
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी. नुकताच जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तृप्ती हजेरी लावणार होती. पण काही कारणास्तव तिला जाते आले नाही. त्यामुळे जयपूरमधील महिला यांनी संताप व्यक्त केला आहे. खरं तर तृप्ती डिमरीला जयपूरमधील एका कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. यासाठी तिने फीही घेतली होती, पण नंतर अभिनेत्री इव्हेंटमध्ये पोहोचली नाही. कार्यक्रमाला न पोहोचल्याने कार्यक्रमाशी संबंधित महिलांनी तृप्ती डिमरीच्या फोटोचा चेहरा काळा केल्याची चर्चा सुरु आहे.