
17 जुलै 2020 रोजी पंतप्रधानांनी देशाला ‘मोदींची गॅरंटी’ दिली होती की, 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छत असेल. पण आता पंतप्रधान 3 कोटी घरे देण्याची बढाई मारत आहेत, जणू त्यांनी आधीची हमी पूर्ण केली आहे. मो
नवी दिल्ली : सध्या देशात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. देशातील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात 3 कोटी घरे बांधण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदींची ‘गॅरंटी’ पोकळ निघाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
17 जुलै 2020 रोजी पंतप्रधानांनी देशाला ‘मोदींची गॅरंटी’ दिली होती की, 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छत असेल. पण आता पंतप्रधान 3 कोटी घरे देण्याची बढाई मारत आहेत, जणू त्यांनी आधीची हमी पूर्ण केली आहे. मोदी सरकारला इतर लोकांच्या घरातून खुर्चा उधार घेऊन सत्तेचे ‘घर’ सांभाळावे लागले.








