Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रबारामतीच्या जिरायत भागासाठी अजित पवारांचा 'पाणी'दार प्रयत्न!

बारामतीच्या जिरायत भागासाठी अजित पवारांचा ‘पाणी’दार प्रयत्न!

🔹 जानाई-शिरसाई योजनेसाठी 438 कोटींचा निधी मंजूर, आता निरा-कहा योजनेसाठी तयारी सुरू
🔹 बारामती तालुक्यातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार

बारामती : विधानसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील जिरायत भागाची ‘जिरायत’ ही ओळख कायमस्वरूपी बदलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी 438 कोटी 47 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सुमारे 14,080 हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे.

यानंतर आता निरा-कहा उपसा सिंचन योजनेच्या कामालाही गती देण्यात येत असून, या प्रकल्पासाठी सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या संदर्भातील 29.64 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यातून सर्वेक्षण आणि इतर प्रक्रियांना वेग दिला जाणार आहे.

बारामतीतील पाणीप्रश्न सुटणार?

निरा-कहा योजनेमुळे मोरगावपासून अंजनगावपर्यंतच्या परिसरातील गावांना पाणी उपलब्ध होईल, ज्यामुळे जिरायत भागातील पाणीटंचाई कायमस्वरूपी संपुष्टात येईल. अजित पवारांनी दिलेल्या वचनानुसार पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याने बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments