
Maharashtra Assembly Election 2024 गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली काँग्रेस गरिबांची लूट करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे.काँग्रेसने नेहमीच गरीबीच्या अजेंड्यावर काम केले. पिढ्यानपिढ्या त्यांनी ‘गरीब हटाओ’चा खोटा नारा दिला आहे. गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली काँग्रेसने गरिबांची लूट केली, असे मोदी पनवेल मध्ये झालेल्या जाहीर सभेत म्हणाले.