Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशPunjab Politics | काँग्रेसमधील तब्बल 20 नेत्यांनी अवघ्या दोन वर्षांत सोडला पक्ष;...

Punjab Politics | काँग्रेसमधील तब्बल 20 नेत्यांनी अवघ्या दोन वर्षांत सोडला पक्ष; पंजाबमध्ये भाजपात प्रवेशासाठी नेत्यांचा कल अधिक | Navarashtra (नवराष्ट्र)

Punjab Politics | काँग्रेसमधील तब्बल 20 नेत्यांनी अवघ्या दोन वर्षांत सोडला पक्ष; पंजाबमध्ये भाजपात प्रवेशासाठी नेत्यांचा कल अधिक | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

काँग्रेसमधील तब्बल 20 नेत्यांनी अवघ्या दोन वर्षांत सोडला पक्ष; पंजाबमध्ये भाजपात प्रवेशासाठी नेत्यांचा कल अधिक

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गेल्या दोन वर्षांत 20 बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. होशियारपूरचे आमदार, विधिमंडळ पक्षाचे उपनेते डॉ. राजकुमार चब्बेवाल यांनी आप पक्षात प्रवेश केला.

चंदीगड : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गेल्या दोन वर्षांत 20 बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. होशियारपूरचे आमदार, विधिमंडळ पक्षाचे उपनेते डॉ. राजकुमार चब्बेवाल यांनी आप पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये दाखल झालेले काही नेतेही पक्षात परतले असले तरी आता लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडणाऱ्यांची रांग पुन्हा वाढली आहे.

कॅप्टन अमरिंदर हे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2002 ते 2007 या काळात त्यांनी पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. कॅप्टन यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी 18 सप्टेंबर 2021 रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर मुलगी जयंदर कौर आणि कॅप्टनची पत्नी आणि पटियालाच्या काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. सुनील जाखड हे पंजाबमधील काँग्रेसचे मोठे नेते होते. सुनील जाखड हेही भाजपामध्ये असून, प्रदेशाध्यक्ष आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments