
मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांनी याबाबत शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे. मात्र तरीही हे प्रकरण शांत होताना दिसत नाही. आता साताऱ्यातील माण येथील तरुणाने महाराज आमची चूक झाली, आम्हाला क्षमा करा, असं म्हणत कराड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळापर्यंत ३ किलोमीटर नाक घासत आंदोलन केलं. महेश करचे असे या तरुणाचे नाव आहे.