
नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया
एका व्यक्तीने म्हटले की, “भारतीयांनी या संधीचा फायदा घेत येथे १०० रुपयात चप्पल खरेदी करावी आणि ४५०० रियाल म्हणजेच १ लाखात सौदी अरेबियात विक्री करावी. फैज नावाच्या आणखी एका एक्स युजरने लिहिले की, जेव्हा तुमच्याकडे खूप पैसे असतात, तेव्हा तुम्ही एका गोष्टीसाठी हजारो रुपये मोजता. भारतीय चप्पल उत्पादकांसाठी ही व्यवसायाची संधी आहे, अशी प्रतिक्रिया एक्स युजर शुभम वर्मा ने दिली आहे. चौथ्या पोस्टमध्ये लिहिले की, “मला आठवते की जेव्हा माझ्या वडिलांनी मला नवीन जोडी आणयचे, तेव्हा मला किती आनंद व्हायचा. मी त्यांची खूप चांगली देखभाल करायचो. त्यांना रिन साबणाने स्वच्छ केल्याने ते पांढरे राहण्यास मदत होते. एकेकाळी आयुष्य साधे होते.