
Jalna Accident : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना वडीगोद्री मार्गवारील शहापूर येथे आज सकाळी घडली. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस व मोसंबी भरुन येणाऱ्या ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर १४ जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. घटनास्थळाचे चित्र भीषण होते. अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. काही नागरिक गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.





