
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये बोलताना भूमिका स्पष्ट केली होती. आरक्षणाबाबत आम्ही अनेकदा भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मांडण्यात आलेल्या विधेयकालाही आमचा पाठिंबा होता. आमचं म्हणणं इतकंच आहे, आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा, सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा. मध्यंतरी सरकारने आरक्षणाच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचे नाटक करण्याचा प्रयत्नही केला होता, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी हाणला.