
निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,चार राज्यांचे निकाल लागले. निवडणुकीत जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. देशात लोकशाही टिकावी यासाठी आपण प्रयत्न करतोय. २०२४ प्रजा ठरवेल राजा कोण असेल. हे मतदान ईव्हीएमवर होतं. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे त्यांनाच माहित. पण स्वाभिमानासाठी शिवसेनेचा जन्म झालाय. त्यामुळे जे शिवसेना संपवायला निघाले आहेत, त्यामुळे त्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. बाबुल सुप्रियो यांनीही अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. महाराष्ट्र-बंगालची ही परंपराच आहे. ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे.








