Saturday, September 12, 2026
Homeसाताराबाणगंगा धरण 100 टक्के भरले; सांडव्यावरून पाणी वाहू लागले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा...

बाणगंगा धरण 100 टक्के भरले; सांडव्यावरून पाणी वाहू लागले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

फलटण प्रतिनिधी उमेश काकडे– मागील काही दिवसापासून  सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाणगंगा धरण जलसाठा झपाट्याने वाढून आता 100 टक्क्यांपर्यंत भरले आहे. परिणामी, धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाला असून बाणगंगा नदी पात्रात व आसपासच्या परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, आवश्यकता नसताना नदी पात्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व स्थानिक यंत्रणा सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments