
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच अमूल कंपनीच्या कानपूर येथील टीमने ग्राहकाला फोन केला. अमूल कंपनीने माझी माफी मागितली आणि ऑर्डर रिफंड करत असल्याचे सांगितले, अशी माहिती ग्राहकाने दिली. गजेंद्र यादवच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. ऑनलाइन ऑर्डर केल्यावर कंपनी साठवून ठेवलेला माल पुरवते, त्यामुळे अशी प्रकरणे दररोज समोर येत आहेत, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली. दुसरा युजर म्हणतोय की, अमूलचे बरेच उत्पादन खराब असतात. यासोबतच हे लोक डिलिव्हरीलाही खूप उशीर करतात.