
शरद पवारांचं लक्ष्य विधानसभा
लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का दिल्यानंतर शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ता आणणारच असं त्यांनी ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षानं अवघ्या १० जागा जिंकून ८ जागा जिंकल्या. यापैकी बजरंग सोनवणे, धैर्यशील मोहिते-पाटील, नीलेश लंके, बाळ्यामामा म्हात्रे हे उमेदवार त्यांनी अन्य पक्षातून आपल्याकडं खेचले होते. याच बेरजेच्या राजकारणाची पुनरावृत्ती त्यांनी सुरू केली आहे. सूर्यकांता पाटील यांचा प्रवेश ही त्याची सुरुवात मानली जात आहे.







