
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंसा भडकलेल्या ठिकाणापासून सुरक्षा दल जवळपास १० किलोमीटर दूर होते. सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर लीथू गावात १३ मृतदेह आढळले. मृतदेहांजवळ कोणतेही शस्त्रे मिळाली नाहीत. असे वाटते की, मृत व्यक्ती लीथु भागातील नसून इतर कोणत्या तरी क्षेत्रातील आहेत. पोलीस व सुरक्षा दलांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.






