आजकाल कथांमध्ये गर्दी वाढत आहे. परंतु गरुड आणि काकभूशुंडीयांच्यातील संभाषणात तुलसीदासांनी कथांचा सर्वात मोठा प्रभाव स्पष्टकेला. पक्ष्यांचा राजा गरुड म्हणाला, “आता, मला श्रीरामाची कथा सांगा.ती अत्यंत शुद्ध करणारी आहे. नेहमीच आनंद देते. सर्व दुःखांचा नाशकरते.’ पवित्रता, आनंद आणि दुःख हे सर्व कथेत गुंतलेले आहेत.कथेतील पात्रे आणि घटना आपल्याला जीवनात काहीतरी करण्याचीआणि काहीतरी घडू देण्याची प्रेरणा देतात. आपण आपल्या कर्मांच्यापरिणामाबद्दल विचार करतो तेव्हा समस्या सुरू होते. निसर्ग आपले कामकरत असतो. तुम्ही कल्पना केलेले अचूक फळ मिळेल, हे गरजेचे नाही.म्हणून कथा ऐकल्याने एक शक्ती मिळते. ती आपल्याला हसत-खेळतआव्हानांना तोंड देण्यास मदत करते.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: कथा ऐकल्याने आव्हानांवर मात करण्याची शक्ती मिळते
फलटण पंचायत समितीत कौल समसमान; सत्तास्थापना चिठ्ठीवर ठरण्याची शक्यता

फलटण | प्रतिनिधी फलटण पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी दोन्ही प्रमुख राजकीय गटांना समसमान कौल दिला असून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीला प्रत्येकी ८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पद चिठ्ठीवर ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून सत्तास्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीसाठी ७२ टक्के मतदान झाले होते. आमदार रामराजे नाईक निंबाळकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युती यांच्यात थेट आणि अत्यंत चुरशीचा सामना झाला.
फलटण येथील शासकीय गोदामात सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. अनेक गटांत अल्पमताने विजय-पराभव ठरला. काही ठिकाणी फेरमतमोजणीची मागणी झाली, मात्र निकालात कोणताही बदल झाला नाही.
जिल्हा परिषद निकाल
जिल्हा परिषदेच्या ८ जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) ५, तर भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीला ३ जागा मिळाल्या.
भाजपला वाठार (निंबाळकर) व हिंगणगाव गटात, तर राष्ट्रवादी काँग्रेसला गुनवरे गटात यश मिळाले. शिवसेनेने तरडगाव, साखरवाडी, विडणी, बरड व कोळकी गटांमध्ये विजय मिळवला.
पंचायत समिती निकाल
पंचायत समितीच्या १६ पैकी ८ जागा शिवसेनेला, तर ८ जागा भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीला मिळाल्या. शिवसेनेने जाधववाडी, पाडेगाव, तरडगाव, दुधेबावी, सासवड, बरड, सस्तेवाडी व सांगवी गणांत विजय मिळवला. भाजपला सुरवडी, कोळकी, वाठार (निंबाळकर), विडणी, हिंगणगाव गणांत यश आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने साखरवाडी, आसू व गुनवरे गण जिंकले.
सत्तास्थापनेकडे लक्ष
दोन्ही गटांना समान संधी मिळाल्याने पंचायत समितीत सत्ता कोणाची असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सत्तेचा निकाल चिठ्ठीवर लागण्याची दाट शक्यता असून नवनिर्वाचित सदस्यांची आगामी काळात कामगिरी कसोटीची ठरणार आहे
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- सेनेच्या निर्णयाकडे लक्ष
Satara ZP Election Result 2026 सातारा : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांपैकी 27 जिल्हा परिषद गटात भाजपनं विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेनं 15 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला तर इतरांनी 2 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालांमुळं साताऱ्यात त्रिशंकू चित्र निर्माण झालं आहे. साताऱ्याच्या सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे गेल्या आहेत.
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना सत्तेत, भाजप विरोधात?
साताऱ्यात भाजपच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येऊन भाजपला विरोधात बसवणार? का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन जिल्हा परिषद मध्ये सत्ता स्थापन करणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.
जिल्ह्यामध्ये भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येणार? का असा सवाल निर्माण झाला आहे. भाजप 27 जागेवर विजयी होऊन मोठा पक्ष असला तरी सत्तेसाठी भाजपला मित्र पक्षातल्याच पक्षांची मदत घ्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागांवर विजयी तर शिवसेना 15 जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा राष्ट्रवादी शिवसेनेकडे असल्याने भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यात येईल का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
मंत्री शंभूराजे देसाई यांच्या घरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने झालेली चहा पे चर्चा यशस्वी झाली आहे.चर्चेसाठी रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन काका पाटील यांसारखे मातब्बर नेतेमंडळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी भेटीला गेले होते.
मंत्री शंभूराज देसाई,मंत्री मकरंद पाटील, आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या निर्णयाकडे संपूर्ण साताऱ्याचे लक्ष लागलं आहे.
महायुतीतील पक्षांमध्येच जिल्हा परिषद निवडणुकीत संघर्ष
सातारा जिल्ह्यात विधानसभा लोकसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युतीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती. नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वबळाचे वारे भाजपकडून वाहू लागले त्यानंतर भाजपने राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे मंत्री मकरंद पाटील यांची नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच कोंडी केली होती. वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने वाई नगरपालिकेवर झेंडा फडकवला आणि मंत्री मकरंद पाटील यांना शह दिला होता. त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट करण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील युतीमध्ये असलेल्या मित्रपक्षांमध्येच पक्ष वाढवण्याची स्पर्धा सुरू झाली होती. एकमेकांची जिरवा जिरवी करण्याचं काम मंत्र्यांकडून सुरू झाले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना भाजपच्या मंत्र्यांनी त्यांच्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन टार्गेट केले होते.
सातारा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल:
भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस : 20
शिवसेना : 15
शिवसेना (ठाकरे) :00
काँग्रेस : 01
इतर: 02
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण अंतिम आकडेवारी
सातारा 16
भाजप – 10
राष्ट्रवादी – 5
शिवसेना – 1
जावली 6
भाजप – 3
राष्ट्रवादी – 1
शिवसेना-2
वाई 08
भाजप – 3
राष्ट्रवादी -5
महाबळेश्वर 4
राष्ट्रवादी -2
शिवसेना-2
खंडाळा 6
भाजप – 1
राष्ट्रवादी -5
फलटण – 16
भाजप – 5
राष्ट्रवादी-3
शिवसेना-8
माण -10
भाजप – 5
राष्ट्रवादी -5
खटाव -14
भाजप – 8
राष्ट्रवादी-6
कोरेगाव 12
भाजप – 1
राष्ट्रवादी- 9
शिवसेना- 2
कराड – 24
भाजप – 16
काँग्रेस -2
राष्ट्रवादी – 4
राष्ट्रवादी शरद पवार-1
शिवसेना-1
पाटण-14
भाजप – 1
शिवसेना-13
पंचायत समिती एकूण गण 130
भाजप- 53
राष्ट्रवादी-45
शिवसेना-29
काँग्रेस- 02
श.प. गट 01
आणखी वाचा
भारतातील सर्वात लांब उड्डाणपूल,₹22000000000 खर्च, कोणत्या शहराला होणार फायदा?

Indias longest flyover: भारतातील सर्वात मोठा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. हा अरूर-थुरावूर उन्नत महामार्ग म्हणून ओळखला जातो. याची लांबी 12.75 किलोमीटर इतकी आहे आणि तो सहा लेनचा रुंद आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी असे पूल बांधले जातात. दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्येही असे पूल आहेत, पण हा पूल देशातील सर्वात लांब असणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे खास?
भारतातील सर्वात मोठा उड्डाणपूल हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 66 चा भाग आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक आणि वेगवान होईल. या प्रकल्पामुळे स्थानिक भागाची चमक वाढून विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. हा उड्डाणपूल केरळमधील अरूर ते थुरावूर या भागात बांधला जात आहे. तो पूर्णपणे उन्नत असून, जमिनीपासून वर असल्याने खालील वाहतुकीला अडथळा येणार नाही. सहा लेन असल्यामुळे दोन्ही दिशांना वाहने सहज जाऊ शकतील. याची रचना अशी आहे की, तो एका स्तंभावर आधारित आकाशमार्ग आहे, ज्यामुळे तो देशातील सर्वात अनोखा आणि लांब असा पूल ठरेल. या महामार्गामुळे दक्षिण भारतातील राज्यांना जोडण्यात मदत होईल.
बांधकामाची जबाबदारी कोणाकडे?
या मोठ्या प्रकल्पासाठी सुमारे 2200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एनएचएआय ही संस्था या पूलाचे बांधकाम करतेय. ही संस्था देशभरातील महामार्गांचे विकास करते. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्य वापरले जात असल्याने तो मजबूत आणि टिकाऊ असेल. खर्च जरी जास्त असला तरी दीर्घकाळात तो फायद्याचा ठरणार आहे.
बांधकाम कुठपर्यंत?
आतापर्यंत बांधकामाचे बहुतेक भाग पूर्ण झाले आहेत. 360 आधार स्तंभ आणि 3000 गर्डर तयार झाले आहेत. गर्डर बसवण्याचे काम चालू आहे. तीन निर्गमन रस्ते आणि एक टोल केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पात 2500 कामगार आणि 350 मशीन्स दिवसरात्र काम करत आहेत. मे 2026 पर्यंत हा पूल पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे काम वेगाने पुढे सरकत असल्याची माहिती देण्यात आली.
काय आहे वैशिष्ट्य?
हा पूल एकल स्तंभावर आधारित असल्याने तो अनोखा आहे. 6 लेन असल्यामुळे वाहतुकीची क्षमता जास्त आहे. प्रवाशांना या उन्नत मार्गावरून जाण्यासाठी टोल भरावा लागेल, ज्यामुळे देखभालीसाठी निधी मिळेल. या पूलाची रचना पर्यावरणस्नेही आणि सुरक्षित आहे. यामुळे दुर्घटना कमी होतील आणि प्रवास आरामदायक होणार आहे.
फायदे काय?
या पुलामुळे तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमधील जोडणी जलद आणि सोपी होईल. वाहतुकीचा खर्च कमी होईल, वेळ वाचेल आणि प्रवाशांची सोय होईल. केरळच्या रस्ते पायाभूत सुविधेत मोठी सुधारणा होईल. हा पूल लांबीच्या बाबतीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करेल. एकूणच, या प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती ढवळ येथे भावपूर्ण वातावरणात उत्साहात साजरी

ढवळ (ता. फलटण) — दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याग, संघर्ष आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मौजे पंचशील तरुण मित्र मंडळ, ढवळ व भारतीय बौद्ध महासभा, तालुका फलटण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामूहिकरित्या सविनय जयभीमचा जयघोष करत माता रमाई यांना वंदन केले.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुक्याचे संस्कार सचिव बजरंग गायकवाड प्रमुख उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून त्यांनी माता रमाई यांच्या जीवनातील त्याग, सहनशीलता आणि सामाजिक चळवळीत दिलेल्या मोलाच्या योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात माता रमाई यांनी दिलेला आधार, त्यांची कुटुंबासाठी व समाजासाठी केलेली तपश्चर्या उपस्थितांसमोर उलगडून सांगितली.
यावेळी उपस्थित वक्त्यांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर आपली मनोगते व्यक्त करत सांगितले की, माता रमाई या केवळ बाबासाहेबांच्या सहचारिणी नव्हत्या, तर त्या सामाजिक क्रांतीच्या एक मूक पण भक्कम आधारस्तंभ होत्या. त्यांच्या त्यागातूनच बाबासाहेबांना समाज परिवर्तनाचे महान कार्य साध्य करता आले, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास पंचशील तरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततामय, अनुशासित आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या शेवटी माता रमाई यांच्या विचारांचा व आदर्शांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. अशा प्रकारचे सामाजिक व विचारप्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर दावे होऊ लागले आहेत… शरद पवारांच्या गटाकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अद्यापही प्रतिक्रिया आल्या नव्हत्या . आता राष्ट्रवादीचे नेते आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय… महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करावं, असं वक्तव्यही सयाजी शिंदे यांनी केलंय… सोबतच विलिनीकरणावर चर्चा झाली होती, असा दावाही त्यांनी केलाय… दरम्यान आज सयाजी शिंदे यांनी शरद पवारांची सांत्वनपर भेटही घेतलीे..
इतर महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय स्वंयसेवक संघामुळेच भाजपला अच्छे दिन… आमच्या भूमिकेवर चालणाऱ्यांचा फायदा होतो, मोहन भागवतांचं वक्तव्य….
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला तर भारतरत्नचाच गौरव होईल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मुंबईतील व्याख्यानात प्रतिपादन…
अजितदादांच्या विमानात वैमानिकांना संमोहित करून अपघात घडवून आणला का? व्हीएसआर कंपनीवर आमदार अमोल मिटकरींना संशय… तर आमदारकीची टर्म संपत असल्यानं मिटकरी अस्वस्थ, लक्ष्मण हाकेंचा पलटवार..
महाराष्ट्रच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं, सयाजी शिंदेंची भूमिका, तर दोन्ही राष्ट्रवादीबाबत पवार कुटुंबीय निर्णय घेणार, बजरंग सोनावणेंनी केलं स्पष्ट…
विधानसभा, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मविआमध्ये एकमेकांना मदत करावीच लागेल, उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधानपरिषदेवर जावं, अशी विनंती केलीय, संजय राऊतांचं वक्तव्य.
जगात त्यागमूर्ती फक्त रमाईच होऊ शकते – महावीर भालेराव

जगात त्यागमूर्ती फक्त रमाईच होऊ शकते – महावीर भालेराव
फलटण : भारतभूमी ही साधू-संतांची, विचारवंतांची व महापुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते. मात्र या महापुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करणाऱ्या, त्याग व समर्पणाने समाज घडवणाऱ्या महामातांचीसुद्धा हीच भूमी आहे, हे आपण विसरता कामा नये. अशा महामातांमध्ये त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा, शाखा फलटण तालुका यांचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी केले.
ते दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मौजे राजाळे येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
महावीर भालेराव पुढे म्हणाले की, माता रमाई म्हणजे त्याग, सहनशीलता व समर्पण यांचा जिवंत आदर्श होय. रमाई यांनी आपल्या आयुष्यभर केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी स्वतःचे सुख, आरोग्य आणि मातृत्वसुद्धा अर्पण केले. त्यांच्या स्वतःच्या पोटच्या चार मुलांचा औषधोपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला, तरीही त्यांनी कधीही ध्येयापासून माघार घेतली नाही. घरखर्चातून काटकसर करून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदत पुरवली आणि एक महान बोधिसत्व घडवला.
“असा अपार त्याग जगातील कोणतीही स्त्री करू शकणार नाही. म्हणूनच ‘जगात त्यागमूर्ती फक्त रमाईच होऊ शकते’,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. समाजाने माता रमाई यांच्या जीवनातील त्याग, संयम आणि संघर्षाचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच सर्व उपस्थितांना माता रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी महावीर भालेराव यांनी रमाईच्या कार्यकर्तृत्वाला एका गीताच्या माध्यमातून तिच्या कार्याला अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, राजाळे (भीमनगर) यांच्या वतीने येथील धम्मदीप बुद्ध विहारात माता रमाई यांची १२९ वी जयंती अत्यंत उत्साहात, श्रद्धा व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
समता नगर(विडणी)येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

फलटण : आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मौजे समता नगर येथे पंचशील तरुण मंडळ यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२९ वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका, लहान बालक-बालिका तसेच मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त करत माता रमाई यांच्या सामाजिक, कौटुंबिक व प्रेरणादायी कार्याची माहिती दिली. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांनी सूत्रपठण घेऊन माता रमाईच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयुष्यमान रामचंद्र मोरे यांनी केले.
कोळकी येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

साहस Times : त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शाहू, फुले, आंबेडकर सभागृह, बुद्ध विहार कोळकी येथे त्यागमूर्ती माता रमाई महिला ग्रुप कोळकी व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक व धम्मकार्यक्रमांचे आयोजन करून जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास त्यागमूर्ती माता रमाई महिला ग्रुपच्या प्रवर्तक रजनी माने, ज्येष्ठ समाजसेविका कांताताई काकडे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख चित्रा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता काकडे यांच्यासह प्रियांका भोसले, अंकिता भोसले, अभिषा भोसले, दुर्गा भोसले, विद्या खंदारे, आरती पाटील, किर्ती माने, अक्षदा लोंढे, प्राजक्ता सागर काकडे, प्रजा बनसोडे, मयुरी काकडे, स्वाती जाधव, परिमिता कांबळे, कल्याणी सोनवणे, कन्याकुमारी कसबे, हर्षदा गौतम काकडे, बेबीनंदा रामचंद्र माने,अंकिता तानाजी भोसले, आरती विशाल पाटील,दुर्गा भोसले, प्रार्थना काकडे, सुधा जाधव, प्रियांका निकाळजे , आशा काकडे, छाया लोंढे आदी महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सर्वांच्या सहभागातून जयंतीचा कार्यक्रम हर्षोल्हासात पार पडला.
त्यागमूर्ती माता रमाई महिला ग्रुपच्या उभारणी व स्थापनेसाठी ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन व धम्मदेसना लाभली, त्या बुद्धपुत्र भंते काश्यपजी यांनी महिलांना त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच माता रमाई जयंतीनिमित्त मिळालेल्या धम्मदानातून सर्व उपस्थित उपासक-उपासिकांना धम्मदानातून फलाहार वाटप करून धम्मभावनेचे दर्शन घडविले.
नुकत्याच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित धम्मदीक्षा सोहळ्यात बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या अत्यंत धम्मशील माने कुटुंबीयांच्या रजनीताई माने यांनी स्वकमाईतून सर्व उपस्थित उपासक – उपासिका, बालक – बालिका यांना खीरदान करून कुशलकर्माचा पुण्यसंचय केला. यावेळी आरती पाटील व हर्षदा गौतम काकडे यांच्या मार्फत सर्वांना बिस्कीट पुड्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विक्रम दिलीप निकाळजे रा सोनगाव बंगला यांचे चिरंजीव पियुष विक्रम निकाळजे यांनी मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाठी व्यर्थ खर्च न घालवता भारतीय बौद्ध महासभेमार्फत प्रकाशित धम्मयान कॅलेंडरचे उपासक उपासिका यांना वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांताताई काकडे यांनी माता रमाई यांच्या त्याग, समर्पण, हालअपेष्टांमधून केलेली मेहनत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीत असलेले त्यांचे अमूल्य योगदान यावर सविस्तर मांडणी करत रमाईंच्या कार्याचा गौरव केला.
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे कार्यालय सचिव तथा बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते यांनी माता रमाईंच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन करत उपस्थितांना भावनिक व मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले, “इतिहासात अनेक स्त्रियांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजावर ठसा उमटवला; मात्र अत्यंत हालअपेष्टा सहन करून संपूर्ण कुटुंबाचा भार वाहत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी मदत केली.त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सावली बनलेली रमाई ही सर्वांहून वेगळी आहे. रमाईंचा त्याग, समर्पण व सेवाभावी वृत्ती आजच्या माताभगिनींसाठी आदर्श आहे.” राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता भिमाई यांच्यासोबत माता रमाई यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.सचिन रोकडे, सतीश भोसले जाधववाडी यांनी ही मनोगत व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रम धम्ममय वातावरणात, सामाजिक एकतेचा संदेश देत यशस्वीपणे पार पडला.
एन. रघुरामन यांचा कॉलम: सोन्याच्या शर्यतीत अद्याप पैसे कमावता येतील का?
जर तुम्ही चार दिवस आधी, 4 फेब्रुवारीला सोने खरेदी केले असते तर तुम्ही 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी अंदाजे ₹1,60,356 दिले असते, जे 1 फेब्रुवारी 2026 पेक्षा ₹3,505 जास्त आहे. तुम्ही एक वर्षापूर्वी हीच खरेदी केली असती तर व्यवहाराची किंमत सुमारे ₹85,300 झाली असती. फेब्रुवारी 2024 च्या या स्तंभात पुढील 14 महिन्यांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती तेव्हा एवढे सोने तुम्हाला 62 हजार रुपयांत मिळाले असते. सोने विक्रमी उच्चांकावर असू शकते. जागतिक अनिश्चिततेच्या काळात ते आणखी वाढू शकते. कारण जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ते पसंतीचा पर्याय आहे. परंतु ज्या गुंतवणुकींनी इतकी चांगली कामगिरी केली आहे त्यात अनेकदा अशा व्यवहारांचा समावेश असतो, ज्यात सुधारणा होऊ शकते. म्हणूनच जगभरातील मध्यवर्ती बँकांना जोडणाऱ्या बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सने इशारा जारी केला आहे. त्यानुसार सोने बबल झोनमध्ये असू शकते आणि त्यात लक्षणीय घटदेखील होऊ शकते. तथापि, अनेक गुंतवणूकदार आणि विश्लेषक अजूनही असे सुचवत आहेत की, ते आणखी वाढेल. यासाठी प्रत्येकाची स्वतःची कारणे आहेत. पण जेव्हा आपण चांदीकडे पाहतो तेव्हा ती अत्यंत अस्थिर झाली आहे, त्यात लक्षणीय चढउतार येत आहेत. अनेक महिन्यांच्या वाढीनंतर अलीकडेच एका दिवसात ती 17% ने घसरली आहे. एका आठवड्यात ती सर्वोच्च शिखरावरून ती 36% ने घसरली आहे. उच्च परताव्याची आशा बाळगून गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती, सोन्याच्या तुलनेत तिचा आकार लहान असणे आणि औद्योगिक मागणी यामुळे चांदीच्या किमतीत एका वर्षात 250% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. बहुतेक भारतीयांसाठी सोन्यातील गुंतवणूक हा एक भावनिक विषय आहे. दुसरीकडे, जगभरातील अनेक लोक याकडे एक ‘अंतिम सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून पाहतात. ते सोन्याकडे त्याच दृष्टीने बघतात, ज्याप्रमाणे मोठे गुंतवणूकदार शेअर आणि बाँड्सकडे पाहतात. परंतु जर तुम्ही नफा मिळवण्याचा विचार करत असाल तर त्याची अस्थिरता आणि किमतीत घट यामुळे लक्षणीय नुकसान होऊ शकते. म्हणून गुंतवणूक करताना एक मर्यादा निश्चित करा : तुम्ही कोणत्या किमतीला नफा मिळवण्यासाठी पुरेशा उच्च किमतीला विक्री कराल किंवा कोणत्या किमतीला इतक्या कमी किमतीला विक्री कराल की तोटा सहन करता येईल. व्यवस्थापनाची टीप : खरेदीसाठी खूप उशीर झाला आहे आणि तुम्ही ते विकत घेतले तरी त्यासोबत कोणतीही भावना जोडू नका. तुम्ही स्वतः ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच त्याचा व्यापार (ट्रेडिंग) करा. तज्ज्ञांसह कोणाचेही अंदाज चुकू शकतात, हाच आमचा इशारा आहे.
Source link

