Monday, September 14, 2026
Homeसाताराफलटणनगरपरिषद : जनतेचा चेहरा म्हणून विकास काकडे सर चर्चेत!

फलटणनगरपरिषद : जनतेचा चेहरा म्हणून विकास काकडे सर चर्चेत!

फलटण (प्रतिनिधी):फलटण नगरपरिषद निवडणुकीचा रणशिंग फुंकले गेले असून, प्रभाग क्रमांक १२ मध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. या प्रभागात सध्या एक नाव सर्वत्र चर्चेत आहे — विकास वसंतराव काकडे सर. सामाजिक कार्य, शिक्षण, सहकार आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका पाहता, मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.

सामाजिक बांधिलकीचा पक्का पाया
राजे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे विकास काकडे सर हे साहस क्रीडा मंडळाचे अध्यक्ष असून, त्यांनी रक्तदान शिबिर, पाठ्यपुस्तक वाटप, महापुरुष जयंती उत्सव, शैक्षणिक मदत अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजकार्याची ठसठशीत छाप उमटवली आहे.

कोविड काळात मदतीचा आधारस्तंभ
कोविडच्या संकटात त्यांनी गरीब कुटुंबांना धान्य वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तसेच ताथवडा आश्रमशाळा व वृद्धाश्रमातील नागरिकांना सहाय्य देत सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक जिल्हा दक्षता समितीचे सदस्य म्हणून अनेकांना न्याय मिळवून दिला.

शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव
श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि मुधोजी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. शिक्षक पतसंस्था व सहकारी संस्थांमध्ये व्हाइस चेअरमन पद भूषवताना त्यांनी पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार केला. सध्या ते सातारा सहकार बोर्डाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

विचार, संस्कृती आणि साहित्य यांची जपणूक
हिंदी राष्ट्रभाषा प्रचारक म्हणून पुणे हिंदी प्रचारक संस्थेचा पुरस्कार मिळवणारे काकडे सर यांनी 1991 मध्ये फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले स्मृती शताब्दी व्याख्यानमाला आयोजित करून समाजजागृतीचा पाया रचला.

राजघराण्याशी जिव्हाळ्याचं नातं
श्रीमंत रामराजे, रघुनाथराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी काकडे सर यांचे अतूट संबंध असून, राजे गटाचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख पक्की झाली आहे. अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते नेतृत्व करीत आले आहेत. चळवळीत सक्रिय सहभाग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी दलित, बहुजन आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखालीच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजेंची प्रतिमा मिरवणूक काढण्याचा मान भगवान बुद्ध जयंती महोत्सव समितीला मिळाला.

जनतेतून उमेदवारीची मागणी
प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांमध्ये विकास काकडे सरांविषयी विश्वास, आदर आणि आपुलकी आहे. त्यांच्या तळागाळातील कार्यामुळे, सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे आणि अभ्यासू नेतृत्वामुळे जनतेतूनच त्यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

स्थानिक राजकारणात त्यांच्या सारख्या अनुभवी, शैक्षणिक आणि सामाजिक जाणिवा असलेल्या नेतृत्वाच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments