
ठाणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंबरनाथमधील मोरिवली औद्योगिक वसाहतीमधील एका केमिकल कंपनीत गळती झाली असून रासायनिक धूर संपूर्ण शहरात पसरला आहे. अंबरनाथ शहरातील हवेत केमिकलचा धूर पसरला असून रेल्वे मार्गावरही धुराचे साम्राज्य असून दृश्यमानता कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.