
मात्र, यानंतर आता प्रतीकने मयुरीपासून दूर जावं यासाठी अश्विनीने त्याला शहर सोडून जाण्याची अट घातली आहे. या अटीप्रमाणे आता प्रतीक मुंबई सोडून निघून गेला असून, त्याने सगळ्यांशी संपर्क देखील तोडला आहे. मात्र, याच धक्यात आता मयुरीने देखील आपल्याला आईला दोष देत घर सोडलं आहे. शिल्पीच्या डावामुळे आता अश्विनी आणि मायुरीमध्ये मोठी दरी निर्माण होणार आहे. तर, दुसरीकडे शिल्पी याच संधीचा फायदा उचलत सगळ्यांची मन आपल्या बाजूने वळवून घेणार आहे. अश्विनीचा निर्णय कसा चुकला, हे ती आता सगळ्यांना पटवून देणार आहे.