सातारा : राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिवसागर जलाशयात बोट पलटी झाल्याची घटना घडली होती. या पलटी झालेल्या बोटीच्या चालकाचा मृतदेह सापडला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास दोन पर्यटकांना शिवसागर जलाशयात फिरण्यासाठी घेऊन जात असताना वादळी वाऱ्यामुळे बोट पलटी झाली होती. यामधील दोन्ही पर्यटकांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले होते.
काल संध्याकाळच्या सुमारास दोन पर्यटकांना शिवसागर जलाशयात फिरण्यासाठी घेऊन जात असताना वादळी वाऱ्यामुळे बोट पलटी झाली होती. मात्र शिवसागर बोट क्लब मधील बोटीचा चालक रुपेश तांबे बेपत्ता झाला होता. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला आहे. सावरी येथील सुरु असलेल्या नवीन पुलाच्या ठिकाणी ही घटना घडली होत.
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथे खाजगी बोट तेटली येथे कोयना जलाशयात उलटल्याची घटना घडली होती. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामध्ये बामनोली जवळच्या शिवसागर जलाशयात दोन पर्यटकांना घेऊन ही बोट निघाली होती. यावेळी बोट पलटी झाली होती. यानंतर दोन्ही पर्यटक पाण्यातून पोहून सुखरूप बाहेर निघाले होते. मात्र शिवसागर बोट क्लब मधील बोटीचा चालक बेपत्ता झाला होता. रुपेश धोंडीबा तांबे असे बोट चालकाचे नाव होते. सावरी येथील सुरू असलेल्या नवीन पुलाच्या ठिकाणी ही घटना घडली होती. या घटनेनंतर शिवसागर बोट क्लब च्या सभासदांकडून आज सकाळपासून शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. अखेर बोट चालकाचा मृतदेह सापडला आहे.
आणखी वाचा







