Friday, June 26, 2026
Home Blog Page 24

फलटणमध्ये सावकारांच्या त्रासाला कंटाळून तरुण उद्योजकाची आत्महत्या; सहा जणांवर गुन्हा दाखल

0
फलटणमध्ये सावकारांच्या त्रासाला कंटाळून तरुण उद्योजकाची आत्महत्या; सहा जणांवर गुन्हा दाखल

फलटण :- फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील रहिवासी आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायिक रवींद्र खोपडे यांनी सततच्या आर्थिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रवींद्र खोपडे हे पत्नी कोमल आणि दोन मुलांसह स्वतःच्या शेतात वास्तव्यास होते. कष्टाळू, शांत आणि जिद्दी स्वभावामुळे त्यांनी शून्यातून आपला व्यवसाय उभा केला होता. मात्र, खाजगी सावकार, फायनान्स कंपनीचे अधिकारी आणि काही व्यक्तींनी केलेल्या सततच्या मानसिक त्रासामुळे ते नैराश्यात गेले होते.
माहितीनुसार, सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची मोठी रक्कम परत करूनही त्यांच्यावर अधिक पैशासाठी तगादा लावला जात होता. रात्री-अपरात्री फोनवरून धमक्या देणे, बदनामी करणे आणि कुटुंबीयांना त्रास देणे असे प्रकार सुरू होते. याशिवाय वाहन व्यवहारांमध्येही फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
या सर्व घटनांमुळे त्रस्त झालेल्या रवींद्र खोपडे यांनी चिठ्ठी लिहून विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. त्यांच्या पत्नी कोमल खोपडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार संबंधित आरोपींमध्ये सावकार, फायनान्स कंपनीचे अधिकारी आणि बँक व्यवस्थापकांचा समावेश आहे. काहींनी वाहन खरेदी करून पूर्ण पैसे न दिल्याने आर्थिक फसवणूक झाली, तर काहींनी थेट धमक्या देऊन मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर वाठार निंबाळकर गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “एका होतकरू तरुण उद्योजकाला आर्थिक कचाट्यात अडकवून त्याची बदनामी करून आत्महत्येस प्रवृत्त केले,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, अवैध खाजगी सावकारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणीही पुढे आली आहे.

फलटणकरांचा एकमुखी आग्रह : विधान परिषदेसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनाच संधी द्या

0
फलटणकरांचा एकमुखी आग्रह : विधान परिषदेसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनाच संधी द्या

फलटण प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांकडून शिवसेनेचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांना संधी देऊन त्यांच्या दीर्घकालीन राजकीय कार्याचा सन्मान राखावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे.
राजघराण्याची पार्श्वभूमी लाभलेले संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रभावी आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्षे तळागाळातील प्रश्नांवर काम करत सामान्य नागरिकांशी घट्ट नाते निर्माण केले आहे. लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता अशी त्यांची प्रतिमा असून त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला निश्चितच होऊ शकतो, असे मत शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ एप्रिल २०२६ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून ३० एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. २ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून ४ मे ही अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. १२ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे. संबंधित ९ आमदारांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असल्याने ही निवडणूक होत आहे.
राजकीय समीकरणांनुसार या ९ जागांपैकी सुमारे ५ जागा भाजपला, २ जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, १ जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट) तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी एक जागा संजीवराजे नाईक निंबाळकर यांना द्यावी, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. पक्ष नेतृत्व या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अस्पृश्य प्रजा परिषद फलटणसंस्थानात राहणाऱ्या लोकांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा वेगळी नाही. ——– डॉ.बाबासाहेब आंबेडकर

0
अस्पृश्य प्रजा परिषद फलटणसंस्थानात राहणाऱ्या लोकांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा वेगळी नाही. ——– डॉ.बाबासाहेब आंबेडकर

अस्पृश्य प्रजा परिषद फलटण
संस्थानात राहणाऱ्या लोकांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा वेगळी नाही. ——– डॉ.बाबासाहेब आंबेडकर
(आज त्या ऐतिहासिक घटनेला 88 अस्पृश्य प्रजा परिषद फलटण)


साहस Times :- आज त्या ऐतिहासिक घटनेला ८७ वर्षे पूर्ण होत आहेत.याच दिवशी २३ एप्रिल १९३९ रोजी या फलटण नगरीतील आम्हा अस्पृश्य बांधवांमध्ये स्पृलिंग चेतवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यांनी त्यावेळी मांडलेली मते आज ही दिशादर्शक आहेत. त्यांनी एकंदरीत संस्थानामधील अस्पृश्य जनतेच्या दैयनीय स्थितीविषयी चिंता व्यक्त करून काही उपाय योजनाही सुचवल्या होत्या.
फलटण संस्थांनाधिपतींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आगाऊच पत्र पाठवून फराळाचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मेसर्स गडकरी, देवरुखकर, गायकवाड, रणपिसे, सावंत,के. बी जाधव,शामराव भोळे वगैरे मंडळींसह बरोबर ४ वाजता फलटण संस्थांनाधिपतींच्या खास मोटारीने राजवाड्यात आले.तिथे राजेसाहेबांचे व त्यांचे सार्वजनिक कार्याबाबत थोडे बोलणे झाल्यानंतर थाटाची चहा पार्टी झाली चहा पार्टीनंतर राजवाड्यात डॉ.बाबासाहेब समवेत राजेसाहेब व पाहुणे मंडळी यांचा फोटो झाला. नंतर सायंकाळी ५ वाजता राजवाड्यापासून जंगी मिरवणूक निघून ती सभेच्या मंडपापर्यंत आली.सभेसाठी भव्य मंडप स्टेज तयार केला होता. संस्थानातील सर्व बडी बडी स्त्री पुरुष मंडळी सभेस मुद्दाम आली होती. सुरुवातील स्वागत पद्ये व पोवाडे झाल्यानंतर सभेचे स्वागताध्यक्ष श्री. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेबांचे व जमलेल्या मंडळींचे स्वागत करून आपल्या समाजाने संघटित राहणे किती हिताचे व महत्त्वाचे आहे याचे वर्णन केले. शेवटी डॉ. बाबासाहेबांनी परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती केली. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेब स्थानापन्न झाले. सभेसाठी फलटण संस्थानातील व संस्थांना बाहेरील असा सुमारे दहा बारा हजार जमाव जमला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलण्यास उठले ते म्हणाले.’ मी फलटण संस्थानातील अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या परिषदेसाठी जरी इथे आलो असलो तरी सर्वसाधारण जनतेचे कर्तव्य काय, आज जगात काय चालले आहे इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.सर्वसाधारण जनता ही सध्या लोकशाहीची भाषा बोलत असून संस्थानात व संस्थांनाबाहेर लोकशाहीच्या तत्त्वावर सुधारणा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे अशावेळी संस्थानिकांनी ही आपला दृष्टिकोन बदलून प्रजेला जितके अधिक अधिकार देण्यासारखे असतील तेवढे दिले पाहिजेत. आजची संस्थाने ही मागच्या राज्यांची अवशेष आहेत पूर्वीच्या काळी राजांना जर कोणती शिकवणूक मिळत असेल तर ती म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपाल करणे एवढेच होय.! गोब्राह्मण प्रतिपालक हे त्यावेळच्या राजाचे मुख्य कर्तव्य समजले जात असे. गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे गायींना चारा घालून ब्राह्मण जातीचे रक्षण केले म्हणजे राजांचे राजा म्हणून दुसरे कर्तव्यच शिल्लक राहिले नाही असे समजण्यात येई.गो - ब्राह्मण प्रतिपालाखेरीज राजाने दुसरे काही न केले तरी चालत असे. आज सर्व संस्थांनात राहणाऱ्या लोकांच्या परिस्थितीकडे पाहिल्यास त्यांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा मोठी चांगली नाही याचा दोष जर कोणाकडे जाणार असलाच तर तो हिंदू धर्माच्या वरील शिकवणीकडे जाईल. चाणक्यनीती, मनुस्मृती वगैरे ग्रंथांचे अवलोकन केले तर आपणास असे दिसून येईल की त्यांनी राजाचे कर्तव्य म्हणजे खेड्यापाड्यातून शाळा काढुन लोकांना सुविद्य करणे अगर लोकहिताच्या गोष्टी करणे यांचा कोठेच मागमूस ही आढळणार नाही.या सर्व गोष्टी आपण इंग्रजांपासून शिकलो आहोत ही कबुली देण्यास कोणास लाजण्याचे काहीच कारण नाही. प्राचीन काळचे रामकृष्णासारखे नावाजलेले चांगले चांगले नामांकित राजे घेतले तरी त्यांनी लोकांत शिक्षण प्रसार होवा म्हणून काय स्कॉलरशिप दिल्या होत्या? या फलटण संस्थानातील आपली जनता ज्ञानहीन व अधिकारहीन अशी आहे.आपल्या लोकांच्या या स्थितीस जर कोणी जबाबदार असेल तर तो आपला धर्मच होय. देशातील शेकडा ९० लोक आज अज्ञानात व गुलामीत दिवस कंठीत आहेत. याला जर कोणी कारण असेल तर तो हिंदू धर्मच होय. इतकेच काय पण हिंदुस्थानचे स्वातंत्र्य घालविण्यास व जो कोणी परकीय राजा इकडे येईल त्याला प्रथम आश्रय देऊन पुढे त्यास शरण जाण्याला जर कोणी कारण झाले असेल तर आपला हिंदू धर्मच होय. ही पद्धत नष्ट करण्याला आपण आज काय केलं पाहिजे हा मुख्य प्रश्न आहे याबाबत रामबाण उपाय अगर तोडगा म्हणून जर सुचवायचा असेल तर तो म्हणजे राज्याची सत्ता काढून घेऊन ती प्रजेच्या ताब्यात देणे जरुरी आहे याबाबतचे माझे विचार आपणास जरा विचित्र वाटतील परंतु मला ते लपवून ठेवायचे नाहीत.इंग्रज आमदानी इकडे सुरू होऊन बरेच दिवस झाल्यानंतर लोककल्याण करणे असल्यास राजकीय सत्ता प्रजेच्या प्रतिनिधींच्या हातात असणे योग्य असे वाटू लागले त्याबाबत लोकांच्या आकांक्षा सारख्या वाढीस लागल्या त्यांना अनुसरून ज्या काही सुधारणा अंमलात आल्या आहेत त्या आपल्या या हिंदुस्थान देशात १९३७ च्या एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत परंतु मिळालेल्या या प्रजासत्ताक राज्यापासून या देशाचे काही हित झाले आहे? खरे पाहता आपल्या या देशात प्रजासत्ताक राज्यपद्धतीमुळे कवडीचा सुद्धा फरक झाल्याचे दिसत नाही परकीय इंग्रजांच्या आमदानीत जे त्यांनी केले नाही.ते हे लोक करताना दिसतात या गोष्टीबद्दल त्यांना लाज वाटत असे त्या गोष्टी आज लोकांच्या मतावर निवडून गेलेल्या लोकांनी केल्या आहेत. निशस्त्र असलेल्या कामगारांवर गोळ्या झाडून त्यांचे जीव घेणे, पोटासाठी झगडत असता संप करणे हा गुन्हा आहे.असे कायदे जे मागचे सरकार करू शकले नाही ते ही काँग्रेसची सरकारे बिनदिक्कत करीत सुटले आहेत. प्राचीन काळची गोब्राह्मण प्रतिपाल करणे ही शिकवणूक आज तरी लोकांच्या व्यवहारातून सुटली आहे काय ? आज काँग्रेसची सात प्रांतात सरकारे आहेत त्या सर्व प्रांतांचे मुख्य दिवाण ब्राह्मण आहेत म्हणजेच त्या सर्व प्रांतांची सत्ता ब्राह्मणाच्या हातात आहे.असल्या या राज्यात सर्वांचे कल्याण होईल असे म्हणणे ही बाजारगप्प आहे. त्यांच्या हातून सर्वांचे कल्याण होणे अशक्य आहे कारण जो पर्यंत या देशात गरिबांचे हितसंबंध श्रीमंत वर्गापासून भिन्न आहेत.एका वर्गाचे हितात दुसऱ्याचे अहित आहे व जिथे श्रीमंतांच्या कल्याणाची कदर करण्यास आजची काँग्रेस सरकार तत्पर आहेत अशा ठिकाणी या असल्या काँग्रेस सरकाराकरवी आमचे कल्याण होईल असा आत्मविश्वास शेतकरी व मजूर या वर्गाने बाळगणे म्हणजे या वर्गाची अधोगती होय.आज ज्या ठिकाणी क्रय विक्रय वस्तूसारखे आपल्या मताची विक्री, मतदार, श्रीमंत अशा लोकांना पैशाच्या लोभाला बळी पडून विकतात व त्यांचा खरेदीकर्ता जिथे श्रीमंत मारवाडी व गुजर आहे अशा लोकांच्या हातात सत्ता दिली असता आपले नुकसान करून गोरगरीब जनतेचे हा वर्ग कल्याण करील हे कधीच असंभवनीय नाही. असल्या लोकशाहीपेक्षा अनियंत्रित सत्ता हातात असलेला राजा परवडेल, असे म्हणण्याची पाळी आता आली आहे युरोपमध्ये ज्या प्रांतांची भरभराट चालली असे प्रांत म्हणजे जर्मनी, टर्की, इटली वगैरे होत. राजा कालस्य कारणंम या म्हणी प्रमाणे देशाच्या भरभराटीस व उन्नतीस राजाच कारण असतो.आज तरी जर्मनीचा हिटलर तारकेचा टर्कीचा मुसोलिनी व इटलीचा केमालपाशा हे आपल्या देशाच्या प्रगतीला कारण आहेत अशा राजांच्या हातात एकतंत्री सत्ता असता प्रजेचे जितके कल्याण करू शकतील तितके कल्याण मारवाडी अगर गुजर हे पैशाच्या जोरावर लोकांची मते विकत घेऊन लोकशाहीच्या नावाखाली करू शकणार नाहीत. येथील राजे फार सूज्ञ आहे. त्यांना पेन्शन देऊन संस्थान खालसा करण्यास ते हरकत घेतील असे मला वाटत नाही. उलट माझी ही सूचना मान्य करण्यास त्यांना अडचण भासणार नाही. या संस्थांची लोकसंख्या ५८००० असून वसूल मात्र अवघ्या साडेपाच लाख आहे.ज्या मुंबई प्रांताची लोकसंख्या दोन कोटी व उत्पन्न साडेबारा कोटी आहे अशा प्रांतात सुद्धा शेकडा ७५ गावांना अजून शाळा नाहीत तेव्हा असल्या थोड्या उत्पन्नाच्या संस्थानाचा ताबा ठेवून काय गळफास व्हावयाचा आहे?या फलटण संस्थानात साडेपाच लाखाने काही भागणार नाही त्यांनी हा प्रांत ब्रिटीश मुलखा सोडून द्यावा. या संस्थानातील स्पर्श मांडलेल्या लोकांना आपली गा गाऱ्हाणी राज्यापुढे मांडण्यास मोकळी असावी.प्रजेचे रक्षण करून त्यांच्या पोटापाण्याची सोय करावी. ज्या लोकांना आपल्या अस्पृश्यते मुळे कोणताही धंदा - रोजगार करता येत नाही' ज्यांना स्पृश्य लोक मानलेले लोक भांडी घासणे अगर कपडे धुणे या कामासाठी सुद्धा जिथे ठेवीत नाहीत असल्या प्रजेस आपल्या राज्यात असलेल्या पडित जमिनी सरकारने त्यांना वहिवाटीस द्याव्यात. शिक्षणासारख्या आवश्यक कामी लागणारा पैसा खर्च करण्यास या वर्गाजवळ काही नसल्याने सरकारने या वर्गाच्या लोकांना पाटी पुस्तके स्कॉलरशिप वगैरे देऊन हातभार लावावा.या संस्थानात असलेल्या कायदेमंडळात १९ माणसे आहेत. त्यात आमचा प्रतिनिधी आवश्यक घ्यावा. पूर्वी कै.आयवळे नावाच्या गृहस्थ कायदेमंडळात १९३३ पर्यंत होते त्यांच्या निधनानंतर दुसरा का निवडू नये समजत नाही.एकदा मिळालेला हक्क परत घेतला असल्यास तो आवश्यक परत मागावा.तसेच म्युनिसिपालिटया, जिल्हा बोर्ड वगैरे ठिकाणी आमच्या वर्गाचे प्रतिनिधी घेण्यात यावे. शेवटी एक कटूसत्य तुम्हाला सांगितल्याशिवाय माझ्याने राहवत नाही.आपल्या समाजात मृत मांसाहाराची अनिष्ठ रुढी प्रचारात होती. ती रुढी आपल्या समाजाच्या अवनतीस कारण झाली आहे ही आपण ताबडतोब बंद करावयास हवी आहे.हि घाण जोपर्यंत आपण काढून टाकीत नाही तोपर्यंत समतेचा झगडा झगडण्यास आपण अपात्र ठरू.तरी हे रुढी अविलंब बंद करावे. वर्षे पूर्ण होत आहेत.याच दिवशी २३ एप्रिल १९३९ रोजी या फलटण नगरीतील आम्हा अस्पृश्य बांधवांमध्ये स्पृलिंग चेतवण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आले होते. त्यांनी त्यावेळी मांडलेली मते आज ही दिशादर्शक आहेत. त्यांनी एकंदरीत संस्थानामधील अस्पृश्य जनतेच्या दैयनीय स्थितीविषयी चिंता व्यक्त करून काही उपाय योजनाही सुचवल्या होत्या.

फलटण संस्थांनाधिपतींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आगाऊच पत्र पाठवून फराळाचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे सायंकाळी ४ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मेसर्स गडकरी, देवरुखकर, गायकवाड, रणपिसे, सावंत,के. बी जाधव,शामराव भोळे वगैरे मंडळींसह बरोबर ४ वाजता फलटण संस्थांनाधिपतींच्या खास मोटारीने राजवाड्यात आले.तिथे राजेसाहेबांचे व त्यांचे सार्वजनिक कार्याबाबत थोडे बोलणे झाल्यानंतर थाटाची चहा पार्टी झाली चहा पार्टीनंतर राजवाड्यात डॉ.बाबासाहेब समवेत राजेसाहेब व पाहुणे मंडळी यांचा फोटो झाला. नंतर सायंकाळी ५ वाजता राजवाड्यापासून जंगी मिरवणूक निघून ती सभेच्या मंडपापर्यंत आली.सभेसाठी भव्य मंडप स्टेज तयार केला होता. संस्थानातील सर्व बडी बडी स्त्री पुरुष मंडळी सभेस मुद्दाम आली होती. सुरुवातील स्वागत पद्ये व पोवाडे झाल्यानंतर सभेचे स्वागताध्यक्ष श्री. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेबांचे व जमलेल्या मंडळींचे स्वागत करून आपल्या समाजाने संघटित राहणे किती हिताचे व महत्त्वाचे आहे याचे वर्णन केले. शेवटी डॉ. बाबासाहेबांनी परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती केली. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेब स्थानापन्न झाले. सभेसाठी फलटण संस्थानातील व संस्थांना बाहेरील असा सुमारे दहा बारा हजार जमाव जमला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलण्यास उठले ते म्हणाले.' मी फलटण संस्थानातील अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या परिषदेसाठी जरी इथे आलो असलो तरी सर्वसाधारण जनतेचे कर्तव्य काय, आज जगात काय चालले आहे इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.सर्वसाधारण जनता ही सध्या लोकशाहीची भाषा बोलत असून संस्थानात व संस्थांनाबाहेर लोकशाहीच्या तत्त्वावर सुधारणा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे अशावेळी संस्थानिकांनी ही आपला दृष्टिकोन बदलून प्रजेला जितके अधिक अधिकार देण्यासारखे असतील तेवढे दिले पाहिजेत. आजची संस्थाने ही मागच्या राज्यांची अवशेष आहेत पूर्वीच्या काळी राजांना जर कोणती शिकवणूक मिळत असेल तर ती म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपाल करणे एवढेच होय.! गोब्राह्मण प्रतिपालक हे त्यावेळच्या राजाचे मुख्य कर्तव्य समजले जात असे. गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे गायींना चारा घालून ब्राह्मण जातीचे रक्षण केले म्हणजे राजांचे राजा म्हणून दुसरे कर्तव्यच शिल्लक राहिले नाही असे समजण्यात येई.गो - ब्राह्मण प्रतिपालाखेरीज राजाने दुसरे काही न केले तरी चालत असे. आज सर्व संस्थांनात राहणाऱ्या लोकांच्या परिस्थितीकडे पाहिल्यास त्यांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरांपेक्षा मोठी चांगली नाही याचा दोष जर कोणाकडे जाणार असलाच तर तो हिंदू धर्माच्या वरील शिकवणीकडे जाईल. चाणक्यनीती, मनुस्मृती वगैरे ग्रंथांचे अवलोकन केले तर आपणास असे दिसून येईल की त्यांनी राजाचे कर्तव्य म्हणजे खेड्यापाड्यातून शाळा काढुन लोकांना सुविद्य करणे अगर लोकहिताच्या गोष्टी करणे यांचा कोठेच मागमूस ही आढळणार नाही.या सर्व गोष्टी आपण इंग्रजांपासून शिकलो आहोत ही कबुली देण्यास कोणास लाजण्याचे काहीच कारण नाही. प्राचीन काळचे रामकृष्णासारखे नावाजलेले चांगले चांगले नामांकित राजे घेतले तरी त्यांनी लोकांत शिक्षण प्रसार होवा म्हणून काय स्कॉलरशिप दिल्या होत्या? या फलटण संस्थानातील आपली जनता ज्ञानहीन व अधिकारहीन अशी आहे.आपल्या लोकांच्या या स्थितीस जर कोणी जबाबदार असेल तर तो आपला धर्मच होय. देशातील शेकडा ९० लोक आज अज्ञानात व गुलामीत दिवस कंठीत आहेत. याला जर कोणी कारण असेल तर तो हिंदू धर्मच होय. इतकेच काय पण हिंदुस्थानचे स्वातंत्र्य घालविण्यास व जो कोणी परकीय राजा इकडे येईल त्याला प्रथम आश्रय देऊन पुढे त्यास शरण जाण्याला जर कोणी कारण झाले असेल तर आपला हिंदू धर्मच होय. ही पद्धत नष्ट करण्याला आपण आज काय केलं पाहिजे हा मुख्य प्रश्न आहे याबाबत रामबाण उपाय अगर तोडगा म्हणून जर सुचवायचा असेल तर तो म्हणजे राज्याची सत्ता काढून घेऊन ती प्रजेच्या ताब्यात देणे जरुरी आहे याबाबतचे माझे विचार आपणास जरा विचित्र वाटतील परंतु मला ते लपवून ठेवायचे नाहीत.इंग्रज आमदानी इकडे सुरू होऊन बरेच दिवस झाल्यानंतर लोककल्याण करणे असल्यास राजकीय सत्ता प्रजेच्या प्रतिनिधींच्या हातात असणे योग्य असे वाटू लागले त्याबाबत लोकांच्या आकांक्षा सारख्या वाढीस लागल्या त्यांना अनुसरून ज्या काही सुधारणा अंमलात आल्या आहेत त्या आपल्या या हिंदुस्थान देशात १९३७ च्या एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत परंतु मिळालेल्या या प्रजासत्ताक राज्यापासून या देशाचे काही हित झाले आहे? खरे पाहता आपल्या या देशात प्रजासत्ताक राज्यपद्धतीमुळे कवडीचा सुद्धा फरक झाल्याचे दिसत नाही परकीय इंग्रजांच्या आमदानीत जे त्यांनी केले नाही.ते हे लोक करताना दिसतात या गोष्टीबद्दल त्यांना लाज वाटत असे त्या गोष्टी आज लोकांच्या मतावर निवडून गेलेल्या लोकांनी केल्या आहेत. निशस्त्र असलेल्या कामगारांवर गोळ्या झाडून त्यांचे जीव घेणे, पोटासाठी झगडत असता संप करणे हा गुन्हा आहे.असे कायदे जे मागचे सरकार करू शकले नाही ते ही काँग्रेसची सरकारे बिनदिक्कत करीत सुटले आहेत. प्राचीन काळची गोब्राह्मण प्रतिपाल करणे ही शिकवणूक आज तरी लोकांच्या व्यवहारातून सुटली आहे काय ? आज काँग्रेसची सात प्रांतात सरकारे आहेत त्या सर्व प्रांतांचे मुख्य दिवाण ब्राह्मण आहेत म्हणजेच त्या सर्व प्रांतांची सत्ता ब्राह्मणाच्या हातात आहे.असल्या या राज्यात सर्वांचे कल्याण होईल असे म्हणणे ही बाजारगप्प आहे. त्यांच्या हातून सर्वांचे कल्याण होणे अशक्य आहे कारण जो पर्यंत या देशात गरिबांचे हितसंबंध श्रीमंत वर्गापासून भिन्न आहेत.एका वर्गाचे हितात दुसऱ्याचे अहित आहे व जिथे श्रीमंतांच्या कल्याणाची कदर करण्यास आजची काँग्रेस सरकार तत्पर आहेत अशा ठिकाणी या असल्या काँग्रेस सरकाराकरवी आमचे कल्याण होईल असा आत्मविश्वास शेतकरी व मजूर या वर्गाने बाळगणे म्हणजे या वर्गाची अधोगती होय.आज ज्या ठिकाणी क्रय विक्रय वस्तूसारखे आपल्या मताची विक्री, मतदार, श्रीमंत अशा लोकांना पैशाच्या लोभाला बळी पडून विकतात व त्यांचा खरेदीकर्ता जिथे श्रीमंत मारवाडी व गुजर आहे अशा लोकांच्या हातात सत्ता दिली असता आपले नुकसान करून गोरगरीब जनतेचे हा वर्ग कल्याण करील हे कधीच असंभवनीय नाही. असल्या लोकशाहीपेक्षा अनियंत्रित सत्ता हातात असलेला राजा परवडेल, असे म्हणण्याची पाळी आता आली आहे युरोपमध्ये ज्या प्रांतांची भरभराट चालली असे प्रांत म्हणजे जर्मनी, टर्की, इटली वगैरे होत. राजा कालस्य कारणंम या म्हणी प्रमाणे देशाच्या भरभराटीस व उन्नतीस राजाच कारण असतो.आज तरी जर्मनीचा हिटलर तारकेचा टर्कीचा मुसोलिनी व इटलीचा केमालपाशा हे आपल्या देशाच्या प्रगतीला कारण आहेत अशा राजांच्या हातात एकतंत्री सत्ता असता प्रजेचे जितके कल्याण करू शकतील तितके कल्याण मारवाडी अगर गुजर हे पैशाच्या जोरावर लोकांची मते विकत घेऊन लोकशाहीच्या नावाखाली करू शकणार नाहीत. येथील राजे फार सूज्ञ आहे. त्यांना पेन्शन देऊन संस्थान खालसा करण्यास ते हरकत घेतील असे मला वाटत नाही. उलट माझी ही सूचना मान्य करण्यास त्यांना अडचण भासणार नाही. या संस्थांची लोकसंख्या ५८००० असून वसूल मात्र अवघ्या साडेपाच लाख आहे.ज्या मुंबई प्रांताची लोकसंख्या दोन कोटी व उत्पन्न साडेबारा कोटी आहे अशा प्रांतात सुद्धा शेकडा ७५ गावांना अजून शाळा नाहीत तेव्हा असल्या थोड्या उत्पन्नाच्या संस्थानाचा ताबा ठेवून काय गळफास व्हावयाचा आहे?या फलटण संस्थानात साडेपाच लाखाने काही भागणार नाही त्यांनी हा प्रांत ब्रिटीश मुलखा सोडून द्यावा. या संस्थानातील स्पर्श मांडलेल्या लोकांना आपली गा गाऱ्हाणी राज्यापुढे मांडण्यास मोकळी असावी.प्रजेचे रक्षण करून त्यांच्या पोटापाण्याची सोय करावी. ज्या लोकांना आपल्या अस्पृश्यते मुळे कोणताही धंदा - रोजगार करता येत नाही' ज्यांना स्पृश्य लोक मानलेले लोक भांडी घासणे अगर कपडे धुणे या कामासाठी सुद्धा जिथे ठेवीत नाहीत असल्या प्रजेस आपल्या राज्यात असलेल्या पडित जमिनी सरकारने त्यांना वहिवाटीस द्याव्यात. शिक्षणासारख्या आवश्यक कामी लागणारा पैसा खर्च करण्यास या वर्गाजवळ काही नसल्याने सरकारने या वर्गाच्या लोकांना पाटी पुस्तके स्कॉलरशिप वगैरे देऊन हातभार लावावा.या संस्थानात असलेल्या कायदेमंडळात १९ माणसे आहेत. त्यात आमचा प्रतिनिधी आवश्यक घ्यावा. पूर्वी कै.आयवळे नावाच्या गृहस्थ कायदेमंडळात १९३३ पर्यंत होते त्यांच्या निधनानंतर दुसरा का निवडू नये समजत नाही.एकदा मिळालेला हक्क परत घेतला असल्यास तो आवश्यक परत मागावा.तसेच म्युनिसिपालिटया, जिल्हा बोर्ड वगैरे ठिकाणी आमच्या वर्गाचे प्रतिनिधी घेण्यात यावे. शेवटी एक कटूसत्य तुम्हाला सांगितल्याशिवाय माझ्याने राहवत नाही.आपल्या समाजात मृत मांसाहाराची अनिष्ठ रुढी प्रचारात होती. ती रुढी आपल्या समाजाच्या अवनतीस कारण झाली आहे ही आपण ताबडतोब बंद करावयास हवी आहे.हि घाण जोपर्यंत आपण काढून टाकीत नाही तोपर्यंत समतेचा झगडा झगडण्यास आपण अपात्र ठरू.तरी हे रुढी अविलंब बंद करावे.

माहिती संकलन
आयु. सोमीनाथ घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)

सेवापूर्ती निमित्त आयु.विठ्ठल निकाळजे सर यांचा सत्कार संपन्न

0
सेवापूर्ती निमित्त आयु.विठ्ठल निकाळजे सर यांचा सत्कार संपन्न


सोनगाव (दि. २२ एप्रिल २०२६) : सोनगाव येथील ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने आयु. विठ्ठल बाबुराव निकाळजे सर यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार समारंभ बुधवारी उत्साहात पार पडला. गावचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच श्री जयाप्पा बेलदार यांच्या हस्ते निकाळजे यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत श्री हनुमंत थोरात, श्री बाळासाहेब पिंगळे, श्री बाबासो लवटे, श्री पोपटराव बुरुंगले, श्री धनाजी मोरे (गुरुजी), श्री बाळासाहेब ओवाळ, श्री अरविंद लवटे, श्री लालासो घोलप, श्री चंद्रकांत निकाळजे, श्री राहुल बेलदार, श्री अरुण लांडगे, श्री शिवाजी भोसले यांच्यासह समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यात विठ्ठल निकाळजे यांच्या सेवाकाळातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कार्याचा गौरव करण्यात आला. गावाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. यावेळी वक्त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या अनुभवाचा समाजाला पुढेही लाभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरीत्या पार पडले असून ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

स्वत:चं अपयश लपवायला दुसऱ्यांवर खापर फोडणं हा बालिशपणा, शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना अप्रत्यक

0


Shashikant Shinde and Mahesh Shinde:  सातारा जिल्ह्यातील धरणांमधील वाढता गाळ, कालव्यांची दुरवस्था आणि जिहे-कटापूर योजनेतील विस्कळीत नियोजनावरून शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सत्ताधारी पक्षावर कडाडून टीका केली आहे. “नवीन धरणे बांधण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या धरणांतील गाळ काढल्यास पाणी क्षमता वाढू शकते, मात्र सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. वर्षानुवर्षे साठलेल्या गाळामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता कमालीची घटली आहे. गाळ काढल्यास नैसर्गिकरित्या पाणी पातळी वाढू शकते, परंतु सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.पाणी बंधाऱ्यांची आणि कॅनॉलची अवस्था भयानक झाली असून पाणी गळती होत आहे. या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याची आमची मागणी असताना सरकारकडे निधीची क्षमता नसल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्राचा निधी मराठवाडा आणि विदर्भाकडे वळवल्यामुळेच ही टंचाई निर्माण झाली असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ते बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

जिहे-कटापूर पाणी योजनेवरून शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आम्ही पुसेगाव पट्ट्यातील गावे ओलिताखाली आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, आता सत्तेत आलेल्या लोकप्रतिनिधींनी केवळ ‘आम्हीच केले’ असा गवगवा सुरू केला आहे. मुळात लाभक्षेत्रात नसलेली क्षेत्रे केवळ मत मिळवण्यासाठी वाढवली गेली. जेव्हा ही व्याप्ती वाढवली जात होती, तेव्हा सत्ताधारी झोपले होते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला….पाणी सोडण्यास शशिकांत शिंदे विरोध करत असल्याच्या आरोप आत्ताच्या विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत. हा अत्यंत बालिशपणा आहे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्या लोकप्रतिनिधीच्या नावावर खापर फोडणे ही पळवाट आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि सोडण्यात येणारे पाणी याचे तांत्रिक नियोजन सत्ताधाऱ्यांना जमलेले नाही. पुसेगावच्या लोकांना फसवायचे आणि दोन भागात संघर्षाची ठिणगी टाकायची, हे पाप सत्ताधाऱ्यांचेच आहे. अशी टीका शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी केली.

Satara news: साताऱ्यात नवे धरण बांधण्यापेक्षा सध्याच्या धरणांतील गाळ काढावा: शशिकांत शिंदे

सातारा जिल्ह्यातील धरणांमधील पाणी क्षमता आणि त्या धरणांमध्ये साठलेल्या गाळामुळे पाणी पातळी कमी होणे. याचा अभ्यास करून नियोजन होणे गरजेचे आहे.   नवीन धरण बांधण्यापेक्षा त्यातील गाळ काढला पाणी पातळी वाढू शकते. मात्र, अद्याप असा कोणताही निर्णय सत्ताधारी पक्षाकडून झालेला नाही. वर्षानुवर्षे असणारे पाणी बंधारे आणि कॅनॉल याची सध्या परिस्थिती भयानक आहे. यामध्ये पाणी लिकेज साठी निधीची तरतूद व्हावी साठी आमची मागणी आहे. मात्र, या सरकारकडे निधीची क्षमता नाही. मराठवाडा, विदर्भाकडे निधी वळवल्यामुळे हा निधी कमी पडला असावा असे माझे मत आहे.

जिहे कटापूर पाणी योजनेतून पुसेगाव पट्ट्यातील गावे  ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. मात्र, आता सत्तेत आलेल्या लोकांनी हा प्रयत्न आम्ही केला असा गवगवा केला. आता सांगितलं जातंय शशिकांत शिंदे पाणी सोडायला विरोध करत आहेत. खरं तर हा बालिशपणा आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपले अपयश लपवण्यासाठी दुसऱ्याच्या नावावर टाकण्याचा हा बालिशपणा आहे.  एकतर तुमचा अभ्यास कमी. सत्ता आणि मत मिळवण्यासाठी जी व्याप्ती वाढवली त्याचा हा परिणाम. माणमध्येही याची व्याप्ती वाढली त्यावेळी आपण सत्तेमध्ये असून सुद्सुद्धा झोपला होता का? उपलब्ध पाणीसाठा आणि सोडण्यात येणारे पाणी याचे योग्य नियोजन झाले नाहीतर पाण्यासाठी मोठी लढाई होऊ शकते. 

जीहे कटापूर योजनेचे पाणी रामोशी वाडी परिसरात येत असेल तर पुसेगावच्या लोकांना आंदोलन करायला सांगायचे. आणि परत या भागाला पाणी देताना पुसेगावच्या लोकांना फसवायचे. चुकीच्या नियोजनामुळे झालेला हा संघर्ष आहे. लाभक्षेत्रात नसलेली क्षेत्र तुम्ही का वाढवली. मान मध्ये वाढवली त्यावेळी तुम्ही काय झोपला होता का?.. पाणी द्यायला आमचा विरोध नाही पण तुम्ही सत्ता म्हणून काय विरोध केला. याचे पापाचे धनी तुम्ही आहात. फक्त मत मिळवण्यासाठी पाणी देतो, असं आश्वासन दिले गेले. सत्ताधाऱ्यांखाली अधिकारी किती चुकीचे काम करतात हे उदाहरण आहे. 20 वर्ष पिण्याच्या पाण्यासाठी राखीव केलेला साठा सुद्धा कमी केला जातो. आणि हे पाणी दुसरीकडे दिले जाते. हा सर्व मूर्खाच्या बाजारातला झालेला निर्णय आहे, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली.

आणखी वाचा

Mahesh Shinde: मला पहिल्यापासून वेगळी वागणूक, एकनाथ शिंदेंच्या सभेचं निमंत्रणही नाही…; शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंनी सगळं सांगितलं, साताऱ्यातील अंतर्गत नाराजी उफाळणार?

आणखी वाचा



Source link

साताऱ्यात शिवसेनेत अंतर्गत संघर्ष उफाळला; देसाई–शिंदे आमनेसामने

0
साताऱ्यात शिवसेनेत अंतर्गत संघर्ष उफाळला; देसाई–शिंदे आमनेसामने

सातारा :- सातारा जिल्ह्यात शिवसेना मधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यातील वाद अधिकच तीव्र होत असल्याचे दिसत आहे. बॅनर वाद, कार्यक्रमांच्या निमंत्रणाचा मुद्दा आणि परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत.
महेश शिंदे यांनी आरोप केला की, त्यांना सातत्याने दुय्यम वागणूक दिली जाते आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांना बोलावले जात नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यावेळीही आपल्याला निमंत्रण मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला.
यावर प्रत्युत्तर देताना शंभूराज देसाई यांनी पक्ष शिस्तीवर भर दिला. शिवसेनेत वेगळे निमंत्रण देण्याची पद्धत नसून कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते, असे त्यांनी स्पष्ट केले. काही बॅनरवर महेश शिंदे यांचे फोटो नसले तरी त्यांना माहिती देण्याचे आदेश दिले होते, असेही त्यांनी सांगितले.
महेश शिंदे यांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप फेटाळताना देसाई म्हणाले की, अनेक बैठकीत त्यांनी शिंदे उपस्थित आहेत का याची चौकशी केली होती. निमंत्रण न मिळाल्याच्या दाव्याची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, “आपण स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो,” असे विधान केले असेल तर तो शिवसैनिकांचा अपमान ठरेल, असा इशारा देसाई यांनी दिला. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी हे शिवसैनिकांच्या बळावरच निवडून आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सातारा जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा पाठिंबा मिळाल्याचा उल्लेख करत देसाई यांनी 37 जागांवरील विजय आणि 100 हून अधिक लोकप्रतिनिधी निवडून आल्याचे सांगत पक्षाची ताकद अधोरेखित केली.
जिल्हा परिषद निवडणुकीपासूनच सुरू असलेला हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साताऱ्यात शिंदे यांचा इशारा; “वाघाला डिवचलं तर थेट हल्ला!”

0
साताऱ्यात शिंदे यांचा इशारा; “वाघाला डिवचलं तर थेट हल्ला!”

सातरा :- सातारा येथे झालेल्या भव्य जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना थेट इशारा दिला. मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक आणि नागरिकांच्या साक्षीने त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडत आगामी राजकीय लढाईची दिशा स्पष्ट केली.

आपल्या भाषणात शिंदे यांनी वाघाच्या उदाहरणाचा उल्लेख करत सांगितले की, वाघ कधीही विनाकारण हल्ला करत नाही; मात्र त्याला डिवचल्यास तो थेट झडप घालतो. याच धर्तीवर त्यांनी “पहले मैं किसी को छेड़ता नहीं, लेकिन मुझे छेड़ा तो किसीको छोड़ता नहीं!” असे ठणकावत विरोधकांना स्पष्ट संदेश दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभास्थळी जोरदार घोषणाबाजी झाली आणि वातावरण तापले.
यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विकासकामांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. “फक्त आरोप-प्रत्यारोप करून लोकांचा विश्वास मिळत नाही; काम करून दाखवावे लागते,” असे सांगत त्यांनी पायाभूत सुविधा, शेती क्षेत्रातील योजना आणि सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीभोवती सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांमध्ये सुरू असलेल्या हालचाली, नाराजी आणि बदलती समीकरणे यामुळे सत्तास्थापनेचा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांची सभा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरली.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संघटन बळकट करण्यावर विशेष भर दिला. “तळागाळात काम करा, प्रत्येक गावात पोहोचा आणि पक्षाची ताकद वाढवा,” असे आवाहन करत त्यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेला गांभीर्याने घेण्याचे निर्देश दिले. कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
राजकीय वर्तुळात शिंदे यांच्या या आक्रमक भाषणाकडे आगामी निवडणुकांची रणनीती म्हणून पाहिले जात आहे. साताऱ्यातील ही सभा केवळ शक्तिप्रदर्शन नसून जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या समीकरणांवर परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे.

समता सैनिक दल स्थापनेमागील बाबासाहेबांचा हेतू व उद्देश समजून घ्या” — दादासाहेब भोसले

0
समता सैनिक दल स्थापनेमागील बाबासाहेबांचा हेतू व उद्देश समजून घ्या” — दादासाहेब भोसले

“समता सैनिक दल स्थापनेमागील बाबासाहेबांचा हेतू व उद्देश समजून घ्या” — दादासाहेब भोसले

फलटण (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना ही समाजात शिस्त, संघटनशक्ती आणि स्वाभिमान निर्माण करण्यासाठी केली असून सामाजिक अन्यायाला संघटितपणे उत्तर देणे व संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी व राज्याचे संघटक आयु. दादासाहेब भोसले यांनी केले.

समता सैनिक दलाच्या वतीने दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी आयोजित सैनिक प्रशिक्षण शिबिरात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, युवकांनी केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम न राहता वैचारिकदृष्ट्याही सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे. संघटनबळ आणि शिस्त यांच्या माध्यमातूनच समाजपरिवर्तन घडवून आणता येते, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी सातारा जिल्हा पूर्वचे संरक्षण उपाध्यक्ष, नवनियुक्त मेजर आयु. संपत भोसले यांनी प्रात्यक्षिक करून दाखवून पुढील भाग ज्यामध्ये खुली लाइन और निकट लाइन, कदम लेना – आगे, पीछे, दाएँ, बाएँ; सलामी – सामने, दाएँ, बाएँ; रिपोर्टिंग सलामी; कदमताल; तेज चल; धीरे चल; चलते-चलते पीछे मुड़ और थाम। या गोष्टी घेण्याचे आदेश दिले.

या शिबिराची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून, ध्वजारोहण व उद्घाटनाने झाली. शिबिरात बौद्ध उपासक उपासिका यांनी उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. समता सैनिक दलाचे प्रशिक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संरक्षण उपाध्यक्ष, नवनियुक्त मेजर आयु. संपत भोसले यांनी प्रशिक्षणादरम्यान ड्रिल, मार्चपास, शारीरिक तंदुरुस्तीचे विविध उपक्रम तसेच प्रात्यक्षिकांद्वारे सैनिकांना प्रशिक्षण देण्यात दिले.

सहाय्यक प्रशिक्षक म्हणून समता फोर्स च्या, समता सैनिक दलाच्या सातारा जिल्हा पूर्व च्या कंपनी कमांडर आयुनि अर्चना चव्हाण यांनी भारतीय संविधान, कायदे, अधिकार व कर्तव्ये याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात बौद्धिक चर्चासत्रे व प्रश्नोत्तरांद्वारे सहभागी महिला सैनिकांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले.

शिबिराच्या समारोपावेळी प्रशिक्षार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेण्यात आला. या उपक्रमामुळे युवकांमध्ये शिस्त, संघटन कौशल्य व सामाजिक जाणीव अधिक दृढ झाल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये सुजाता गायकवाड, रंजना रणवरे, चित्राताई गायकवाड, रजनी माने, शारदा घाडगे, नूतन बनसोडे, ज्योती मोहिते, संगीता मेश्राम, स्वाती भोसले, वृषाली झेंडे, मनाली डावरे, सुषमा भोसले, रेश्मा भोसले, निर्मला गायकवाड, शशिकला माने, प्रीती मोरे या महिला उपासीकांनी समता सैनिक दलाचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले. तसेच शिवाजी सावंत, भिकू भोसले, भीमराव लोंढे, सुनील मोहिते, शंकर ज्ञा कांबळे, सोमीनाथ घोरपडे, राजकुमार रणवरे, अविनाश जगताप हे प्रशिक्षणास उपस्थित होते. यावेळी एकूण 16 महिला व 8 पुरुष यांनी समता सैनिक दलाचे सैनिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

यावेळी सुजाता गायकवाड यांच्या नातेवाईक शिक्षिका रेश्मा गौतम बनसोडे यांनी महिला सैनिकांना समता सैनिक दलाच्या साड्यांचे वाटप केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा महिला विभागाच्या अध्यक्षा आयुनि सुजाता गायकवाड व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या महिला अध्यक्षा आयुनि रंजना राजकुमार रणवरे यांनी येणाऱ्या काळात ड्रेस सहित समता सैनिक दलाची महिला तुकडी तयार करण्याचा संकल्प केला. लवकरच त्यांच्या नेतृत्वात तालुक्यातील इतर ठिकाणीही महिला समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा महिला विभागाचे अध्यक्ष, आयुनि सुजाता गायकवाड, सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते, राज्याचे ऑडिटर आयु.अरुण साहेबराव गायकवाड, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु.भीमराव लोंढे, महिला तालुकाध्यक्ष रंजना रणवरे, तालुका शाखेचे कोषाध्यक्ष राजकुमार रणवरे, संघटक सुनील मोहिते, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु शिवाजी सावंत, सातारा जिल्हा पूर्वचे हिशोब तपासणीस अर्जुन ननावरे, सातारा जिल्हा पूर्वचे माजी कार्यालयीन सचिव अविनाश जगताप यांची उपस्थिती होती.

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वरांची ९१९ वी जयंती उत्साहात साजरी

0
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महात्मा बसवेश्वरांची ९१९ वी जयंती उत्साहात साजरी

सातारा, प्रतिनिधी:  अक्षय तृतीया या पवित्र दिवशी लिंगायत धर्माचे संस्थापक, मानवतेचे पुजारी आणि क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर यांची ९१९ वी जयंती संपूर्ण भारतात तसेच परदेशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक समाजव्यवस्थेपर्यंत ठळकपणे जाणवतो.
महात्मा बसवेश्वर यांनी १२व्या शतकात समाजातील जातीभेद, लिंगभेद आणि अन्यायकारक प्रथा यांना ठाम विरोध करून समता, बंधुता आणि श्रमप्रतिष्ठा यांचा संदेश दिला. कर्नाटकातील इंगळेश्वर बागेवाडी येथे जन्मलेल्या बसवेश्वरांनी लहान वयातच अन्यायाविरुद्ध आवाज उठवत पारंपरिक उपनयन संस्कारास विरोध केला. स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या व्यवस्थेविरोधात त्यांनी ठोस भूमिका घेतली.
कुडल संगम येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मंगळवेढा व कल्याण येथे राजकारभार सांभाळताना समाजपरिवर्तनाचे महान कार्य केले. त्यांनी ‘अनुभव मंडप’ या अद्वितीय विचारमंचाची स्थापना करून सर्व समाजघटकांना एकत्र आणले. या मंडपात ७०० शरण आणि ७० शरणी सहभागी होऊन समतेवर आधारित विचारमंथन करत होते.
“कायक वे कैलास” आणि “दासोह” या तत्वांच्या माध्यमातून त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि समानतेवर आधारित समाजरचना घडवली. त्यांच्या विचारांमुळे अनेकांनी वाईट प्रवृत्ती सोडून सदाचाराचा मार्ग स्वीकारला.
स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देताना त्यांनी स्त्रियांनाही धार्मिक व सामाजिक कार्यात समान स्थान दिले. अक्कमहादेवीसारख्या महान शरणींनी या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
महात्मा बसवेश्वर यांचे कार्य हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक क्रांतीचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या विचारांनी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना दिशा दिल्याचे मानले जाते.
ई.स. ११६७ मध्ये नागपंचमीच्या दिवशी त्यांनी लिंगैक्य प्राप्त केले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन, विचारमंथन, मिरवणुका आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

मौजे सासकल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
मौजे सासकल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मौजे सासकल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

फलटण : मौजे सासकल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने काढण्यात आलेली भव्य-दिव्य मिरवणूक गावातील मुख्य आकर्षण ठरली. यावेळी युवा उद्योजक लहुराजे सावंत, रघुनाथ गणपत मुळीक, प्रशांत साहेबराव मुळीक(मिस्त्री), जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून वंदन पूजन केले. मिरवणुकीच्या ट्रॉलीचे सारर्थ्य अक्षय भानुदास घोरपडे, अक्षय गार्डे यांनी केले.

यावर्षीच्या जयंती महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे जयंती महोत्सव समितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दान देण्यात आला. हा पुतळा आयु. माणिकराव घोरपडे (तात्या) यांनी उदार मनाने दान दिला असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या योगदानामुळे समाजामध्ये एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

मिरवणुकीची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य संजय घोरपडे यांनी केलेल्या बुद्ध वंदनेने करण्यात आली. त्यानंतर अत्यंत शीतल व संयमित आवाजात डीजेवर भीम गीतांचा सुरेल नाद सुरू झाला. डीजेचा आवाज कुठेही कर्णकर्कश नसून, मर्यादित आणि सुसंस्कृत ठेवण्यात आला होता. या भीम गीतांच्या तालावर तरुणाईने उत्स्फूर्तपणे नृत्य करत मिरवणुकीत सहभाग घेतला.

मिरवणुकीदरम्यान संपूर्ण वातावरण “जय भीम”च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. गावातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वत्र शिस्त, एकता आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर दर्शन घडले. यावेळी फटाक्यांची मर्यादित आतिशबाजी ही करण्यात आली. ही जयंती शांततेत आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याबद्दल जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी जयंती महोत्सव समिती चे प्रमुख दीपक घोरपडे, मधुकर घोरपडे, माणिकराव घोरपडे, बी.डी घोरपडे, लक्ष्मण निकाळजे, बौध्दाचार्य संजय प्र. घोरपडे, पोलिस उपनिरीक्षक विशाल श्रीमंतराव घोरपडे, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य श्रीमंतराव घोरपडे, अक्षय घोरपडे, नंदकुमार जगन्नाथ घोरपडे, किशोर घोरपडे, नितीन धनाजी घोरपडे, किरण घोरपडे, शैलेश घोरपडे, उत्तम बापूराव लोंढे, कुंदन घोरपडे, राजेंद्र प्र घोरपडे, हणमंत घोरपडे, संजय नामदेव घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र धोंडिबा घोरपडे, सौरभ घोरपडे, विशाल हणमंत घोरपडे, अमित घोरपडे,मनोहर नाथुजी घोरपडे, वंचित बहुजन आघाडी च्या सातारा पूर्वचे माजी अध्यक्ष भीमराव घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे व बौद्ध उपासक – उपासिका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.