
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. याशिवाय, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे अवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.