Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशभारतातील सर्वात लांब उड्डाणपूल,₹22000000000 खर्च, कोणत्या शहराला होणार फायदा?

भारतातील सर्वात लांब उड्डाणपूल,₹22000000000 खर्च, कोणत्या शहराला होणार फायदा?

भारतातील सर्वात लांब उड्डाणपूल,₹22000000000 खर्च, कोणत्या शहराला होणार फायदा?

[ad_1]

Indias longest flyover: भारतातील सर्वात मोठा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. हा अरूर-थुरावूर उन्नत महामार्ग म्हणून ओळखला जातो. याची लांबी 12.75 किलोमीटर इतकी आहे आणि तो सहा लेनचा रुंद आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी असे पूल बांधले जातात. दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्येही असे पूल आहेत, पण हा पूल देशातील सर्वात लांब असणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

काय आहे खास? 

भारतातील सर्वात मोठा उड्डाणपूल हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 66 चा भाग आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक आणि वेगवान होईल. या प्रकल्पामुळे स्थानिक भागाची चमक वाढून विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.  हा उड्डाणपूल केरळमधील अरूर ते थुरावूर या भागात बांधला जात आहे. तो पूर्णपणे उन्नत असून, जमिनीपासून वर असल्याने खालील वाहतुकीला अडथळा येणार नाही. सहा लेन असल्यामुळे दोन्ही दिशांना वाहने सहज जाऊ शकतील. याची रचना अशी आहे की, तो एका स्तंभावर आधारित आकाशमार्ग आहे, ज्यामुळे तो देशातील सर्वात अनोखा आणि लांब असा पूल ठरेल. या महामार्गामुळे दक्षिण भारतातील राज्यांना जोडण्यात मदत होईल. 

बांधकामाची जबाबदारी कोणाकडे?

या मोठ्या प्रकल्पासाठी सुमारे 2200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एनएचएआय ही संस्था या पूलाचे बांधकाम करतेय. ही संस्था देशभरातील महामार्गांचे विकास करते. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्य वापरले जात असल्याने तो मजबूत आणि टिकाऊ असेल. खर्च जरी जास्त असला तरी दीर्घकाळात तो फायद्याचा ठरणार आहे. 

बांधकाम कुठपर्यंत? 

आतापर्यंत बांधकामाचे बहुतेक भाग पूर्ण झाले आहेत. 360 आधार स्तंभ आणि 3000 गर्डर तयार झाले आहेत. गर्डर बसवण्याचे काम चालू आहे. तीन निर्गमन रस्ते आणि एक टोल केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पात 2500 कामगार आणि 350 मशीन्स दिवसरात्र काम करत आहेत. मे 2026 पर्यंत हा पूल पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे काम वेगाने पुढे सरकत असल्याची माहिती देण्यात आली. 

काय आहे वैशिष्ट्य? 

हा पूल एकल स्तंभावर आधारित असल्याने तो अनोखा आहे. 6 लेन असल्यामुळे वाहतुकीची क्षमता जास्त आहे. प्रवाशांना या उन्नत मार्गावरून जाण्यासाठी टोल भरावा लागेल, ज्यामुळे देखभालीसाठी निधी मिळेल. या पूलाची रचना पर्यावरणस्नेही आणि सुरक्षित आहे. यामुळे दुर्घटना कमी होतील आणि प्रवास आरामदायक होणार आहे. 

फायदे काय? 

या पुलामुळे तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमधील जोडणी जलद आणि सोपी होईल. वाहतुकीचा खर्च कमी होईल, वेळ वाचेल आणि प्रवाशांची सोय होईल. केरळच्या रस्ते पायाभूत सुविधेत मोठी सुधारणा होईल. हा पूल लांबीच्या बाबतीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करेल. एकूणच, या प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments