
ते पत्रकारांशी बोलत होते. देशात ईडीसारख्या यंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो हे मानव यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेचं उदाहरण देऊन सांगितलं. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडं काहीच नव्हतं. सुरुवातीला त्यांच्यावर करण्यात आलेला १०० कोटींचा आरोप नंतर सव्वा कोटींवर आला. प्रत्यक्षात त्याचाही काही पुरावा मिळाला नाही. न्यायालयानंही नंतर हेच सांगितलं. मात्र, तरीही त्यांना अटक झाली. कारण, त्यांनी सत्ताधाऱ्यांनी लिहून दिलेल्या चार प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिला होता, असा दावा मानव यांनी केला.