक पक्ष्यांना त्रास देईल. अनेक प्रजाती अभयारण्यातून निघून जाऊ शकतात आणि कधीही परत येणार नाहीत. वेटलँडमध्ये प्रकाश टाकण्याऐवजी अधिकाऱ्यांनी कर्मचारी आणि रात्रीची गस्त वाढवावी.’ शिकारी प्राण्यांपासून वाचण्यासाठी गाणारे पक्षी (सॉन्गबर्ड) देखील रात्रीच्या वेळी थव्याने स्थलांतर करतात, तर हा प्रकाश त्यांनाही गोंधळात टाकू शकतो. पक्ष्यांचे स्थलांतर केवळ एक जैविक आश्चर्य नाही, तर ते परिसंस्थेच्या नूतनीकरणाच्या जागतिक चक्राचा एक महत्त्वाचा भाग देखील आहे. याशिवाय जागतिक जैवविविधता नष्ट होईल. वाघासारख्या पट्ट्या असलेल्या गाणाऱ्या पक्ष्याचा (सॉन्गबर्ड) विचार करा, ज्याचे वजन १३ ग्रॅमपेक्षा जास्त नसते, पण तो ८००० किमीचा प्रवास करतो. त्या बदल्यात त्याला अशा गोष्टी खाण्याची संधी मिळते, ज्यांना उत्साही निसर्गप्रेमी देखील नापसंत करतात – कीटक, जे अन्यथा आपली पिके फस्त करतील. जगभरात पक्षी संकटात आहेत. ॲमेझॉन खोऱ्यापासून आर्कटिक टुंड्रापर्यंत कीटकांची संख्या देखील कमी होत आहे. यामुळे या पक्ष्यांसाठी खूप कमी जागा उरल्या आहेत, जिथे त्यांना आराम, अन्न आणि घरटे बनवण्यासाठी जागा मिळते. यामागचा विचार असा आहे की जर आपल्याला वाढत्या मानवी लोकसंख्येसाठी अन्नपुरवठा सुरक्षित ठेवायचा असेल, तर आपल्याला स्थलांतरित पक्ष्यांसाठी अधिक इंधन स्थानके (म्हणजेच जंगल आणि पाणथळ जागा) वाचवावी लागतील आणि तयार करावी लागतील, जेणेकरून ते कीटक खाऊ शकतील आणि आपल्या परिसंस्थेला (अन्नाला) सुरक्षित ठेवू शकतील.
Source link
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
बिजवडी, दि. २१ जून : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिर्के सर यांनी उपस्थित योगगुरू श्री. अनिल एकनाथ गोसावी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक श्री. सावंत सर यांनी प्रास्ताविकातून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले.
श्री. सावंत सर म्हणाले की, योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य जीवनशैली आहे. योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधणारे विज्ञान आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढणारा ताणतणाव, असंतुलित जीवनशैली, मोबाईल आणि संगणकाचा अतिवापर यामुळे निर्माण होणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्यांवर योग हा प्रभावी उपाय आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक व सुदृढ राहते, एकाग्रता वाढते, आत्मविश्वास वृद्धिंगत होतो तसेच मानसिक शांतता प्राप्त होते.
त्यांनी योगाच्या विविध अंगांविषयी माहिती देताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाची ओळख करून दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत नियमित योगाभ्यासाची सवय लावण्याचे आवाहन केले.
यानंतर योगगुरू श्री. अनिल एकनाथ गोसावी सर यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, नियमित योग व प्राणायामामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते, श्वसनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते. योगामुळे जीवनशैलीशी संबंधित अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी लहान वयापासून योगाची सवय लावल्यास त्यांचा शारीरिक, बौद्धिक व भावनिक विकास अधिक प्रभावीपणे होतो.
त्यानंतर श्री. गोसावी सर यांनी विविध बैठे व उभ्या योगासनांचे तसेच प्राणायामाचे प्रात्यक्षिक घेतले. यामध्ये ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पद्मासन, वज्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन आदी आसनांचा समावेश होता. तसेच अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती, दीर्घ श्वसन यांसारख्या प्राणायाम प्रकारांचे मार्गदर्शन करून त्यांचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सर्व योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमात संपूर्ण शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका तसेच ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेत योगाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्याची प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
जवानाच्या पत्नीचे जीवन म्हणजे त्याग, समर्पण, संयम आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण – पारिजातका जगताप

जवानाच्या पत्नीचे जीवन म्हणजे त्याग, समर्पण, संयम आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण – पारिजातका जगताप
फलटण (प्रतिनिधी) : देशाच्या सीमांवर अहोरात्र सजग राहून राष्ट्ररक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या भारतीय सैनिकांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबीयांचे, विशेषतः पत्नींचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आणि प्रेरणादायी असते. जवान देशसेवेसाठी घरापासून दूर असताना संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळणाऱ्या आयुनि सोनाली विकास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा भावनिक आणि प्रेरणादायी विचार व्यक्त करण्यात आला.
मौजे ढवळ येथील सुपुत्र आयु. विकास गायकवाड हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून राष्ट्रसेवेच्या कर्तव्यासाठी त्यांना अनेकदा कुटुंबापासून दूर राहावे लागते. अशा परिस्थितीत पत्नी म्हणून आयुनि सोनाली गायकवाड या घरातील ज्येष्ठांचा सन्मान राखत, कुटुंबातील प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. सैनिकाच्या पत्नीचे जीवन हे केवळ प्रतीक्षेचे नसून त्यात कर्तव्य, त्याग, संघर्ष, संयम आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याची मोठी जबाबदारी असते. अनेक कौटुंबिक समारंभ, आनंदाचे क्षण आणि कौटुंबिक निर्णय सैनिकांच्या अनुपस्थितीत सांभाळताना त्यांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागते; मात्र त्या न डगमगता संपूर्ण कुटुंबाचा भार समर्थपणे पेलत असतात.
यावेळी शुभेच्छा देताना आयुनि पारिजातिका जगताप म्हणाल्या, “सीमेवर देशाची सेवा करणाऱ्या जवानाच्या पत्नीचे जीवन हे त्याग, समर्पण आणि जबाबदारीचे मूर्तिमंत उदाहरण असते. सैनिक देशाचे रक्षण करत असताना त्यांच्या कुटुंबाचे रक्षण, संगोपन आणि व्यवस्थापन करण्याची मोठी जबाबदारी पत्नीवर येते. आयुनि सोनाली गायकवाड या अत्यंत संयमी, मितभाषी, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व आहेत. आपुलकी, जिव्हाळा आणि माणुसकी जपत त्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. त्यांच्या कार्यातून अनेक महिलांना प्रेरणा मिळेल. त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.”
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, शाखा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी शुभेच्छा व्यक्त करताना सांगितले की, “भगवान बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या कृपेने गायकवाड परिवाराचे जीवन मंगलमय होवो. त्यांच्या सर्व सदिच्छा पूर्ण होवोत. प्रेम, मैत्री, विश्वास आणि आपुलकीची नाती अधिक दृढ होत राहोत. धम्माच्या मार्गाने हा परिवार सातत्याने प्रगतीपथावर राहो, हीच सदिच्छा.”
कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुक्याचे माजी कोषाध्यक्ष तथा बौद्धाचार्य आयु. विठ्ठल निकाळजे सर यांनी बौद्ध धम्म संस्कार विधीनुसार मंगल विधीचे संचालन केले. उपस्थित ज्येष्ठांच्या हस्ते आयु. विकास गायकवाड व आयुनि सोनाली गायकवाड यांना शुभाशीर्वाद देण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा परिवार (BBM Family) चे सदस्य, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव, सरचिटणीस बाबासाहेब जगताप, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड, संघटक आनंद जगताप, म रा महावितरण कंपनी चे अभियंता अविनाश अहिवळे साहेब, प्रा. संध्या अहिवळे, फलटण पंचायत समितीच्या माजी सदस्या आयुनि कल्पना महावीर भालेराव, आयुनि भाग्यश्री गायकवाड, आरोग्य विभागातील आयुनि अश्विनी मोरे, योगिता घोरपडे तसेच गायकवाड परिवारातील सर्व मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांइतक्याच त्यांच्या पत्नीही राष्ट्रसेवेच्या या प्रवासातील निःशब्द योद्धा असतात. कर्तव्य, त्याग आणि संयमाने त्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत समाजासमोर आदर्श निर्माण करतात.”
दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक चळवळींना राजघराण्याचा पाठिंबा कायम; युवराज अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची ग्वाही

फलटण/पुणे | प्रतिनिधी : समाजाच्या वैचारिक जडणघडणीसाठी साहित्य, संस्कृती आणि बौद्धिक विचारांना चालना देणारे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून अशा दर्जेदार साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्याचे भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
पुण्यातील सावरकर अध्यापन केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या तरुण लेखक रविराज यांच्या ‘अर्जुनाचा गांडीव शोध’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, आध्यात्मिक मार्गदर्शक प्रमोद पानसे, विद्या वैभव प्रकाशनचे प्रमुख बकुळ पराडकर आणि प्राचार्य रवींद्र येवले यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
लेखक रविराज यांनी आयटी क्षेत्रातील नोकरीचा त्याग करून पूर्णवेळ लेखन क्षेत्राची निवड केली आहे. ‘अर्जुनाचा गांडीव शोध’ हे त्यांचे चौथे पुस्तक असून साहित्य क्षेत्रातील त्यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी प्रवासाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमात प्राचार्य रवींद्र येवले यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या विचारांची दखल घेत योगेश सोमण यांनी समाजाला अशा प्रेरणादायी शिक्षकांची आज नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
या सोहळ्याचे नियोजन अनुबंध कला मंडळाचे अध्यक्ष बकुळ पराडकर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित मान्यवरांना फलटणचे राजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यावर आधारित ‘अजिंक्य राजा’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
यावेळी ॲड. विजय नेवसे, विजय जाधव, विष्णुपंत शिंदे, अरुण भोईटे यांच्यासह साहित्यप्रेमी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य, संस्कृती आणि वैचारिक परंपरेचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.
आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी

आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी
फलटण | प्रतिनिधी :- फलटण–कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) शहराध्यक्ष राहुल अशोक निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून एक अज्ञात व्यक्ती स्वतःला “आमदारांचा पुतण्या” असल्याचे भासवत फलटण तालुक्यातील विविध नागरिकांना फोन करत आहे. संबंधित व्यक्ती आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या नावाचा वापर करून नागरिकांशी संवाद साधत असल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राहुल निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने अनेक प्रतिष्ठित नागरिक तसेच महिलांनाही फोन करून अर्वाच्य भाषेचा वापर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही महिलांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत तक्रारी नोंदवल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, अज्ञात व्यक्तीचे हे कृत्य केवळ नागरिकांना त्रासदायक नसून आमदार सचिन कांबळे पाटील यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. तसेच या प्रकारामागे एखादी व्यक्ती किंवा संघटित गट कार्यरत आहे का, याचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रकरणी संबंधित मोबाईल क्रमांक व कॉल रेकॉर्डच्या आधारे तपास करून आरोपीचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राहुल निंबाळकर यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, फलटण शहर पोलीस ठाण्याने तक्रार स्वीकारली असून या प्रकरणी पुढील चौकशी व आवश्यक कार्यवाही सुरू होण्याची शक्यता आहे.


