
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस
राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने विविध शहरांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली असून वाहतूक कोंडी झाली. याशिवाय भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पूर स्थिती निर्माण झाली असून जीवित व वित्तहानी झाली आहे. भारतीय हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि अमरावती सह इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, सातारा, रत्नागिरी साठी रेड अलर्ट जारी केला होता. तसेच नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.