
काय आहे प्रकरण?
जान्हवी किल्लेकरने वर्षा उसगावकर यांचा अपमान केला. इतकेच काय तर त्यांना शासनाने दिलेल्या पुरस्कारांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. बिग बॉसच्या घरात झालेल्या भांडणात जान्हवीने ‘तुमची ही घाणेरडी अॅक्टींग माझ्यासमोर करु नका’ वर्षा यांना म्हटले. त्यावर वर्षा ताई लगेच ‘असं कसं मला अॅक्टिंगसाठी शासनाचा पुरस्कार मिळालाय. तो ही तीन वेळा’ असे बोलतात. ते ऐकून जान्हवी अक्षरश: तिच्या मर्यादा ओलांडताना दिसते. ‘आता त्यांना पश्चाताप होत असेल ह्यांना का दिला आपण तो पुरस्कार. किती चांगले चांगले अभिनेते आहेत बाहेर. त्यांना नाही मिळाला आणि तुम्हाला मिळाला’ असे जान्हवी म्हणाली.