Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यातून ‘चलो मुंबई’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण तालुक्यातून ‘चलो मुंबई’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षाला निर्णायक टप्पा मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिलेल्या ‘चलो मुंबई’ च्या हाकेला फलटण तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

आज गुरुवार, दिनांक 28 ऑगस्ट रोजी हजारो मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून वाहनांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले.

जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान केले असून ते 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटण तसेच अखंड मराठा समाजाने गेल्या आठ दिवसांत गावागावात जनजागृती मोहीम राबवली.

समन्वयकांनी घोषणा दिली –
“आता कुठे जायचं? मुंबईला जायचं!”

हजारो वाहने मुंबईच्या दिशेने निघाली असून, “आरक्षण मिळाल्याशिवाय परतायचं नाही” असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments