
भाजप खासदार कंगना रणौत यांनी तीन काळे कृषी कायदे पुन्हा लागू करण्याबाबत वक्तव्य केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे. कंगना रणौतने या प्रकरणी माफी मागितली असून मला माझ्या वक्तव्याचा पश्चाताप असल्याचे म्हटले आहे. कंगना रणौतच्या या शेतकरीविरोधी वक्तव्यानंतर राजकारण तापलं आहे. भाजप पुन्हा शेतकरीविरोधी तिन्ही काळे कायदे आणणार असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. आता काँग्रेस खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट प्रश्न विचारला आहे.