
२०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राईकदरम्यान भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान तालिबानने केलेल्या हल्ल्यात मेजर मोईज अब्बास शाह शहीद झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात आणखी एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे. विशेष म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण राहिले आहेत.