Sunday, July 12, 2026
Home Blog Page 229

धुळे विश्रामगृहातील एक कोटी ८४ लाख रुपयांचे म्हणणे काय?

0
धुळे विश्रामगृहातील एक कोटी ८४ लाख रुपयांचे म्हणणे काय?



धुळे : विधिमंडळ अंदाज समितीच्या जिल्हा दौऱ्यात निवासाची व्यवस्था करण्यात आलेल्या येथील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत सुमारे एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये आढळल्याने दौरा वादात सापडला आहे. शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी संबंधित रक्कम समिती सदस्यांना देण्यासाठी जमा करण्यात आल्याचा आरोप करीत संबंधित खोलीबाहेर बुधवारी सायंकाळपासून ठिय्या दिला होता. ही खोली समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय सहायकाच्या नावे आरक्षित करण्यात आली आहे. खोतकर यांनी हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गुरुवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ अंदाज समिती बुधवारपासून धुळे आणि नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आली. या समितीत २९ सदस्यांचा समावेश असून पहिल्या दिवशी १० सदस्य धुळे येथे दाखल झाले. समिती शासनाच्या विविध विभागांतर्फे झालेल्या कामांचा आढावा घेणार आहे. शासकीय गुलमोहर विश्रामगृहात समिती सदस्यांसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे. विश्रामगृहातील १०२ क्रमांकाची खोली १५ मे रोजी समितीचे अध्यक्ष खोतकर यांचे खासगी स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने आरक्षित करण्यात आली. बुधवारी सायंकाळनंतर ही खोलीच नाट्यपूर्ण घडामोडींचे केंद्रबिंदू राहिली.

माजी आमदार अनिल गोटे यांनी संबंधित खोलीत समितीला देण्यासाठी पाच कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा आरोप करीत कुलूपबंद खोलीबाहेर समर्थकांसह ठिय्या दिला. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत खोली उघडण्याची मागणी त्यांनी लावून धरली. अखेर सहा तासाच्या घडामोडीनंतर रात्री साडेअकरा वाजता अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, प्रांताधिकारी रोहन कुवर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचांसमोर खोलीचे कुलूप उघडले.

खोलीतील काही पिशव्यांमध्ये रोख रक्कम आढळली. तीन यंत्राच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली असता रक्कम एक कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. रक्कम जप्त करुन पोलीस आणि महसूल अधिकारी निघून गेले. पहाटे चारपर्यंत ही कारवाई सुरू होती. यासंदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. दरम्यान, गुरुवारी समिती नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर होती.

विश्रामगृहातील रोख रकमेसंदर्भात नाशिक येथील आयकर विभागाचे अतिरिक्त संचालक (तपास) यांना कळविण्यात आले आहे. तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल. जप्त करण्यात आलेली रोकड कोषागार शाखेत ठेवण्यात येईल. प्रकरणाची चौकशी प्रगतीपथावर आहे. श्रीकांत धिवरे (जिल्हा पोलीस अधीक्षक, धुळे)

मला अतिशय खात्रीशीर माहिती मिळाली होती. रक्कम सापड्लायने मी केलेला आरोप सिद्ध झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे भ्रष्ट स्वरुप समोर आले. हे पैसे अंदाज समितीमधील आमदारांना दिले जाणार होते. अनिल गोटे (माजी आमदार)

अंदाज समिती आणि राज्य शासनाला बदनाम करण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी तथ्यहीन आरोप केले आहेत. रोकड आढळलेल्या खोलीत माझा स्वीय सहायक राहत नव्हता. हे विरोधकांचे षडयंत्र आहे.अर्जुन खोतकर (अध्यक्ष, विधिमंडळ समिती सदस्य)



Source link

Local BJP leaders are trying to inaugurate the statue भाजप नेत्यांचे प्रयत्न

0
Local BJP leaders are trying to inaugurate the statue भाजप नेत्यांचे प्रयत्न


नांदेड : रामटेकच्या संस्कृत विद्यापीठातील माजी पंतप्रधान, भारतरत्न पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणात अनास्था दाखविणाऱ्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या येथील पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे काही प्रमुख नेते येत्या सोमवारी नांदेडमध्ये येत आहेत. शहा आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांची आखणी पक्षाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वासह संपूर्ण नियंत्रणाखाली येथे होत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यात वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ द्यावा, असे त्यांच्या कार्यालयाला कळविण्यात आले होते, पण बुधवारी दुपारी आलेल्या गृहमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमात पुतळ्याच्या अनावरणाचा सुस्पष्ट उल्लेख नसल्यामुळे कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल मनपा प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे.

रामटेकच्या विद्यापीठातील नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरळसरळ नकार दिला होता. तर विद्यापीठाने विनंती करूनही विदर्भातील सत्ताधारी नेत्यांनी या कार्यक्रमाच्या बाबतीत आस्था दाखविली नव्हती. त्यावरून तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाण यांनी कोश्यारी यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्यात प्रामुख्याने पक्षाची विभागीय बैठक, पक्षाच्या व्यासपीठावरून होणारी एक जाहीर सभा तसेच दोन वेगवेगळ्या कार्यालयांचे उद्घाटन आणि खा. चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट इत्यादी बाबींचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सांगण्यात आले होते. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी नांदेड-वाघाळा मनपाच्या माध्यमातून करण्यात आली. मनपात सध्या प्रशासकीय राजवट आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पुतळ्याच्या अनावरणाचा आग्रह धरला असला, तरी गृहमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमात त्याबद्दल स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे मनपा प्रशासन संभ्रमात असल्याचे दिसून आले.

भाजपाचे कार्यालय अर्धवट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या तसेच खासदार अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन निश्चित झाल्याचे स्थानिक पातळीवर सांगण्यात आले. त्याचवेळी नांदेडमधील भाजपाच्या नांदेड जिल्हा कार्यालयाचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडले असल्याचे दिसून आले. काही वर्षांपूर्वी या कार्यालयाचे काम सुरू करण्यात आले. मधल्या काळात प्रवीण साले यांच्यावर बांधकाम करून घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांची मुदत संपल्यानंतर कार्यालय बांधकामाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची यावरून वाद निर्माण झाला.





Source link

मराठवाड्यात २७ महसूल मंडळांत अतिवृष्टी

0
मराठवाड्यात २७ महसूल मंडळांत अतिवृष्टी



छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात बुधवारी रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना आणि लातूर या चार जिल्ह्यांतील २७ महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदिवण्यात आली. अनेक भागांतील शेतातून पाणी वाहिले. उन्हाळी बागायत पिकांचे मोठे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा, वाळुज, तसेच ग्रामीण भागातील सिल्लोड, निल्लोड पीरबावडा, वडोदबाजार, बाबरा या महसूल मंडळात किमान ६७ आणि कमाल ८९ मिमी पावसाची नोंद झाली.

मे महिन्यात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी रात्री मुळसधार पावसाला सुरुवात झाली. काही भागांत पावसासह वाऱ्याचा जोरही अधिक होता. सिमेंटचे रस्ते वर आणि इमारती खाली असल्याने काही भागात पाणीही शिरू लागले होते. सलग पावसामुळे मे महिन्यात पावसाळा सुरू झाल्यासारखे वातावरण आहे. जालना, संभाजीनगर, लातूर आणि धाराशिवमध्ये जोरदार पाऊस झाल्याने फळपिकांचे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

लातूरमध्ये सलग बाराव्या दिवशी जोरदार पाऊस

लातूर शहर आणि परिसरात गुरुवारी सलग बाराव्या दिवशी जोरदार पाऊस पडला. वळवाचा पाऊस हा एखाद-दुसऱ्या दिवशी पडून गायब होतो. या वर्षी मात्र ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतच मे महिन्यात पावसाळ्यासारखे वातावरण तयार झाले आहे. महानगरपालिकेने पावसाळापूर्व नालेसफाई केलेली नसल्यामुळे शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून आले.

वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे नांगरणीसारखी मशागतीची कामे रखडली आहेत. कधी नव्हे ते उन्हाळ्यात नद्यांना पाणी आले असून, रेणा नदीवरच्या छोट्या क्षमतेच्या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडून नदीत पाणी सोडण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली. एरवी जून, जुलै उजाडला, तरी पावसाचा टिपूसही पडत नसल्यामुळे आभाळाकडे पाहण्याची सवय लागलेल्या लातूर जिल्ह्यात या वर्षी मे महिन्याच्या मध्यातच पावसाला सुरुवात झाली आहे. धाराशिव, जालन्यातही असेच चित्र दिसून येत आहे.



Source link

सोलापुरात १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका

0
सोलापुरात १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका



सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे रस्त्यांसह ग्रामीण भागात शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. सोलापूर शहरात एकाच दिवशी तब्बल ११० मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस पडला आहे. यासह जिल्ह्यातील १३ गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शेतांमध्ये पाणी घुसले असून, उन्हाळी पिकांसह फळबागांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३२.८ मिलीमीटर इतका सरासरी पाऊस झाला. सर्वाधिक ६२.९ मिमी पाऊस एकट्या उत्तर सोलापूर तालुक्यात पडला. माढा-५२.४, माळशिरस-४५.१, बार्शी-३७.२, करमाळा-३२.७, पंढरपूर-३१.३, मोहोळ-२९.२, दक्षिण सोलापूर-२३.३, अक्कलकोट-२३.२, सांगोला-१७.८ आणि मंगळवेढा-९.७ याप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे.

या पावसाचा जोर सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर, माढा, माळशिरस, बार्शी व करमाळ्यात होता. सोलापूर शहरात तब्बल ११० मिमी एवढा मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांचे हाल झाले. विशेषत: या पहिल्याच पावसाने महापालिका यंत्रणेच्या मर्यादा समोर आल्या. पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाचा जोर वाढल्याने गुडघाभर पाणी साचले होते. त्यातून वाहने चालवताना नागरिकांची तारांबळ उडाली होती.

जिल्ह्यात विविध १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात उत्तर सोलापूर तालुक्यात मार्डी (११०) व शेळगी (६६) या मंडळांचा समावेश आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी (९९.३), कुर्डूवाडी (७८), म्हैसगाव (७१.१) आणि रोपळे (७०.५) येथे अतिवृष्टी झाली. तर पंढरपूर तालुक्यातील करकंब (७१) व पटवर्धन कुरोली (७१) या दोन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांची हानी झाली. बार्शी तालुक्यातील उपळे दुमाला महसूल मंडळात ९९.३ मिमी पावसाच्या रूपाने अतिवृष्टी झाली. तर करमाळा तालुक्यातील सालसे (७०.५) आणि केम (६९) आणि माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे ६५.३ मिमी पाऊस होऊन अतिवृष्टी अनुभवास आली.

एकाच दिवशी एकाच महसूल मंडळात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला तर त्यास नियमानुसार अतिवृष्टी मानले जाते. गुरुवारी दुपारपासून आकाश ढगांनी व्यापले होते. सायंकाळी पुन्हा पाऊस पडण्याची चाहूल लागली होती. वीजपुरवठाही अधुनमधून खंडित होत आहे.चौकट

नालेसफाई धीम्या गतीनेसोलापूर शहरात वळिवाच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना दुसरीकडे महापालिकेची यंत्रणा जागी झाली. पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु ही कामे धीम्या गतीने होत आहेत. या कामांची पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी पाहणी केली. एकूण १७८ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या सोलापूर शहरात ४२ किलोमीटर लांबीचे उघडे नाले आहेत. तर भूमिगत गटारी २१७ किलोमीटर लांबीच्या आहेत. पावसाचे पाणी पुणे रस्त्यावर हांडे प्लॉट आणि बाळे परिसरासह इतर काही ठिकाणी घरांमध्ये शिरले होते. या भागात पालिका आयुक्त डॉ. ओंबासे यांनी भेट देऊन पाहणी केली. बाधित परिसरात आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.



Source link

Unique Tradition: भारतातल्या ‘या’ भागात अनोखी परंपरा, फार पुर्वीपासून चालते हातांचे चुंबन घेण्याची प्रथा!

0
Unique Tradition: भारतातल्या ‘या’ भागात अनोखी परंपरा, फार पुर्वीपासून चालते हातांचे चुंबन घेण्याची प्रथा!


Kissing Hands Tradition: आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. सर्व धर्म पंथाचे लोक येथे राहतात. त्यामुळे विविध प्रथा परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. राजस्थानमध्ये अशा अनेक परंपरा आहेत. ज्या ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. या परंपरांमुळे राजस्थानला रंगीला राजस्थान म्हणून ओळखले जाते. कारण येथील प्रत्येक प्रदेशाचे स्वतःचे वेगळे रीतिरिवाज आहेत. एकीकडे पाय दाबून स्वागत करणे हा राजस्थानच्या संस्कृतीचा एक भाग आहे. तर दुसरीकडे एक अशी परंपरा आहे जी तुम्ही कदाचित ऐकली नसेल. या अनोख्या परंपरेबद्दल जाणून घेऊया.

रबारी समाजाची अनोखी परंपरा

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील संदेराव गावात रबारी समुदायाचे लोक राहतात. या समुदायाच्या लोकांची एक अनोखी परंपरा आहे. येथे एक परंपरा आहे. ज्यामध्ये मोठ्यांपासून ते मुलांपर्यंत सर्वजण आदर दाखवण्यासाठी हाताचे चुंबन घेतात. हे ऐकून तुम्हाला थोडे विचित्र वाटत असेल किंवा हसू येईल. परदेशात हे सर्व सामान्य आहे. पण राजस्थानमध्ये एकीकडे महिला त्यांच्या वडिलधाऱ्यांसमोर येताना चेहरा झाकतात. दुसरीकडे पाली येथील या रबारी समुदायाचे लोक एकमेकांचे स्वागत करण्यासाठी एकमेकांच्या हाताचे चुंबन घेतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांचाही यात समावेश असतो. या प्रथेचे विदेशातील संदर्भ समजावून घेऊया. 

युरोपियन संदर्भ

मध्ययुगीन युरोपमध्ये हाताचे चुंबन घेणे हे सौजन्य आणि आदराचे लक्षण होते. हे विशेषतः श्रेष्ठी आणि राजघराण्यांमध्ये प्रचलित होते. पुरुष अनेकदा विशेषतः उच्च वर्गातील स्त्रियांच्या हाताचे चुंबन घेऊन आदर किंवा निष्ठा दाखवत असत. ही प्रथा प्रेमसंबंध, भक्ती किंवा सामाजिक प्रतिष्ठेतील फरक दर्शविणारी होती. उदाहरणार्थ एक शूरवीर आपल्या स्त्रीप्रती प्रेम, निष्ठा दाखवण्यासाठी हाताचे चुंबन घेत असे. ही पद्धत पोलंड, फ्रान्स, इटली आणि रशियासारख्या देशांमध्ये विशेषतः लोकप्रिय होती.

भारतात हात चुंबन घेण्याची प्रथा

भारतात हात चुंबन घेण्याची प्रथा काही प्रमाणात युरोपियन प्रभावामुळे पाळली जाते. विशेषतः वसाहतवादी काळात, जेव्हा ब्रिटिश आणि इतर युरोपीय शासकांच्या प्रथा लागू झाल्या. ही प्रथा भारतीय संस्कृतीत तितक्या खोलवर रुजली नाही. भारतीय संस्कृतीत, आदर दर्शविण्यासाठी नमस्कार करणे, पायांना स्पर्श करणे किंवा डोके टेकवणे हे अधिक प्रचलित राहिले आहे. काही समुदायांमध्ये विशेषतः शहरी आणि पाश्चात्य प्रभाव असलेल्या भागात, हातांचे चुंबन घेणे हे प्रेम किंवा सौजन्याचे लक्षण म्हणून पाहिले जाऊ शकते. आधुनिक भारतात ही प्रथा क्वचितच दिसून येते आणि ती औपचारिक किंवा जुन्या पद्धतीची मानली जाते.

 दुसऱ्या व्यक्तीची संमती आवश्यक

हातांचे चुंबन घेण्याची प्रथा ही एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे जी प्रामुख्याने युरोपियन शिष्टाचाराशी संबंधित आहे. ही प्रथा भारतात मर्यादित स्वरूपात अस्तित्वात असून प्रामुख्याने रोमँटिक स्नेह किंवा पाश्चात्य प्रभावाचे एक रूप म्हणून पाहिली जाते. भारतीय संस्कृतीत, आदर आणि प्रेम दाखवण्यासाठी पायांना स्पर्श करणे किंवा नतमस्तक होणे यासारख्या प्रथा अधिक प्रचलित आहेत. जर एखाद्याला ही पद्धत स्वीकारायची असेल तर त्याने दुसऱ्या व्यक्तीची संमती आणि सांस्कृतिक संवेदनशीलता लक्षात घेतली पाहिजे.

संदेराव गावात लग्नाचा पोशाख

पालीमध्ये अनेक समुदायांचे लोक राहतात. पाली हे या समुदायांच्या अनोख्या परंपरा आणि रीतिरिवाजांसाठी ओळखले जाते. पाली येथील रबारी समुदायाचा स्वतःचा एक वेगळा पारंपारिक पोशाख आहे. ज्यामध्ये महिला लग्नादरम्यान त्यांच्या हातात पांढऱ्या बांगड्या घालतात. येथील महिला नेहमी ते घालतात आणि त्यासोबत त्या नाकात अंगठी देखील घालतात. त्यांच्यासाठी हे घालणे सिंदूर आणि मंगळसूत्राच्या बरोबरीचे आहे.





Source link

Vaibhav Suryavanshi: बाप रे! ५०० मिस्ड कॉल्स अन् वैभवने ४ दिवस फोन बंद ठेवला; राहुल द्रविडने सांगितला विक्रमी शतकी खेळीनंतरचा अनुभव

0
Vaibhav Suryavanshi: बाप रे! ५०० मिस्ड कॉल्स अन् वैभवने ४ दिवस फोन बंद ठेवला; राहुल द्रविडने सांगितला विक्रमी शतकी खेळीनंतरचा अनुभव



vaibhav suryavanshi received 500 missed calls after historic knock in ipl rahul dravid reveals| बाप रे!५०० मिस्ड कॉल्स अन् वैभवने ४ दिवस फोन बंद ठेवला; राहुल द्रविडने सांगितला विक्रमी शतकी खेळीनंतरचा अनुभव





Source link

‘काकू तुम्ही घायाळ केलं…’, भोजपुरी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक

0
‘काकू तुम्ही घायाळ केलं…’, भोजपुरी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक



Dance viral video aunty dance on bhojpuri song video viral on social media l ‘काकू तुम्ही घायाळ केलं…’, भोजपुरी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले शॉक





Source link

Moksha: “हिंदूंमध्ये मोक्षाची संकल्पना”, सरन्यायाधीशांची टिप्पणी; वक्फ कायद्याच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

0
Moksha: “हिंदूंमध्ये मोक्षाची संकल्पना”, सरन्यायाधीशांची टिप्पणी; वक्फ कायद्याच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?



Moksha Concept In Hindu: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी, वक्फ (सुधारणा) कायद्यावरील सुनावणीदरम्यान, धार्मिक दान, इस्लाम आणि इतर धर्मांमध्ये त्याचे महत्त्व यावर चर्चा करताना आध्यात्मिक संदर्भ देत,”हिंदूंमध्ये मोक्ष आहे”, असे म्हटले. यावेळी न्यायालय वक्फ कायद्यावरील केंद्र सरकारच्या युक्तिवादाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांची बाजू ऐकत होते.

केंद्र सरकारने काल न्यायालयात युक्तीवाद केला होता की, वक्फ हे धर्मादाय आहे आणि ते इस्लामचा गाभा किंवा आवश्यक भाग नाही. या दाव्याला विरोध करण्यासाठी, याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी वक्फचा धार्मिक अर्थ स्पष्ट केला. ते म्हणाले, “वक्फ म्हणजे मृत्युनंतरच्या जीवनासाठी देवाला दिलेले समर्पण. वक्फ म्हणजे देवाला भविष्यातील आध्यात्मिक फायद्यासाठी दिलेले दान.”

यावर उत्तर देताना, सरन्यायाधीश बी. आर गवई या कल्पनेला हिंदू धर्माशी जोडणारी एक तात्विक टिप्पणी केली आणि म्हणाले की, “हिंदूंमध्ये मोक्षाची संकल्पना आहे.”

दुसरे न्यायाधीश, न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांनीही ख्रिश्चन धर्माचा उल्लेख करून या विचारात भर घातली आणि म्हणाले, “आपण सर्वजण स्वर्गात जाण्यासाठी प्रयत्नशील असतो.”

ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनीही याचिकाकर्त्यांच्या बाजूचे समर्थन केले आणि हिंदू धर्माशी तुलना केली. त्यांनी असा युक्तिवाद केला की, हिंदू धर्मग्रंथांनुसारही काही धार्मिक वास्तू आवश्यक मानल्या जात नाहीत. ते म्हणाले, “वेदांनुसार, मंदिरे हिंदू धर्माचा अविभाज्य भाग नाहीत. त्यामध्ये अग्नी, पाणी आणि पावसाची पूजा करण्याची तरतूद आहे.”

यापूर्वी, याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, वक्फ म्हणजे देवाच्या नावाने दिले जाणारे दान आहे, परंतु केंद्राने असे म्हटले होते की, दान देणे सर्व धर्मांचा अविभाज्य भाग आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले होते की, “वक्फ ही एक इस्लामिक संकल्पना आहे. पण ती इस्लामचा अविभाज्य भाग नाही. वक्फ म्हणजे इस्लाममध्ये फक्त दान आहे. दान हा प्रत्येक धर्माचा भाग आहे. ख्रिश्चन, हिंदू आणि शीखांमध्येही दान देण्याची व्यवस्था आहे.”

सरन्यायाधीशांनीही या विषयावर आपले मत मांडत दानधर्माची संकल्पना प्रत्येक धर्मात अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ते म्हणाले होते की, “दानधर्म हा इतर धर्मांचाही मूलभूत सिद्धांत आहे.”

नंतर सुनावणीत, कपिल सिब्बल यांनी वक्फ कायद्यातील तरतुदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ज्यामध्ये गैर-मुस्लिमांना वक्फ व्यवस्थापन समितीचे सदस्य बनवण्याची तरतूद आहे.



Source link

Basav Raju death effect on Naxalites Is the Naxal movement hurtling towards end after his death

0
Basav Raju death effect on Naxalites Is the Naxal movement hurtling towards end after his death



Basav Raju death effect on Naxalites Is the Naxal movement hurtling towards end after his death | ‘बसवराजू’च्या मृत्यूनंतर नक्षलवादाचा कणा मोडला का? नवीन म्होरक्या कोण? 





Source link

लाच प्रकरणी महिला तलाठीसह मंडळ अधिकारी ताब्यात

0
लाच प्रकरणी महिला तलाठीसह मंडळ अधिकारी ताब्यात



नाशिक: सातबाऱ्यावर फेरफार नोंदणी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या आईवडिलांच्या नावे मोडाळे गावात मिळकत असून मिळकतीचा गाव नमुना, सातबारा अधिकार अभिलेखपत्रक यावर मे. न्यायालयाचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्रयस्थ संबंधास प्रतिबंध अशी फेरफार नोंद होती. या दाव्यात निकाल लागून आदेश झाले होते. त्यावरून तक्रारदाराच्या वडिलांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आधीची फेरफार नोंद रद्द होण्यासाठी तहसीलदार आणि संशयित तलाठी योगिता कचकुरे (४२, सोमेश्वर काॅलनी, एबीबी कंपनीजवळ, सातपूर) यांच्याकडे अर्ज केला होता.

अर्जावर कार्यवाही करुन नोंद घेण्याच्या मोबदल्यात योगिता यांनी १० हजार रुपयांची मागणी करुन रक्कम स्वीकारली. वाडीवऱ्हेचा मंडळ अधिकारी दत्तात्रय टिळे ( ३५, रा. भगूर, नाशिक) याने नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची मागणी स्वतः साठी केली. तलाठी योगिताला रंगेहात पकडण्यात आले.

नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पथकातील हवालदार गणेश निंबाळकर, संतोष गांगुर्डे, नितीन नेटारे यांनी ही यशस्वी कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी सापळा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले.



Source link