


पतंजलीचे निसर्ग आणि पर्यावरणावरील प्रेम त्यांच्या विचारसरणीत इतके खोलवर रुजलेले आहेत आज ते त्यांच्या जीवनात अविभाज्य घटक बनले आहेत. पतंजलीने नेहमीच संपूर्ण जीवनासाठी चांगले आरोग्य आणि निसर्गाशी एकरूप राहून जगण्यावर भर दिला आहे. कंपनीच्या हरित मोहिमा, पर्यावरणपूरक पद्धती आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासारखी पावले ही येणाऱ्या पिढ्यांसाठी निसर्गाचे रक्षण करण्याचा आणि पर्यावरणावरील परिणाम कमी करण्याचा प्रयत्न आहे.
पतंजलीचा असा विश्वास आहे की, शाश्वत विकास हे केवळ एक अधिकृत आश्वासन नाही तर ते त्यांच्या संपूर्ण व्यवसाय मॉडेल आणि तत्वज्ञानाचा अविभाज्य भाग आहे. कंपनीचे स्वप्न असे जग निर्माण करणे आहे. जिथे लोक निसर्गाशी एकरूप होऊन राहतील आणि नैसर्गिक उपचारांद्वारे त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊ शकतील. पतंजलीमध्ये शाश्वतता ही केवळ कॉर्पोरेट जबाबदारी का मानली जात नाही, तर त्याहूनही अधिक काय आहे ते समजून घेऊया?
पतंजलीच्या विचारसरणीची मुळे आपल्या भारतातील प्राचीन सनातन संस्कृतीत आहेत. येथे, शाश्वतता ही व्यवसायाची रणनीती नाही, तर जगण्याचा एक योग्य मार्ग आहे. स्वामी बाबा रामदेवजी म्हणतात त्याप्रमाणे, ‘जर योग जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला तर संपूर्ण जीवन बदलून जाते.’ ‘पतंजलीसाठी, शाश्वतता केवळ पृथ्वी आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यापुरती मर्यादित नाही. तर यामुळे प्रत्येक मानवाचा चांगला विकास आणि संपूर्ण समाजाला पुढे नेण्यात मदत होईल.
पतंजलीने आधुनिक काळाच्या गरजांनुसार योग आणि आयुर्वेदासारखे प्राचीन ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले आहे. याद्वारे तो लोकांना केवळ फिटनेस फ्रीक बनवत नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचे महत्त्व देखील समजावून सांगत आहे. आपल्या कठोर परिश्रमाने, स्वामी रामदेव यांनी योगाला एक असा उद्योग बनवले आहे जो केवळ पैसे कमविण्यापुरता मर्यादित नाही तर लोकांचे जीवन सुधारण्यावर देखील भर देतो. त्याचा दृष्टिकोन सामान्य व्यावसायिकाच्या विचारसरणीपेक्षा वेगळा आहे, जिथे त्याचे ध्येय पैसे कमवणे आणि लोकांचे भले करणे असते.
स्वदेशी उत्पादनावर भर देऊन, पतंजलीने केवळ भारतीय अर्थव्यवस्था सुधारली नाही तर लोकांना परदेशी उत्पादनांवरील अवलंबित्वापासून मुक्त केले आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पतंजली हा पहिला स्वदेशी ब्रँड आहे जो कोट्यवधी घरांपर्यंत पोहोचला. यावरून पतंजलीची व्याप्ती आणि प्रभाव किती व्यापक आहे हे दिसून येते.
पतंजलीचा स्थानिक उत्पादने जागतिक स्तरावर ओळखली जात आहे. स्वामी रामदेव यांचे स्वप्न १०० कोटींहून अधिक घरांमध्ये आणि जगातील १०० हून अधिक देशांमध्ये पोहोचण्याचे आहे. अशाप्रकारे, ते ‘स्थानिक ते जागतिक’ बनवण्याची संकल्पना पूर्ण करत आहेत.

Patanjali : पतंजली हा भारतातील टॉप FMCG ब्रॅण्ड्सपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या कामकाजात पर्यावरणरक्षणाला आपले सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कंपनी केवळ हरित उपक्रमच हाती घेत नाही तर पर्यावरणासाठी चांगल्या पद्धती देखील अवलंबत आहे. कंपनीचे उद्दिष्ट निसर्गाचे रक्षण करणे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी पृथ्वी निरोगी करणे आहे.
पतंजलीने आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये पर्यावरणीय काळजीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ते सांगत आहेत की निसर्गालासोबत घेऊन चालायला हवे. सेंद्रिय उत्पादने आणि वातावरण लक्षात ठेवून बनविलेली धोरणे केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. म्हणूनच, आपण समजूया की पतंजली येणाऱ्या पिढ्यांसाठी निसर्गाचे जतन कसे करत आहे.
पतंजलीचं म्हणणं आहे की, आयुर्वेद आणि पर्यावरण एकमेकांपेक्षा वेगवेगळं नाही आहे. आयुर्वेदासाठी नैसर्गिक औषधी वनस्पती आणि स्वच्छ वातावरण आवश्यक आहे. त्यामुळे पतंजली केवळ आयुर्वेदिक प्रोडक्टच नाही तर निसर्गाची देखभाल सुद्धा करते. कंपनीचा दावा आहे की आरोग्य निरोगी राहणं हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण निसर्गासोबत मिळून मिसळून राहू. कारण पतंजली केवळ व्यवसायासाठी नाही तर पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने काम करीत आहे. ते बहुतेक त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक प्रतिसादाखाली अशी काम करतात की ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करता येईल आणि आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवता येईल.
पतंजलीने नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवण्यासाठी अनेक पाऊल उचलली आहेत. कंपनी वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम राबवते. तसेच पाणी वाचवण्याच्या उपक्रमावर काम करतेय. तसेच कंपनीमध्ये अशी उत्पादन बनवली जात आहेत ज्यामुळे पर्यावरणाला अजिबात नुकसान पोहोचत नाही. पाणी स्वच्छ ठेवणे, पावसाचे पाणी गोळा करणे आणि साफसफाई यासारख्या कामांद्वारे नैसर्गिक संसाधने वाचविण्याचा प्रयत्न करणे यासाठी पतंजली प्रयत्न करत आहे.
पतंजली उत्पादन आणि पुरवठा कामात अशा पद्धतींचे अनुसरण करते ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही. कंपनी असे प्लांट चालवते जे कमी विजेवर चालतात. ज्यातून कचरा कमी उत्पन्न होतो तसेच उत्पन्न झाला तरी त्याला रिसायकल केले जाते. या व्यतिरिक्त पतंजली पाण्याचा वापर काळजीपूर्वक करते. जेणेकरून पाण्याचा अपव्यय कमी होऊ शकेल. विशेषत: भारताच्या भागात जेथे पाण्याच्या कमतरतेबद्दल मोठी समस्या आहे.
FMCG सेक्टरमध्ये पॅकेजिंग हे कचऱ्याचा एक प्रमुख स्रोत आहे. पतंजलीने पॅकेजिंगमध्ये अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला. पतंजलीच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी अधिकतर अशा गोष्टींचा उपयोग केला जातो ज्या मातीत सहज मिसळल्या जातील किंवा दुसऱ्यांदा वापरल्या जाऊ शकतील जसे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक किंवा रिसायकलिंग या पद्धतीने. कंपनी आता सिंगल यूज प्लास्टिकचा वापर हळू हळू कमी करत आहे. या हरित पॅकेजिंगमुळे केवळ कचराच कमी होणार नाही तर त्याऐवजी, लोकांना हे देखील समजले आहे की आपण आता पर्यावरणास अनुकूल गोष्टींकडे वळायला हवे.
मुंबई : कोयनाधरण प्रकल्पग्रस्तांनी (Koyana) राज्यासाठी केलेला त्याग मोठा आहे. त्यांना पर्यायी जमिन देणं शासनाचं कर्तव्य असून, या धरणग्रस्तांना पर्यायी जमिन देण्यासंदर्भात आलेले प्रस्ताव पुणे, सातारा, सांगली, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ तपासून महिनाअखेपर्यंत पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवावेत. विभागीय आयुक्तांनी अर्जांची पडताळणी करावी. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात धरणग्रस्तांच्या संघटनांसोबत बैठक घेऊन पात्र धरणग्रस्तांना जमीन वाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
कोयना धरणग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन आणि पर्यायी जमिन वाटपाचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून तो सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. यापूर्वीही अनेकदा बैठका घेऊन त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी दूर केल्या आहेत. आजमितीस सातारा जिल्ह्यात 310 आणि सांगली जिल्ह्यात 215 पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी तयार असून त्यांना जमिनवाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. उर्वरीत जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्याकडील प्रस्तावांची तपासणी करुन आपापल्या जिल्ह्यांचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवावेत. विभागीय आयुक्त त्यांच्या स्तरावर निर्णय घेतील, जे प्रश्न शासनस्तरावर सोडवायचे असतील, ते शासनाकडे पाठवावेत. त्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वित्त विभागाचे प्रभारी अपर मुख्य सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, कोकणचे विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी, धरणग्रस्तांचे नेते तथा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कोयना धरणग्रस्त-अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेचे संघटक चैतन्य दळवी आदींसह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीसीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात वसलेले कोयना धरण भारतातील एक महत्त्वाचे आणि भव्य धरण मानले जाते. कोयना नदीवर उभारलेले हे धरण अभियांत्रिकी कौशल्याचे अप्रतिम उदाहरण आहे. घनदाट जंगल, निसर्गरम्य परिसर आणि विविध वन्यजीवांनी नटलेले हे धरण डोळ्यांचे पारणे फेडते. महाराष्ट्राच्या जलविद्युत उत्पादनात मोलाचा वाटा उचलणारे हे धरण केवळ ऊर्जा स्रोत नसून, निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक रमणीय ठिकाणही आहे. कोयना धरणाच्या बांधकामाची सुरुवात 1956 मध्ये झाली आणि 1963 मध्ये ते पूर्ण झाले. हे धरण जलविद्युत निर्मिती आणि सिंचनासाठी निर्माण करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये याचा महत्त्वाचा वाटा आहे.
सरन्यायाधीशांची काल शपथ, आज निकाल; पहिल्याच निर्णयात नारायण राणेंना झटका, मिलीभगत पाहून खडसावलं
अधिक पाहा..

Sonu Nigam: कन्नड समाजाचा अपमान केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने गायक सोनू निगमला दिलासा दिला आहे. सोन निगमवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले असले तरी तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. सोनू निगमने आपल्याविरोधात दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Jammu Kashmir Encounter: जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरामधील त्राल येथे गुरुवारी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा जवानांनी या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं. त्रालमध्ये अद्यापही गोळीबार सुरु आहे. लपलेल्या दहतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान चकमकीत ठार झालेल्या दहशतवादी आमिर वानीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो व्हिडीओ कॉलवरुन आपल्या आईशी बोलताना दिसत आहे.
व्हिडीओत आमिर वानीची आई त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी विनवणी करता दिसत आहे. पण तो आपल्या आईचं म्हणणं ऐकण्यास नकार देतो. व्हिडीओ कॉलेमध्ये त्याची आई स्थानिक भाषेत बोलताना ऐकू येत आहे की, “मुला आत्मसमर्पण कर”. पण आमिर वानी मुलाचं काहीच ऐकत नाही आणि जवानांवर गोळीबार करतो. अखेरीस सुरक्षा जवानांसह झालेल्या चकमकीत तो मारला जातो.
Pakistan sponsored Terrorist Aamir Nazir Wani of Jaish e Muhammad calls his family before being killed in a security operation by Indian Army and J&K Police in Tral, Pulwama of South Kashmir. pic.twitter.com/39y8J3lHC1
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 15, 2025
व्हिडीओ कॉलमध्ये जेव्हा आई आमिरला सांगते की, ‘मुला सरेंडर कर’ त्यावर तो उत्तर देतो ‘सैन्याला समोर येऊ दे, मग पाहतो’.
हा चकमकीच्या आधीचा व्हिडीओ आहे. ज्या घऱात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. तिथूनच तो व्हिडीओ कॉलवर बोलत होता असं समजत आहे. व्हिडीओ कॉलवर आईशी बोलत असताना त्याच्या हातात एके-47 रायफल दिसत आहे.
Drone footage from Tral, moments before these terrorists were neutralised by the Indian Army.
Look closely — that’s the fear in their eyes.
This is what it looks like when you come face to face with the Indian Armed Forces.#IndianArmy
pic.twitter.com/PWolu4jOki— Nikhil saini (@iNikhilsaini) May 15, 2025
आमिरशी त्याची आई, बहीण आणि चकमकीत ठार झालेल्या आसिफच्या बहिणीने संवाद साधला. आसिफच्या बहिणीने विचारलं होतं, माझा भाऊ कुठे आहे? आसिफ तोच दहशतवादी आहे ज्याचं घर IED ने उडवण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने आत्मसमर्पण करावं अशी लष्कराची इच्छा होती. मात्र त्याने आत्मसमर्पण करण्याऐवजी सैन्यांवर गोळी चालवली.

Bhool Chuk Maaf Movie: राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा ‘भूल चुक माफ’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच वादात अडकला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याचे प्लान केले होते. यानंतर पीहीआर सिनेमाने याला विरोध केला होता. आता एक नवीन अपडेट समोर आली आहे की हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे आणि आता चित्रपटाची नवीन प्रदर्शन तारीख समोर येत आहे.


Social media influencer Marquez: : मेक्सिकोमध्ये एका २३ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे नाव सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व्हॅलेरिया मार्केझ असे आहे. घटनेच्या वेळी मार्क्वेझ तिच्या ब्युटी सलूनमध्ये फिरत असताना एक व्यक्ती तिला गिफ्ट देण्यासाठी तिच्या सलूनमध्ये येतो, तिचे नाव घेतो आणि एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडतो. थोड्याच वेळात मार्केझ मरण पावते आणि तिथेच टेबलावर कोसळते.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दिशेने मोठे यश मिळवत डीआरडीओने अशी कामगिरी केली आहे जी देशाच्या किनारपट्टी भाग आणि संरक्षण क्षेत्र या दोन्हींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. डीआरडीओच्या कानपूर येथील प्रयोगशाळेने केवळ ८ महिन्यांत नॅनोपोरस मल्टीलेयर्ड पॉलिमर मेम्ब्रेन तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे समुद्राच्या क्षारयुक्त पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रूपांतर करू शकते. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांसाठी हे तंत्रज्ञान खास डिझाइन करण्यात आले आहे.