
पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली.अनेक ठिकाणी १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर आणि कोयना येथे १७० मिलीमीटर पाऊस झाला.विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.