श्रीरामपूर मध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमुळे मताच्या विभागणीचा फायदा जितेंद्र तोरणे यांना होणार?

0
1
श्रीरामपूर मध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमुळे मताच्या विभागणीचा फायदा जितेंद्र तोरणे यांना होणार?

श्रीरामपूर : अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील “हाय वोल्टेज लढाई” असणाऱ्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापत चाललं आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार हेमंत ओगले तर दुसरीकडे महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लहू कानडे व शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे मैदानात उतरले आहेत. महायुतीतील मित्र पक्षांमध्येच लढत रंगल्याने आता महाविकास आघाडीचा एक तर महायुतीचे दोन असे उमेदवार आपापसात विधानसभेसाठी लढाई लढत आहेत.

या तिघांच्या थेट लढतीत महाराष्ट्र स्वराज पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र तोरणे यांनी उडी घेतल्यानंतर श्रीरामपूर विधानसभेचे राजकीय गणित झपाट्याने बदलत चालले आहे. पारंपरिक व घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळलेले मतदारसंघातील मतदार जितेंद्र तोरणे यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. सुशिक्षित व स्वच्छ राजकीय प्रतिमा अशी त्यांची ओळख मतदारसंघात आहे. निवडणूक प्रचारात जितेंद्र तोरणे आघाडीवर असून गावभेट दौरे व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या शैलीमुळे त्यांची लोकप्रियता वाढतेय असं स्थानिकांचं मत आहे.

महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये यंदाच्या निवडणुकीत मतांची मोठ्या प्रमाणावर विभागणी होणार असं सध्याचं राजकीय गणित सांगतंय. हेमंत ओगले विरुद्ध लहू कानडे विरुद्ध भाऊसाहेब कांबळे या लढतीत महाविकास आघाडी व खासकरून महायुतीचे मतदान मोठ्या प्रमाणावर विभागले जाणार आहेत, ज्याचा थेट फायदा जितेंद्र तोरणे यांना होण्याची शक्यता आहे. तरुण, सुशिक्षित व स्वच्छ उमेदवार अशी प्रतिमा, घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळलेले मतदार, युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर घेतलेली रोखठोक भूमिका या सगळ्यांचा फायदा परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून जितेंद्र तोरणे यांना होणार अशी शक्यता सध्या वर्तविली जाते आहे.अंतिम निकाल मात्र वेळ ठरवेल.