
विधान परिषदेचा निकाल शरद पवार गटाला मोठा धक्का देणारा ठरला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याची माहिती समोर आली. यावर नाना पटोले म्हणाले की, “आम्ही ट्रॅप लावला होता, ज्यात बदमांश लोक सापडली आहेत. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली. ज्यांनी पक्षाविरोधी काम केले, पक्षासोबत गद्दारी केले, त्यांना पक्ष बाहेरचा रस्ता दाखवेल. काँग्रेस हा लोकशाहीला मानणार पक्ष आहे. देशाचा काँग्रेसवर विश्वास आहे. त्याच विश्वासावर आम्ही आमदार, खासदार निवडून आणतो. यामुळे गद्दारांनाा अशी अद्दल घडवली जाईल की, पुन्हा कुणी तसे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. लवकरच त्यांची नावे समोर येतील.”







