
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाकी नऊ आले आहेत. एवढेच नव्हेतर, जीवनावश्यक वस्तूंसाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलिंडर मोफत मिळतील. एकूण ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे अजित पवार यांनी म्हटले.





