
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ च्या उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा पराभव केला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी आज (१६सप्टेंबर) धमाकेदार खेळ करत कोरियन संघाचा धुव्वा उडवला. भारताने हा सामना ४-१ ने जिंकला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे. उपांत्य फेरीत चीनने पाकिस्तानचा पराभव केला होता.






