
अर्जुनला बसणार धक्का!
तर, सायली देखील देवापुढे उभी राहून ‘माझं आणि अर्जुनच लग्न झालं आहे आणि माझं अर्जुन सरांवर खूप प्रेम आहे’, असं म्हणणार आहे. आता सायलीने तर एकतर्फी प्रेमाची कबुली दिली आहे. पण, सायलीचे हे बोलणं ऐकून अर्जुनला धक्का बसला आहे. पूर्णा आजी सायलीकडून सत्य वदवून घेत असताना अर्जुनने पाहिल्यामुळे आता आजीला सगळ्याच गोष्टी कळणार की, काय याचं टेन्शन त्याला आलं आहे. तो चैतन्यला फोन करून या सगळ्या परिस्थितीची कल्पना देणार आहे. तर, आता चैतन्य देखील काळजीत पडणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे.







