
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद सुखाई चौरसिया (वय, ३५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अरविंद आणि त्याचा मित्र संजोग सुरेश टीनगोटे (वय, २९) यांनी शिर्डीला जाण्याचे ठरवले. त्यानुसार, २४ जुलै ठाणे स्थानकावरून ट्रेन पकडण्याचा त्यांचा प्लान होता. परंतु, त्यांना उशीर झाल्याने ट्रेन चुकली. यानंतर दोघांनी ठाणे स्थानकाबाहेरील एका लॉजमध्ये दोन खोल्या बूक केल्या. झोपण्यापूर्वी अरविंदने दारुसह अंब्याच्या रसाचे प्राशन केले आणि आपल्या खोलीत झोपायला गेला.





