Friday, June 26, 2026
Home Blog Page 25

एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा

0


सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या साताऱ्यात होणाऱ्या जाहीर सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. शहरभर लावण्यात आलेल्या बॅनर्समध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच महेश शिंदे यांचा फोटो गायब असल्याचं सांगितलं जात आहे. 

एकनाथ शिंदे यांची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आणि शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावर अनेक ठिकाणी महेश शिंदे यांचे फोटो नसल्याचे दिसून आले. यामागे पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा राग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Banner Controversy Satara : कार्यकर्त्यांची नाराजी उघड

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या घडामोडींनंतर महेश शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी बसवण्यासाठी शिवसेनेच्या भूमिकेपासून वेगळा निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, जिल्हा प्रमुख रणजीत भोसले यांनी महेश शिंदे यांचा बॅनरवर फोटो नसणे हे काही कार्यकर्त्यांकडून चुकून झाल्याचे सांगितले आहे.

Political Impact Satara : शिंदेंच्या सभेकडे सर्वांचे लक्ष

आता सोमवारी होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या सभेला महेश शिंदे उपस्थित राहणार का, ते व्यासपीठावर दिसणार का, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे शिंदे गटातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Political Rift Shivsena : युतीतून निर्माण झाला तणाव

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युतीला बहुमत असतानाही भाजपने सदस्य फोडून सत्ता मिळवली. या प्रक्रियेत शिवसेनेचे काही सदस्य भाजपच्या बाजूने गेल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

Satara Zilla Parishad Election : निवडणुकीतील मोठे राजकीय समीकरण

  • शिवसेना-राष्ट्रवादी युतीला 65 पैकी 35 जागा
  • भाजप 27 जागांसह मोठा पक्ष
  • बहुमतासाठी 33 सदस्यांची गरज
  • भाजपने 6 सदस्य फोडत अध्यक्षपद जिंकले
  • शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 3 सदस्य भाजपकडे
  • एका अपक्षाचा पाठिंबा निर्णायक ठरला

Mahesh Shinde Statement : महेश शिंदे यांचे स्पष्टीकरण

महेश शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली होती. मी कोणालाही अंधारात ठेवले नाही, माझी भूमिका स्पष्ट होती, असं ते म्हणाले होते. तसेच कारवाईबाबत निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असं ते म्हणाले होते. 

ही बातमी वाचा ;

आणखी वाचा



Source link

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फलटणमध्ये वाचनालयाचे नूतनीकरण; विद्यार्थ्यांसाठी नव्या उपक्रमांची घोषणा

0
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फलटणमध्ये वाचनालयाचे नूतनीकरण; विद्यार्थ्यांसाठी नव्या उपक्रमांची घोषणा

फलटण : फलटण नगरपरिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील वाचनालयाचे नूतनीकरण करण्यात आले. आगामी काळात विद्यार्थ्यांची स्वतंत्र कमिटी स्थापन करून त्यांच्या गरजेनुसार पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपरिषद घेणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी दिली.
मलठण येथील भीमज्योत जागृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोक जाधव, किरण राऊत आणि युवा नेते प्रतापसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
नगराध्यक्षांनी महतपुरा पेठेच्या योगदानाचे कौतुक करत, या भागाच्या विकासावर सातत्याने लक्ष ठेवले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच सामाजिक उपक्रमांसाठी नगरपरिषदेचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात निवृत्त वॉरंट ऑफिसर जे. एस. काकडे, ग्रंथमित्र आबासाहेब यादव आणि महाराष्ट्र पोलीस दलातील मयुरी चव्हाण यांचा समावेश होता. सन्मानपत्राचे वाचन सुरुची बडेकर आणि श्रावस्ती अहिवळे यांनी केले.
मुख्य वक्ते अॅड. आकाश आढाव यांनी आपल्या भाषणातून महापुरुषांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत, सकारात्मक बदलासाठी पंचशील आणि विपश्यना यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या स्वरचित कवितांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. कार्यक्रमात अंतरा बल्लाळ, दिक्षा कांबळे यांची भाषणे झाली, तर तनिष्का गायकवाड हिने भीमगीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
या सोहळ्यास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राजेंद्र अहिवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संग्राम बल्लाळ यांनी केले.

फलटण तालुक्यातील वैशालीताई कांबळे यांची सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण समितीवर बिनविरोध निवड

0
फलटण तालुक्यातील वैशालीताई कांबळे यांची सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण समितीवर बिनविरोध निवड

फलटण :- फलटण तालुक्यातील बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. वैशालीताई संदीप कांबळे यांची सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही निवड सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वैशालीताई कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
उच्च शिक्षित व तडफदार व्यक्तिमत्त्व असलेल्या वैशालीताई कांबळे या सर्व समाजघटकांना सोबत घेऊन समाजसेवा करण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांची समाजकल्याण समितीवर निवड केली आहे.
समाजातील वंचित व गरजू घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविणे, त्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल माजी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच  शिवसेनेचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, भोजराज नाईक निंबाळकर, शंभूराज नाईक निंबाळकर, मेघराज नाईक निंबाळकर तसेच शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
वैशालीताई कांबळे यांनी या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाजकल्याणाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली आहे.

फलटणमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ला वेग; १२३० घरकुलांचे उद्दिष्ट, नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन

0
फलटणमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ला वेग; १२३० घरकुलांचे उद्दिष्ट, नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन

फलटणमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ला वेग; १२३० घरकुलांचे उद्दिष्ट, नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन


फलटण : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत फलटण शहरात घरकुल वितरण प्रक्रियेला गती मिळत आहे. या योजनेतील लाभार्थी नेतृत्व बांधकाम (BLC) घटकांतर्गत फलटण नगरपरिषदेकडे आतापर्यंत एकूण २१० अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ९९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

मंजूर लाभार्थ्यांना गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून आर्थिक सहाय्य दिले जात असून, आतापर्यंत सुमारे ३५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचे पक्के घर मिळविण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होत आहे.

फलटण शहरासाठी या योजनेअंतर्गत शासनाने एकूण १२३० घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, सध्या अर्जांची संख्या कमी असल्याने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक पात्र नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. शहरातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना स्वतःचे सुरक्षित व पक्के घर उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. निखील जाधव तसेच नगराध्यक्ष मा. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “ही योजना सर्व पात्र नागरिकांसाठी एक मोठी संधी आहे. जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा.”

योजनेविषयी अधिक माहिती, पात्रता निकष तसेच अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नागरिकांनी फलटण नगरपरिषद येथील प्रधानमंत्री आवास योजना कक्षाला भेट देऊन मार्गदर्शन घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

फलटणमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; आठवडी बाजाराचे ठिकाण बदलले

0
फलटणमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; आठवडी बाजाराचे ठिकाण बदलले

फलटणमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; आठवडी बाजाराचे ठिकाण बदलले

फलटण :- फलटण शहर व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिरवणुकीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक ते मालोजीराजे पुतळा या प्रमुख परिसरातून जाणार असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मार्गांवरून प्रवास करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी, त्या दिवशी होणारा आठवडी बाजार स्थलांतरित करण्यात आला आहे. हा बाजार गिरवी नाका, शासकीय विश्रामगृह ते बी.एस.एन.एल. ऑफिस रोड, कामगार वसाहत परिसर येथे भरविण्यात येणार आहे.
फलटण नगरपालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ही माहिती दिली असून, सर्व नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल ९९.१०% — ११२ पैकी १११ विद्यार्थी उत्तीर्ण

0
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल ९९.१०% — ११२ पैकी १११ विद्यार्थी उत्तीर्ण

श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल ९९.१०% — ११२ पैकी १११ विद्यार्थी उत्तीर्ण

फलटण, जाधववाडी (दि. १६ एप्रिल २०२६):
फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित जाधववाडी येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल (CBSE) ने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत भव्य यश संपादन केले असून शाळेचा निकाल तब्बल ९९.१०% इतका लागला आहे. परीक्षेस बसलेल्या ११२ विद्यार्थ्यांपैकी १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशामध्ये कु. तुलसी बाळासाहेब जठार हिने ९७.६% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कु. पूर्वा पराग घनवट आणि रुद्रप्रताप जितेंद्र साळुंखे (९७%) यांनी संयुक्तरीत्या मिळवला. तृतीय क्रमांक शिवम रविकिरण राऊत व कु. श्रावणी सोमनाथ पवार (९६.६%) यांनी संयुक्तरीत्या मिळवला.
शाळेच्या निकालातील विशेष बाब म्हणजे ११२ विद्यार्थ्यांपैकी ८५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३२ इतकी आहे.
या यशामागे शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मराठी विषयासाठी रुबिना बागवान, हिंदीसाठी शीतल भोसले, इंग्रजीसाठी प्रीती एकल, गणितासाठी कै. तुकाराम शेलार, विज्ञानासाठी मयुरा फणसे, नूतन खेडकर व सुनिता नाईक-निंबाळकर, समाजशास्त्रासाठी अर्चना काटकर व वर्षा खोमणे, तसेच AI/IT साठी दीपज्योती दंडिले, चांदणी कदम व आयेशा पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, तसेच संस्थेचे पदाधिकारी, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्या मिनल दिक्षित, उपप्राचार्या स्नेहल भोसले, पर्यवेक्षिका प्रियांका जठार व अर्चना काटकर, सर्व शिक्षकवृंद, पालक आणि मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

“महापुरुषांना जातींत नाही, विचारांत जपा” — आयु. बाबासाहेब जगताप

0
“महापुरुषांना जातींत नाही, विचारांत जपा” — आयु. बाबासाहेब जगताप

महापुरुषांना जातींत नाही, विचारांत जपा” — आयु. बाबासाहेब जगताप

फलटण (प्रतिनिधी) : दि. १५ एप्रिल २०२६ रोजी इंजिनिअरिंग कॉलेज फलटण येथे “महापुरुषांचे देशासाठी योगदान” या विषयावर आयु. बाबासाहेब दिलीप जगताप सर यांचे प्रभावी व मार्गदर्शक व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. मनोजकुमार दळवी साहेब होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयु. विठ्ठल निकाळजे सर (मुख्याध्यापक, ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी) उपस्थित होते. यावेळी आयु. आनंद जगताप यांनीही विशेष उपस्थिती दर्शवली.

आपल्या व्याख्यानात आयु. बाबासाहेब जगताप सर यांनी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला. महात्मा फुले यांनी समाजसुधारणेसाठी केलेले कार्य सांगताना त्यांनी मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा, तसेच सावित्रीबाई फुले यांचे पहिले स्त्री शिक्षिका म्हणून असलेले योगदान अधोरेखित केले. याशिवाय सतीप्रथा बंद करण्यासाठी नाभिक समाजाचा संप घडवून आणलेली ऐतिहासिक घटना त्यांनी विशद केली.
तसेच डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडताना त्यांच्या बालपणापासून ते शिक्षणापर्यंतचा प्रवास, साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमधील शिक्षण, देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापनेमागील त्यांचा विचार, तसेच महाडचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह यांसारख्या सामाजिक चळवळींचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्यावरही त्यांनी विशेष भर दिला.

व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी महापुरुषांना जाती-जातीमध्ये विभागण्याऐवजी ते संपूर्ण समाजाचे व देशाचे आहेत, ही भावना आजच्या पिढीने जोपासणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन इंजिनिअरिंग कॉलेज फलटणचे समन्वयक श्री. अमोल खेसे सर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. प्रतीक्षा भोसले मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. आशा दुधाळ मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटणमध्ये भीम जयंतीचा ‘ना भूतो न भविष्यती’ सोहळा; शिस्त, ऐक्य आणि भव्यतेचा अनोखा संगम

0
फलटणमध्ये भीम जयंतीचा ‘ना भूतो न भविष्यती’ सोहळा; शिस्त, ऐक्य आणि भव्यतेचा अनोखा संगम

फलटणमध्ये भीम जयंतीचा ‘ना भूतो न भविष्यती’ सोहळा; शिस्त, ऐक्य आणि भव्यतेचा अनोखा संगम

फलटणमध्ये भीम जयंतीचा ‘ना भूतो न भविष्यती’ सोहळा; शिस्त, ऐक्य आणि भव्यतेचा अनोखा संगम

फलटण : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण येथे साजरा झालेला महोत्सव खरोखरच “ना भूतो न भविष्यती” असा ठरला.

फलटणची भीम जयंती ठरली ऐतिहासिक; भव्य मिरवणूक आणि देखाव्यांनी वेधले लक्ष

‘ना भूतो न भविष्यती’ भीम जयंती; फलटणमध्ये अभूतपूर्व उत्सवाचा जल्लोष

शिस्त, नियोजन आणि एकतेचा आदर्श; फलटणची भीम जयंती ठरली सर्वश्रेष्ठ

फलटणमध्ये भीम जयंतीचा भव्य सोहळा; कोलंबिया विद्यापीठ सेट ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

भव्य देखावे, शिस्तबद्ध मिरवणूक आणि ऐक्याचा संदेश; फलटणची भीम जयंती ठरली संस्मरणीय

संपूर्ण जगभरात बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सोलापूर, नागपूर, बीड, पुणे यांसारख्या शहरांतील भीम जयंती दरवर्षी आकर्षणाचे केंद्र ठरते. मात्र या सर्वांमध्ये फलटण येथील जयंतीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

फलटणची भीम जयंती ही केवळ जल्लोषापुरती मर्यादित नसून ती शिस्त, नियोजन आणि सामाजिक एकतेचा आदर्श ठरते. १३ एप्रिलच्या मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुष्पमाला अर्पण करून उत्सवाची सुरुवात होते. विविध जयंती मंडळांनी साठवलेल्या निधीतून प्रकाशित केले जाणारे कॅलेंडर हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरते, जे केवळ फलटण किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता परदेशातही पोहोचते.

या वेळी लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण बाबासाहेबांच्या विचारांवर मनोगते व्यक्त करतात. बौद्धाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिसरण, पंचशील, भीमस्मरण आणि भीमस्तुती सामूहिकरीत्या घेतली जाते. निळा ध्वज फडकवत मध्यरात्रीचा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडतो. यावर्षीही अतिशय दिमाखात विद्युत घोषणाही सह हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवाचे मनापासून कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.

रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय येवले म्हणाले, “ही जयंती अभूतपूर्व असून संपूर्ण जयंती मंडळाचे कौतुक करूनही ते अपुरेच आहे. हरीष काकडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.”

फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक विकास काकडे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि अभूतपूर्व वातावरणात साजरी होत आहे. यामागे जयंती मंडळाचे कष्ट, मेहनत आणि योग्य नियोजन आहे. ही जयंती सर्वसमावेशक व वैविध्यपूर्ण झाली आहे. मी सर्व भीम अनुयायांना शुभेच्छा देतो तसेच हरीष काकडे व जयंती महोत्सव समितीचे अभिनंदन करतो.”

नगरसेवक सचिन अहिवळे म्हणाले, “ही जयंती आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक ठरली आहे. यासाठी जयंती मंडळाने खूप परिश्रम घेतले. हरीष काकडे यांनी नव्या टीमसोबत अतिशय भव्य सोहळा उभा केला आहे. अनेक अडचणींवर मात करून दिमाखदार जयंती साजरी करण्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. मी संपूर्ण समितीचे कौतुक करतो.”

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता अहिवळे म्हणाले, “ही जयंती ‘ना भूतो न भविष्यती’ अशी ठरली आहे. एवढी भव्य जयंती यापूर्वी कधी झाली नाही. विशेष म्हणजे तरुणांना सोबत घेऊन हरीष काकडे यांनी डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा साकारला आहे. त्याबद्दल संपूर्ण जयंती महोत्सव समितीचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.”

यावेळी लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य. ऍड.वर्धमान पुष्पा विनायक अहिवळे तसेच फलटण नगर परिषद चे आरोग्य निरीक्षक मुकेश पुष्पा विनायक अहिवळे यांनी हरीष काकडे यांच्यासह संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा मानपत्र देऊन गौरव केला.

यावेळी बोलताना प्रा. वर्धमान अहिवळे म्हणाले, “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जयंती महोत्सव समितीने अत्यंत मेहनत, नियोजन आणि शिस्तबद्धतेने हा दिमाखदार सोहळा साकारला आहे. अशा भव्य आयोजनामध्ये समितीचे योगदान खरोखरच मोलाचे आहे. त्यामुळे केवळ पुष्पगुच्छ किंवा शब्दसुमनांनी गौरव करण्यापेक्षा त्यांच्या कार्याची महती अधोरेखित करणारे मानपत्र देऊन आम्ही संपूर्ण समितीचा सन्मान करत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “यापुढेही आपण असेच कार्य करत महामानवांच्या विचारांचा प्रसार कराल, अशी अपेक्षा आहे. सर्वांना भीम जयंतीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा!”

यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष हरीष काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “आमचे एकच उद्दिष्ट होते. आपल्या महामानवाची जयंती दिमाखदार पद्धतीने साजरी करणे. अनेक अडचणी, टीका आणि अपमान सहन करत आम्ही काम केले. मात्र भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचारांना न्याय देणारा सोहळा घडवण्याचा आमचा निर्धार कायम होता. सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. विशेषतः सनी दादांचे मोलाचे सहकार्य लाभले. मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि जयंती महोत्सव समितीच्या वतीने सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.”

सायंकाळी ७.३० वाजता पंचशील चौक येथून निघणारी भव्य मिरवणूक ही या जयंतीची खरी ओळख आहे. महिलांपासून सुरुवात होऊन, बालक-बालिका, तरुण आणि ज्येष्ठ उपासक अशा दोन-दोनच्या शिस्तबद्ध रांगेत ही मिरवणूक पुढे सरकते. घोषणांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करत, वाद्यांच्या तालावर आणि त्यांच्या जीवनकार्याचे जिवंत देखावे सादर करत मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे येऊन पोहोचते.
विशेष म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व गटांना समान सन्मान देत हा उत्सव साजरा केला जातो. हीच फलटणच्या जयंतीची खरी ताकद आहे. कोणताही गोंधळ किंवा अनुशासनभंग न होता शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने मिरवणूक पार पडते.

यंदाच्या वर्षीही सातारा या ठिकाणावरून भीम ज्योतीचा आगमन सकाळी नऊ वाजता बाणगंगा नदीच्या पुलावर झाले. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नेहमी ज्योतीचे स्वागत करण्यात आले. यावेळी

मान्यवरांच्या उपस्थितीत जयंतीला सुरुवात झाली. रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सचिन पाटील यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ झाला.

यावर्षीच्या भीम जयंतीतील सर्वात खास आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारलेला Columbia University चा भव्य आणि देखणा सेट होय. या आकर्षक सजावटीने केवळ फलटण शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील बौद्ध उपासक-उपासिका व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आणि तो खऱ्या अर्थाने जयंतीचा केंद्रबिंदू ठरला.
या सेटसोबत उभारलेली गौतम बुद्ध यांची शुभ्र, उभी आणि नेत्र उघडलेली मनमोहक प्रतिमा सर्वांच्या मनाला शांतता व प्रेरणा देणारी ठरली. त्या पवित्र वातावरणात उभा राहून प्रत्येकजण एका वेगळ्याच आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव घेत होता.

या भव्य रचनेत सर्वात वरती डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांचा खुर्चीवर विराजमान भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला होता. त्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः गर्दी उसळली होती. प्रत्येकजण त्या नेत्रदीपक क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक होता.

तसेच समोरच्या बाजूस रमाबाई आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचा आकर्षक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या ठिकाणी नागरिक अतिशय श्रद्धा, कृतज्ञता आणि अभिमानाने सेल्फी घेत, या महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करत होते.

यावर्षीच्या भीम जयंती मिरवणुकीत आकर्षणाचा खरा केंद्रबिंदू ठरले ते भव्य आणि आशयघन जिवंत देखावे. फलटण येथील या मिरवणुकीने केवळ भव्यता नव्हे, तर बाबासाहेबांच्या विचारांचे सजीव दर्शन घडवले.

विद्युत रोषणाईने सजवलेला रथ, हत्तीवर विराजमान भीमराव रामजी आंबेडकर यांची प्रतिमा, आणि त्यासोबत भारतीय संविधानामुळे महिलांना मिळालेल्या अधिकारांचे प्रभावी सादरीकरण हे विशेष लक्षवेधी ठरले. डॉक्टर, वकील, वैज्ञानिक, पोलीस अधिकारी, न्यायाधीश अशा विविध भूमिकांमध्ये महिलांचे सादरीकरण करून संविधानाने दिलेल्या समानतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

एका देखाव्यात महामानवांच्या विविध प्रतिमांसह दोन भव्य हत्ती आणि त्यांच्या मधोमध खुर्चीवर विराजमान बाबासाहेबांचा देखावा साकारण्यात आला होता, जो उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तसेच मूकनायक या ऐतिहासिक पाक्षिकाचा देखावा संपूर्ण छपाई मशीनसह उभारण्यात आला होता, ज्यातून बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील योगदानाची जाणीव करून देण्यात आली.

धम्माचा संदेश देणाऱ्या एका देखाव्यात उभी असलेली बाबासाहेबांची प्रतिमा, समोर धम्मचक्र आणि सोबत गौतम बुद्ध यांच्या परंपरेतील भिक्खूंच्या प्रतिमा साकारण्यात आल्या होत्या, ज्यातून बौद्ध धम्माचे तत्वज्ञान प्रभावीपणे मांडण्यात आले.

मिरवणुकीच्या सुरुवातीलाच बाबासाहेबांचा भव्य पुतळा दिमाखात मार्गदर्शन करत असल्याचा भास होत होता. त्याचबरोबर घोड्यांवर बसलेले छोटे-छोटे भीमसैनिकही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांच्या उत्साहातच पुढच्या पिढीतील जागरूकतेची झलक दिसत होती.

यावर्षी फलटण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १ ते ८ एप्रिल दरम्यान विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. रक्तदान शिबिर, संविधान विषयक मार्गदर्शन, उद्योग शिबिर, आंबेडकरी चळवळीवरील संवाद, होम मिनिस्टर, भीम गीत कार्यक्रम आदी उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या सर्व कार्यक्रमांमध्ये फलटण नगर परिषदेचे नगरसेवक मा. सचिन (सर) अहिवळे, मा. सनी (दादा) अहिवळे, नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे, डॉ. प्रसाद जोशी, प्रेरक प्रशिक्षक उद्योजकता विकासचे शशिकांत कुंभार, उद्योग निरीक्षक अमृता बाळासाहेब अहिवळे, बाळासाहेब गंगाराम अहिवळे, आंबेडकर चळवळ व आजचा तरुण या विषयाच्या मांडणीसाठी दंगलकार नितीन चंदनशिवे, दत्ता अहिवळे, रिपब्लिकन पक्षाचे विजय येवले, मधुकर काकडे, संजय निकाळजे, मुन्ना शेख, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे, प्रा. शिवाजी सावंत, ‘काळजावर कोरलं नाव आमच्या भीमा कोरेगाव’ फेम अजय देहाडे, नगरसेविका मीना जीवन काकडे, वैशाली संदीप कांबळे जिल्हा परिषद सदस्य सातारा, ‘व्ही आय पी राहणं’ फेम साजन बेंद्रे व विशाल, ‘प्रबुद्ध हो मानवा’ गायन पार्टी शाहीर विजय सरतापे, यांसह विविध मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमुळे समाजात जागृती, एकजूट व प्रेरणा निर्माण झाली.

एकूणच, या जिवंत देखाव्यांनी फलटण येथील भीम जयंती मिरवणूक अधिकच अर्थपूर्ण, प्रेरणादायी आणि संस्मरणीय बनवली.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण २०२६ मध्ये शशिकांत दिपक अहिवळे, सुजल शेखर गायकवाड, अनिकेत अमर अहिवळे, विराज चंद्रकांत घोडके, संघर्ष प्रशांत अहिवळे, प्रेम शंकर अहिवळे, संविधान हरिश काकडे, स्वप्निल सुभाष काकडे, आदर्श विरसिंह अहिवळे,देवराज महेश अहिवळे साईराज कांबळे. संघराज बाळासाहेब अहिवळे, निसर्ग हरिदास सावंत, अमर शंकर अहिवळे, संघकारा राजेश अहिवळे, साहिल अहिवळे या समिती चे हरिश हणमंत काकडे यांनी सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

एकूणच, फलटण येथील १३५ वी भीम जयंती ही केवळ उत्सव नसून बाबासाहेबांच्या विचारांचे जतन, शिस्तीचे दर्शन आणि सामाजिक ऐक्याचे भव्य प्रतीक ठरली आहे. या सर्व यशाचे श्रेय जयंती मंडळाचे अध्यक्ष हरीश काकडे व त्यांच्या सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीला जाते. जयंती महोत्सव समितीच्या कार्याला शुभेच्छा!💐💐💐

संकलन : सोमीनाथ घोरपडे, सामाजिक कार्यकर्ता
भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व संस्कार सचिव.

फलटणमध्ये भीम जयंतीचा ‘ना भूतो न भविष्यती’ सोहळा; शिस्त, ऐक्य आणि भव्यतेचा अनोखा संगम

0
फलटणमध्ये भीम जयंतीचा ‘ना भूतो न भविष्यती’ सोहळा; शिस्त, ऐक्य आणि भव्यतेचा अनोखा संगम

फलटणमध्ये भीम जयंतीचा ‘ना भूतो न भविष्यती’ सोहळा; शिस्त, ऐक्य आणि भव्यतेचा अनोखा संगम

फलटण : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण येथे साजरा झालेला महोत्सव खरोखरच “ना भूतो न भविष्यती” असा ठरला.

फलटणची भीम जयंती ठरली ऐतिहासिक; भव्य मिरवणूक आणि देखाव्यांनी वेधले लक्ष

‘ना भूतो न भविष्यती’ भीम जयंती; फलटणमध्ये अभूतपूर्व उत्सवाचा जल्लोष

शिस्त, नियोजन आणि एकतेचा आदर्श; फलटणची भीम जयंती ठरली सर्वश्रेष्ठ

फलटणमध्ये भीम जयंतीचा भव्य सोहळा; कोलंबिया विद्यापीठ सेट ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

भव्य देखावे, शिस्तबद्ध मिरवणूक आणि ऐक्याचा संदेश; फलटणची भीम जयंती ठरली संस्मरणीय

संपूर्ण जगभरात बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सोलापूर, नागपूर, बीड, पुणे यांसारख्या शहरांतील भीम जयंती दरवर्षी आकर्षणाचे केंद्र ठरते. मात्र या सर्वांमध्ये फलटण येथील जयंतीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

फलटणची भीम जयंती ही केवळ जल्लोषापुरती मर्यादित नसून ती शिस्त, नियोजन आणि सामाजिक एकतेचा आदर्श ठरते. १३ एप्रिलच्या मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुष्पमाला अर्पण करून उत्सवाची सुरुवात होते. विविध जयंती मंडळांनी साठवलेल्या निधीतून प्रकाशित केले जाणारे कॅलेंडर हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरते, जे केवळ फलटण किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता परदेशातही पोहोचते.

या वेळी लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण बाबासाहेबांच्या विचारांवर मनोगते व्यक्त करतात. बौद्धाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिसरण, पंचशील, भीमस्मरण आणि भीमस्तुती सामूहिकरीत्या घेतली जाते. निळा ध्वज फडकवत मध्यरात्रीचा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडतो. यावर्षीही अतिशय दिमाखात विद्युत घोषणाही सह हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवाचे मनापासून कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.

रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय येवले म्हणाले, “ही जयंती अभूतपूर्व असून संपूर्ण जयंती मंडळाचे कौतुक करूनही ते अपुरेच आहे. हरीष काकडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.”

फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक विकास काकडे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि अभूतपूर्व वातावरणात साजरी होत आहे. यामागे जयंती मंडळाचे कष्ट, मेहनत आणि योग्य नियोजन आहे. ही जयंती सर्वसमावेशक व वैविध्यपूर्ण झाली आहे. मी सर्व भीम अनुयायांना शुभेच्छा देतो तसेच हरीष काकडे व जयंती महोत्सव समितीचे अभिनंदन करतो.”

नगरसेवक सचिन अहिवळे म्हणाले, “ही जयंती आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक ठरली आहे. यासाठी जयंती मंडळाने खूप परिश्रम घेतले. हरीष काकडे यांनी नव्या टीमसोबत अतिशय भव्य सोहळा उभा केला आहे. अनेक अडचणींवर मात करून दिमाखदार जयंती साजरी करण्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले. मी संपूर्ण समितीचे कौतुक करतो.”

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता अहिवळे म्हणाले, “ही जयंती ‘ना भूतो न भविष्यती’ अशी ठरली आहे. एवढी भव्य जयंती यापूर्वी कधी झाली नाही. विशेष म्हणजे तरुणांना सोबत घेऊन हरीष काकडे यांनी डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा साकारला आहे. त्याबद्दल संपूर्ण जयंती महोत्सव समितीचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.”

यावेळी लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य. ऍड.वर्धमान पुष्पा विनायक अहिवळे तसेच फलटण नगर परिषद चे आरोग्य निरीक्षक मुकेश पुष्पा विनायक अहिवळे यांनी हरीष काकडे यांच्यासह संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा मानपत्र देऊन गौरव केला.

यावेळी बोलताना प्रा. वर्धमान अहिवळे म्हणाले, “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जयंती महोत्सव समितीने अत्यंत मेहनत, नियोजन आणि शिस्तबद्धतेने हा दिमाखदार सोहळा साकारला आहे. अशा भव्य आयोजनामध्ये समितीचे योगदान खरोखरच मोलाचे आहे. त्यामुळे केवळ पुष्पगुच्छ किंवा शब्दसुमनांनी गौरव करण्यापेक्षा त्यांच्या कार्याची महती अधोरेखित करणारे मानपत्र देऊन आम्ही संपूर्ण समितीचा सन्मान करत आहोत.”
ते पुढे म्हणाले, “यापुढेही आपण असेच कार्य करत महामानवांच्या विचारांचा प्रसार कराल, अशी अपेक्षा आहे. सर्वांना भीम जयंतीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा!”

यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष हरीष काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “आमचे एकच उद्दिष्ट होते. आपल्या महामानवाची जयंती दिमाखदार पद्धतीने साजरी करणे. अनेक अडचणी, टीका आणि अपमान सहन करत आम्ही काम केले. मात्र भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचारांना न्याय देणारा सोहळा घडवण्याचा आमचा निर्धार कायम होता. सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. विशेषतः सनी दादांचे मोलाचे सहकार्य लाभले. मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि जयंती महोत्सव समितीच्या वतीने सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.”

सायंकाळी ७.३० वाजता पंचशील चौक येथून निघणारी भव्य मिरवणूक ही या जयंतीची खरी ओळख आहे. महिलांपासून सुरुवात होऊन, बालक-बालिका, तरुण आणि ज्येष्ठ उपासक अशा दोन-दोनच्या शिस्तबद्ध रांगेत ही मिरवणूक पुढे सरकते. घोषणांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करत, वाद्यांच्या तालावर आणि त्यांच्या जीवनकार्याचे जिवंत देखावे सादर करत मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे येऊन पोहोचते.
विशेष म्हणजे, राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व गटांना समान सन्मान देत हा उत्सव साजरा केला जातो. हीच फलटणच्या जयंतीची खरी ताकद आहे. कोणताही गोंधळ किंवा अनुशासनभंग न होता शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने मिरवणूक पार पडते.

यंदाच्या वर्षीही सातारा या ठिकाणावरून भीम ज्योतीचा आगमन सकाळी नऊ वाजता बाणगंगा नदीच्या पुलावर झाले. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नेहमी ज्योतीचे स्वागत करण्यात आले. यावेळी

मान्यवरांच्या उपस्थितीत जयंतीला सुरुवात झाली. रामराजे नाईक निंबाळकर, आणि सचिन पाटील यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचा शुभारंभ झाला.

यावर्षीच्या भीम जयंतीतील सर्वात खास आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारलेला Columbia University चा भव्य आणि देखणा सेट होय. या आकर्षक सजावटीने केवळ फलटण शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील बौद्ध उपासक-उपासिका व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आणि तो खऱ्या अर्थाने जयंतीचा केंद्रबिंदू ठरला.
या सेटसोबत उभारलेली गौतम बुद्ध यांची शुभ्र, उभी आणि नेत्र उघडलेली मनमोहक प्रतिमा सर्वांच्या मनाला शांतता व प्रेरणा देणारी ठरली. त्या पवित्र वातावरणात उभा राहून प्रत्येकजण एका वेगळ्याच आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव घेत होता.

या भव्य रचनेत सर्वात वरती डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांचा खुर्चीवर विराजमान भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला होता. त्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः गर्दी उसळली होती. प्रत्येकजण त्या नेत्रदीपक क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक होता.

तसेच समोरच्या बाजूस रमाबाई आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचा आकर्षक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या ठिकाणी नागरिक अतिशय श्रद्धा, कृतज्ञता आणि अभिमानाने सेल्फी घेत, या महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करत होते.

यावर्षीच्या भीम जयंती मिरवणुकीत आकर्षणाचा खरा केंद्रबिंदू ठरले ते भव्य आणि आशयघन जिवंत देखावे. फलटण येथील या मिरवणुकीने केवळ भव्यता नव्हे, तर बाबासाहेबांच्या विचारांचे सजीव दर्शन घडवले.

विद्युत रोषणाईने सजवलेला रथ, हत्तीवर विराजमान भीमराव रामजी आंबेडकर यांची प्रतिमा, आणि त्यासोबत भारतीय संविधानामुळे महिलांना मिळालेल्या अधिकारांचे प्रभावी सादरीकरण हे विशेष लक्षवेधी ठरले. डॉक्टर, वकील, वैज्ञानिक, पोलीस अधिकारी, न्यायाधीश अशा विविध भूमिकांमध्ये महिलांचे सादरीकरण करून संविधानाने दिलेल्या समानतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

एका देखाव्यात महामानवांच्या विविध प्रतिमांसह दोन भव्य हत्ती आणि त्यांच्या मधोमध खुर्चीवर विराजमान बाबासाहेबांचा देखावा साकारण्यात आला होता, जो उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तसेच मूकनायक या ऐतिहासिक पाक्षिकाचा देखावा संपूर्ण छपाई मशीनसह उभारण्यात आला होता, ज्यातून बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील योगदानाची जाणीव करून देण्यात आली.

धम्माचा संदेश देणाऱ्या एका देखाव्यात उभी असलेली बाबासाहेबांची प्रतिमा, समोर धम्मचक्र आणि सोबत गौतम बुद्ध यांच्या परंपरेतील भिक्खूंच्या प्रतिमा साकारण्यात आल्या होत्या, ज्यातून बौद्ध धम्माचे तत्वज्ञान प्रभावीपणे मांडण्यात आले.

मिरवणुकीच्या सुरुवातीलाच बाबासाहेबांचा भव्य पुतळा दिमाखात मार्गदर्शन करत असल्याचा भास होत होता. त्याचबरोबर घोड्यांवर बसलेले छोटे-छोटे भीमसैनिकही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांच्या उत्साहातच पुढच्या पिढीतील जागरूकतेची झलक दिसत होती.

यावर्षी फलटण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १ ते ८ एप्रिल दरम्यान विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. रक्तदान शिबिर, संविधान विषयक मार्गदर्शन, उद्योग शिबिर, आंबेडकरी चळवळीवरील संवाद, होम मिनिस्टर, भीम गीत कार्यक्रम आदी उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या सर्व कार्यक्रमांमध्ये फलटण नगर परिषदेचे नगरसेवक मा. सचिन (सर) अहिवळे, मा. सनी (दादा) अहिवळे, नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे, डॉ. प्रसाद जोशी, प्रेरक प्रशिक्षक उद्योजकता विकासचे शशिकांत कुंभार, उद्योग निरीक्षक अमृता बाळासाहेब अहिवळे, बाळासाहेब गंगाराम अहिवळे, आंबेडकर चळवळ व आजचा तरुण या विषयाच्या मांडणीसाठी दंगलकार नितीन चंदनशिवे, दत्ता अहिवळे, रिपब्लिकन पक्षाचे विजय येवले, मधुकर काकडे, संजय निकाळजे, मुन्ना शेख, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे, प्रा. शिवाजी सावंत, ‘काळजावर कोरलं नाव आमच्या भीमा कोरेगाव’ फेम अजय देहाडे, नगरसेविका मीना जीवन काकडे, वैशाली संदीप कांबळे जिल्हा परिषद सदस्य सातारा, ‘व्ही आय पी राहणं’ फेम साजन बेंद्रे व विशाल, ‘प्रबुद्ध हो मानवा’ गायन पार्टी शाहीर विजय सरतापे, यांसह विविध मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमुळे समाजात जागृती, एकजूट व प्रेरणा निर्माण झाली.

एकूणच, या जिवंत देखाव्यांनी फलटण येथील भीम जयंती मिरवणूक अधिकच अर्थपूर्ण, प्रेरणादायी आणि संस्मरणीय बनवली.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण २०२६ मध्ये शशिकांत दिपक अहिवळे, सुजल शेखर गायकवाड, अनिकेत अमर अहिवळे, विराज चंद्रकांत घोडके, संघर्ष प्रशांत अहिवळे, प्रेम शंकर अहिवळे, संविधान हरिश काकडे, स्वप्निल सुभाष काकडे, आदर्श विरसिंह अहिवळे,देवराज महेश अहिवळे साईराज कांबळे. संघराज बाळासाहेब अहिवळे, निसर्ग हरिदास सावंत, अमर शंकर अहिवळे, संघकारा राजेश अहिवळे, साहिल अहिवळे या समिती चे हरिश हणमंत काकडे यांनी सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

एकूणच, फलटण येथील १३५ वी भीम जयंती ही केवळ उत्सव नसून बाबासाहेबांच्या विचारांचे जतन, शिस्तीचे दर्शन आणि सामाजिक ऐक्याचे भव्य प्रतीक ठरली आहे. या सर्व यशाचे श्रेय जयंती मंडळाचे अध्यक्ष हरीश काकडे व त्यांच्या सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीला जाते. जयंती महोत्सव समितीच्या कार्याला शुभेच्छा!💐💐💐

संकलन : सोमीनाथ घोरपडे, सामाजिक कार्यकर्ता
भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व संस्कार सचिव.

मौजे जिंतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; मा. सोमिनाथ घोरपडे यांचे विचारप्रवर्तक मार्गदर्शन

0
मौजे जिंतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; मा. सोमिनाथ घोरपडे यांचे विचारप्रवर्तक मार्गदर्शन

फलटण : मौजे जिंती येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण गावात जयंतीचे उत्साही आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.

या कार्यक्रमास मा. सोमिनाथ घोरपडे सर, बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते सर, शर्मिला रणवरे, विश्वास रणवरे, मा. उपसरपंच अमित रणवरे, अध्यक्ष सागर रणवरे तसेच भिमशक्ती तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. तसेच विविध तरुण मंडळांनी ठिकठिकाणी जयंती मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी मा. सोमिनाथ घोरपडे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर सखोल व अभ्यासपूर्ण मांडणी करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी बाबासाहेबांच्या बहुआयामी कार्याचा व्यापक आढावा घेतला. ते म्हणाले, “बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

औद्योगिक व आर्थिक क्षेत्रातील योगदान स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्राच्या विकासासाठी बाबासाहेबांनी दूरदृष्टीने दिशा दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांसारख्या संस्थांच्या उभारणीमागील विचार त्यांनी अधोरेखित केला. खाणी, विमा व पायाभूत उद्योगांच्या राष्ट्रीयीकरणाची संकल्पना मांडून देशाच्या आर्थिक प्रगतीचा पाया त्यांनी मजबूत केला.

जल व ऊर्जा क्षेत्रातील योगदानावर भाष्य करताना त्यांनी नमूद केले की, सेंट्रल वॉटर कमिशनसारख्या संस्थांची पायाभरणी बाबासाहेबांच्या विचारांतून झाली. दामोदर व हिराकूड प्रकल्पांसह केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या स्थापनेद्वारे राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना साकार झाली.

शेतकरी व कामगारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचा उल्लेख करताना त्यांनी १९३८ मधील खोतीप्रथा विरोधातील आंदोलन, “कसेल त्याची जमीन” ही भूमिका, तसेच कुळ कायदा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे महत्त्व स्पष्ट केले. कामगार मंत्री म्हणून ८ तासांचा कामाचा दिवस, पगारी रजा, महागाई भत्ता आणि कामगार हक्कांचे संरक्षण यांसारखे ऐतिहासिक निर्णय बाबासाहेबांनी घेतले, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी केले. त्यांनी वंदना व सूत्रपठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भिमशक्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.