
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पूर्णाकृती पुतळा केवळ ८ महिन्याच्या आतच कोसळला आहे. २६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. पुतळा कोसळल्याबद्दल आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी जनतेची माफी मागितली आहे. याप्रकरणी राज्यातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो, अशी भावना अजित पवारांनी बुधवारी व्यक्त केली.