
शंकराचार्यांनी यावेळी अनंत अंबानी यांच्या विवाह समारंभात पंतप्रधान मोदींची भेट झाल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, पीएम नरेंद्र मोदींनी मला प्रणाम केला, मीही त्यांना आशीर्वाद दिला. आम्ही त्यांचे शत्रू नाही तर हितचिंतक आहे. जेव्हा ते चुकीचे करतात तेव्हा आम्ही स्पष्ट सांगतो की, येथे चूक झाली आहे. शंकराचार्यांनी म्हटले की, शास्त्रांमध्ये लिहिले आहे की, सोमनाथ सौराष्ट्र म्हणजे गुजरातमध्ये असेल. केदारनाथ हिमालयात असेल. याला कोणता पर्याय असू शकत नाही. जर आम्ही हे दिल्लीत बनवण्याचा प्रयत्न करू तर ते चुकीचे होईल. केदारनाथ एकच आहे व जेथे आहे, तेथेत राहील.







