
Mumbai Crime news : राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहिता लागली आहे. या काळात पैशांचा पाऊस राज्यात पडत असल्याचे चित्र आहे. पुण्यात खेडशिवापुर येथे ५ कोटी तर हडपसर येथे नाकाबंदी दरम्यान, २२ लाख ९० हजार रुपये सापडले होते. त्यानंतर पुण्यापाठोपाठ आता मुंबईचया भुलेश्वर येथे देखील कोट्यवधींची मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे.