
मात्र, प्रियाकडून लवकरात लवकर सत्य वदवून घेऊन मधुभाऊंची केस सोडवून आपल्या मनातील खऱ्या भावना कधी एकदा सायलीला सांगतो, असं अर्जुनला झालं आहे. आता अर्जुन सायलीला थेट या विषयी विचारताना दिसणार आहे. अर्जुन सायलीला म्हणणार आहे की, ‘मी प्रियाशी केवळ प्रेमाचं नाटक करणार आहे. कारण ती तेव्हाच मला सगळी खरी माहिती देईल. तुम्हाला असं वाटत नाही का, की सगळं सत्य लवकरात लवकर बाहेर यावं आणि मधुभाऊ सुखरूप सुटावेत? मधुभाऊंना सुखरूप सोडवायचं असेल, तर आता हा एकच पर्याय शिल्लक आहे. आपल्याला तोही करून पाहायलाच हवा.’







