
फलटण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या अभिवादन प्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या सामाजिक समतेचा, शिक्षणाचा आणि प्रगतीचा महान विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच भारतीय संविधानातील मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये विविध मान्यवर, नागरिक आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.








