
यासोबतच विवाहाच्या पवित्र बंधनावरही खंडपीठाने महत्त्वपूर्ण भाष्य केले. एकमेकांबद्दल असलेली आत्मीयता, निष्ठेच्या जोरावर संसार फुलतो. परंतु सतत विभक्त होण्याची वारंवार कृती लग्न या विचाराचा पाया उखडून टाकतो आणि यामुळे नात्याचे पावित्र्य धोक्यात येत असल्याचे, खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालय म्हटले आहे की, “दूर जाण्याची आणि नातं तोडण्याच्या भाषेमुळे अथवा कृतीमुळे विवाहाचे बंधन तुटते. ते पुन्हा जोडता येत नाही. विश्वास आणि बांधिलकीच्या या नात्यावर कधीही भरून न येणारी जखम आहे.”








