Tuesday, August 11, 2026
Homeसातारासातारा : अमृतवाहिनी नद्या उपक्रमाचे काय झाले? .. नागरिकांचा सवाल | पुढारी

सातारा : अमृतवाहिनी नद्या उपक्रमाचे काय झाले? .. नागरिकांचा सवाल | पुढारी

सातारा : अमृतवाहिनी नद्या उपक्रमाचे काय झाले? .. नागरिकांचा सवाल | पुढारी

[ad_1]








सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला अमृतवाहिनी नद्या कार्यक्रमाचा जल्लोषात सातारा जिल्ह्यात प्रारंभ झाला; पण नंतर काहीच उपक्रम न झाल्याने अमृतवाहिनी नद्या होणार तरी कधी? असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

जलतज्ञ राजेंद्रसिंग राणा यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. शासनाने याबाबतची रुपरेषा तयार केल्यानुसार त्याची सुरुवात सातारा जिल्ह्यातील विविध गावांत विशेषकरून कृष्णाकाठच्या गावातून झाली. याबाबतचे पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम उत्साहात पार पडले. अमृतवाहिनी नद्यांसाठी झालेल्या पहिल्या कार्यक्रमाची छायाचित्रासह बातम्या प्रसारमाध्यमातून आल्या. मात्र, या गोष्टीला जवळपास महिना होत आला तरी पुढे काहीच कार्यवाही होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिक साशंक आहेत.

अमृतवाहिनी नद्या हा उपक्रम नेमका काय आहे आणि तो कशाप्रकारे रावबला जाणार आहे? याची काहीच माहिती जनतेला नसल्यानेे या उपक्रमाबाबत ते साशंक आहेत.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments