
राज्यभरात दिवाळीचे फटाके फुटत असतानाच राज्यातील राजकारणातही आपटीबार सुरूच आहेत. आज एकाच दिवशी काँग्रेसला दोन जबर धक्के बसले. मुंबईत काँग्रेसचे अत्यंत जुने आणि अभ्यासू नेते रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हातात घेतले आहे. यामुळे सायन-कोळीवाडा मतदारसंघातील राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे उमेदवारीच्या गोंधळानंतर कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून कोल्हापूरमधील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.