
मोदी म्हणाले, की, काँग्रेसचा तिसरा सर्वात मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा शंबरचा टप्पा पार करता आला नाही. त्यांची आतापर्यंतची तिसरी सर्वात वाईट कामगिरी आहे. काँग्रेसने या निवडणुकीत झालेला आपला पराभव स्वीकारला असता, जनतेने दिलेल्या जनादेशाचे आत्मपरीक्षण केले असते, तर बरे झाले असते. मात्र ते शीर्षासन करण्यात व्यस्त असून आमचा पराभव केल्याचे जनतेला सांगत आहेत. असे करून ते बालकाचे मनोरंजन करण्याचे काम करत आहेत.








